शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

MAHARASHTRA HSC RESULT 2022 | बारावीच्या परीक्षेचा निकाल म्हणजे आयुष्याचा नव्हे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 13:19 IST

वास्तव स्वीकारा : मानसोपचारतज्ञांचा पालक आणि मुलांना सल्ला

पुणे : कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर यंदा बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडल्या. बुधवारी दुपारी बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर होत आहे. काही विद्यार्थ्यांचा निकाल अनपेक्षित लागला की, पालकांसह मुलांमध्येही प्रचंड मानसिक ताण निर्माण होतो. निकाल कसाही लागला तरी तो सकारात्मकतेने स्वीकारा. कारण हा केवळ बारावीच्या परीक्षेचा निकाल आहे, आयुष्याचा नव्हे, असा सल्ला मानसोपचारतज्ञांनी दिला आहे.

मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत पालकांना समाजाचे आणि मुलांना पालकांचे खूप टेन्शन असते. माझ्या मुलाला कमी गुण मिळाले, तर लोक काय म्हणतील, असा प्रश्न पालकांना सतावत असतो. दुसरीकडे, पालकांना अपेक्षित असलेले गुण मला मिळाले नाहीत, तर पालक काय करतील, या ताणाचा मुले सामना करत असतात. बारावीचा निकाल म्हणजे जणू काही अग्निपरीक्षाच, असे मानून सर्व जण आतुरतेने निकालाची वाट पाहत असतात. मात्र, मुलांना कमी गुण मिळाले तरी पालकांनी मुलांना भावनिक आधार द्यावा, असे आवाहन समुपदेशकांनी केले आहे.

निकालाच्या दिवशी काय काळजी घ्यावी?

- निकाल जाहीर होण्यापूर्वी मित्रपरिवार, नातेवाइकांचे फोन घेऊ नयेत. निकाल काय लागेल, याबाबत चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही.

-निकालाच्या दिवशी संयम, सकारात्मकता बाळगा.

- निकाल अनपेक्षित असेल तरी पालक आणि मुलांनी एकमेकांना भावनिक आधार द्यायला हवा.

- परीक्षेत अपयश आले म्हणून आयुष्य संपवण्याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही.

बारावी ही आयुष्यातील शेवटची परीक्षा नसते. त्यानंतरही करिअरचे अनेक पर्याय मुलांसमोर उपलब्ध असतात. त्यामुळे परीक्षेचा निकाल कसाही लागला तरी तो पालक आणि मुलांनी स्वीकारायला हवा. पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये. मुले पुन्हा चांगला अभ्यास करून बारावीची परीक्षा देऊ शकतात आणि यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे निकालाच्या दिवशी मानसिक तणावाखाली न राहता सकारात्मकतेने परिस्थितीला सामोरे जावे.

-डॉ. अर्चना जावडेकर, मानसोपचारतज्ञ

आपण परीक्षेत कसे पेपर लिहिले आहेत आणि साधारण किती गुण मिळू शकतात, याची मुलांना कल्पना असते. मात्र, पालकांच्या दडपणामुळे पेपर चांगले गेले आहेत, असे मुले सांगतात. निकालाच्या दिवशी पालकांच्या अपेक्षेइतके गुण मुलांना न मिळाल्यास पालक निराश होतात. त्यांचे दडपण आपोआपच मुलांवर येते. अशा परिस्थितीत एकमेकांना भावनिक आधार देणे आवश्यक असते. मुलांना नैराश्याच्या गर्तेत न ढकलता पुढील प्रयत्नांसाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यायला हवे.

-डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षाHSC Exam Resultबारावी निकालMaharashtraमहाराष्ट्र