शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

MAHARASHTRA HSC RESULT 2022 | बारावीच्या परीक्षेचा निकाल म्हणजे आयुष्याचा नव्हे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 13:19 IST

वास्तव स्वीकारा : मानसोपचारतज्ञांचा पालक आणि मुलांना सल्ला

पुणे : कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर यंदा बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडल्या. बुधवारी दुपारी बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर होत आहे. काही विद्यार्थ्यांचा निकाल अनपेक्षित लागला की, पालकांसह मुलांमध्येही प्रचंड मानसिक ताण निर्माण होतो. निकाल कसाही लागला तरी तो सकारात्मकतेने स्वीकारा. कारण हा केवळ बारावीच्या परीक्षेचा निकाल आहे, आयुष्याचा नव्हे, असा सल्ला मानसोपचारतज्ञांनी दिला आहे.

मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत पालकांना समाजाचे आणि मुलांना पालकांचे खूप टेन्शन असते. माझ्या मुलाला कमी गुण मिळाले, तर लोक काय म्हणतील, असा प्रश्न पालकांना सतावत असतो. दुसरीकडे, पालकांना अपेक्षित असलेले गुण मला मिळाले नाहीत, तर पालक काय करतील, या ताणाचा मुले सामना करत असतात. बारावीचा निकाल म्हणजे जणू काही अग्निपरीक्षाच, असे मानून सर्व जण आतुरतेने निकालाची वाट पाहत असतात. मात्र, मुलांना कमी गुण मिळाले तरी पालकांनी मुलांना भावनिक आधार द्यावा, असे आवाहन समुपदेशकांनी केले आहे.

निकालाच्या दिवशी काय काळजी घ्यावी?

- निकाल जाहीर होण्यापूर्वी मित्रपरिवार, नातेवाइकांचे फोन घेऊ नयेत. निकाल काय लागेल, याबाबत चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही.

-निकालाच्या दिवशी संयम, सकारात्मकता बाळगा.

- निकाल अनपेक्षित असेल तरी पालक आणि मुलांनी एकमेकांना भावनिक आधार द्यायला हवा.

- परीक्षेत अपयश आले म्हणून आयुष्य संपवण्याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही.

बारावी ही आयुष्यातील शेवटची परीक्षा नसते. त्यानंतरही करिअरचे अनेक पर्याय मुलांसमोर उपलब्ध असतात. त्यामुळे परीक्षेचा निकाल कसाही लागला तरी तो पालक आणि मुलांनी स्वीकारायला हवा. पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये. मुले पुन्हा चांगला अभ्यास करून बारावीची परीक्षा देऊ शकतात आणि यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे निकालाच्या दिवशी मानसिक तणावाखाली न राहता सकारात्मकतेने परिस्थितीला सामोरे जावे.

-डॉ. अर्चना जावडेकर, मानसोपचारतज्ञ

आपण परीक्षेत कसे पेपर लिहिले आहेत आणि साधारण किती गुण मिळू शकतात, याची मुलांना कल्पना असते. मात्र, पालकांच्या दडपणामुळे पेपर चांगले गेले आहेत, असे मुले सांगतात. निकालाच्या दिवशी पालकांच्या अपेक्षेइतके गुण मुलांना न मिळाल्यास पालक निराश होतात. त्यांचे दडपण आपोआपच मुलांवर येते. अशा परिस्थितीत एकमेकांना भावनिक आधार देणे आवश्यक असते. मुलांना नैराश्याच्या गर्तेत न ढकलता पुढील प्रयत्नांसाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यायला हवे.

-डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षाHSC Exam Resultबारावी निकालMaharashtraमहाराष्ट्र