शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची तरतूद ; उर्वरित मदत केंद्राकडे मागणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 14:57 IST

राज्यात दीर्घकाळ मुक्काम केलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याकरिता प्राथमिक स्तरावर १० हजार कोटींची तरतुद करण्यात आले असून उर्वरित मदत केंद्राकडे मागणार असल्याचे महसूलमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 

पुणे : राज्यात दीर्घकाळ मुक्काम केलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याकरिता प्राथमिक स्तरावर १० हजार कोटींची तरतुद करण्यात आले असून उर्वरित मदत केंद्राकडे मागणार असल्याचे महसूलमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 

पुरंदर तहसील कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. त्या आधी त्यांनी पुरंदर तालुक्यातील भिवरी, बोपदेव, चांबळी आणि हिवरे भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत सर्व नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले. 

 पुढे ते म्हणाले की, वेगवेगळ्या भागातले नुकसान वेगवेगळे आहे. जसे की मावळमध्ये तांदूळ पिकाचे नुकसान झाले आहे. पुरंदरमध्ये फळ बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे परतावाही वेगवेगळ्या प्रमाणात असेल.प्राथमिक अंदाज घेऊन १० हजार रुपये प्रति हेक्टर जाहीर केले आहेत. मात्र नंतर नुकसान बघून तो वाढवून मिळेल असेही त्यांनी जाहीर केले.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेव्यतिरिक्त किती नुकसान भरपाई द्यावी लागेल याची चाचपणी सुरु आहे. फळबागांच्या नुकसानाचा पंचनामा प्रशासन करत नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली.त्यावर पाटील यांनी प्रशासनाला 'माणूस गरीब आहे की श्रीमंत हे महत्वाचे नाही. तर आजारी आहे हे महत्वाचे असते. त्याचप्रमाणे शेतकरी फळ पिकवतो की भाजीपाला यापेक्षा त्याचे नुकसान झाले आहे हे अधिक महत्वाचे सांगितले, असे सांगून पंचनाम्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांसाठी जमले ते सगळे करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलFarmerशेतकरीPurandarपुरंदरBJPभाजपा