शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची तरतूद ; उर्वरित मदत केंद्राकडे मागणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 14:57 IST

राज्यात दीर्घकाळ मुक्काम केलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याकरिता प्राथमिक स्तरावर १० हजार कोटींची तरतुद करण्यात आले असून उर्वरित मदत केंद्राकडे मागणार असल्याचे महसूलमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 

पुणे : राज्यात दीर्घकाळ मुक्काम केलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याकरिता प्राथमिक स्तरावर १० हजार कोटींची तरतुद करण्यात आले असून उर्वरित मदत केंद्राकडे मागणार असल्याचे महसूलमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 

पुरंदर तहसील कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. त्या आधी त्यांनी पुरंदर तालुक्यातील भिवरी, बोपदेव, चांबळी आणि हिवरे भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत सर्व नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले. 

 पुढे ते म्हणाले की, वेगवेगळ्या भागातले नुकसान वेगवेगळे आहे. जसे की मावळमध्ये तांदूळ पिकाचे नुकसान झाले आहे. पुरंदरमध्ये फळ बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे परतावाही वेगवेगळ्या प्रमाणात असेल.प्राथमिक अंदाज घेऊन १० हजार रुपये प्रति हेक्टर जाहीर केले आहेत. मात्र नंतर नुकसान बघून तो वाढवून मिळेल असेही त्यांनी जाहीर केले.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेव्यतिरिक्त किती नुकसान भरपाई द्यावी लागेल याची चाचपणी सुरु आहे. फळबागांच्या नुकसानाचा पंचनामा प्रशासन करत नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली.त्यावर पाटील यांनी प्रशासनाला 'माणूस गरीब आहे की श्रीमंत हे महत्वाचे नाही. तर आजारी आहे हे महत्वाचे असते. त्याचप्रमाणे शेतकरी फळ पिकवतो की भाजीपाला यापेक्षा त्याचे नुकसान झाले आहे हे अधिक महत्वाचे सांगितले, असे सांगून पंचनाम्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांसाठी जमले ते सगळे करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलFarmerशेतकरीPurandarपुरंदरBJPभाजपा