शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

MAHARASHTRA HSC RESULT 2022 | बारावीच्या परीक्षेचा निकाल म्हणजे आयुष्याचा नव्हे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 13:19 IST

वास्तव स्वीकारा : मानसोपचारतज्ञांचा पालक आणि मुलांना सल्ला

पुणे : कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर यंदा बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडल्या. बुधवारी दुपारी बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर होत आहे. काही विद्यार्थ्यांचा निकाल अनपेक्षित लागला की, पालकांसह मुलांमध्येही प्रचंड मानसिक ताण निर्माण होतो. निकाल कसाही लागला तरी तो सकारात्मकतेने स्वीकारा. कारण हा केवळ बारावीच्या परीक्षेचा निकाल आहे, आयुष्याचा नव्हे, असा सल्ला मानसोपचारतज्ञांनी दिला आहे.

मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत पालकांना समाजाचे आणि मुलांना पालकांचे खूप टेन्शन असते. माझ्या मुलाला कमी गुण मिळाले, तर लोक काय म्हणतील, असा प्रश्न पालकांना सतावत असतो. दुसरीकडे, पालकांना अपेक्षित असलेले गुण मला मिळाले नाहीत, तर पालक काय करतील, या ताणाचा मुले सामना करत असतात. बारावीचा निकाल म्हणजे जणू काही अग्निपरीक्षाच, असे मानून सर्व जण आतुरतेने निकालाची वाट पाहत असतात. मात्र, मुलांना कमी गुण मिळाले तरी पालकांनी मुलांना भावनिक आधार द्यावा, असे आवाहन समुपदेशकांनी केले आहे.

निकालाच्या दिवशी काय काळजी घ्यावी?

- निकाल जाहीर होण्यापूर्वी मित्रपरिवार, नातेवाइकांचे फोन घेऊ नयेत. निकाल काय लागेल, याबाबत चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही.

-निकालाच्या दिवशी संयम, सकारात्मकता बाळगा.

- निकाल अनपेक्षित असेल तरी पालक आणि मुलांनी एकमेकांना भावनिक आधार द्यायला हवा.

- परीक्षेत अपयश आले म्हणून आयुष्य संपवण्याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही.

बारावी ही आयुष्यातील शेवटची परीक्षा नसते. त्यानंतरही करिअरचे अनेक पर्याय मुलांसमोर उपलब्ध असतात. त्यामुळे परीक्षेचा निकाल कसाही लागला तरी तो पालक आणि मुलांनी स्वीकारायला हवा. पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये. मुले पुन्हा चांगला अभ्यास करून बारावीची परीक्षा देऊ शकतात आणि यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे निकालाच्या दिवशी मानसिक तणावाखाली न राहता सकारात्मकतेने परिस्थितीला सामोरे जावे.

-डॉ. अर्चना जावडेकर, मानसोपचारतज्ञ

आपण परीक्षेत कसे पेपर लिहिले आहेत आणि साधारण किती गुण मिळू शकतात, याची मुलांना कल्पना असते. मात्र, पालकांच्या दडपणामुळे पेपर चांगले गेले आहेत, असे मुले सांगतात. निकालाच्या दिवशी पालकांच्या अपेक्षेइतके गुण मुलांना न मिळाल्यास पालक निराश होतात. त्यांचे दडपण आपोआपच मुलांवर येते. अशा परिस्थितीत एकमेकांना भावनिक आधार देणे आवश्यक असते. मुलांना नैराश्याच्या गर्तेत न ढकलता पुढील प्रयत्नांसाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यायला हवे.

-डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षाHSC Exam Resultबारावी निकालMaharashtraमहाराष्ट्र