शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची तरतूद ; उर्वरित मदत केंद्राकडे मागणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 14:57 IST

राज्यात दीर्घकाळ मुक्काम केलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याकरिता प्राथमिक स्तरावर १० हजार कोटींची तरतुद करण्यात आले असून उर्वरित मदत केंद्राकडे मागणार असल्याचे महसूलमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 

पुणे : राज्यात दीर्घकाळ मुक्काम केलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याकरिता प्राथमिक स्तरावर १० हजार कोटींची तरतुद करण्यात आले असून उर्वरित मदत केंद्राकडे मागणार असल्याचे महसूलमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 

पुरंदर तहसील कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. त्या आधी त्यांनी पुरंदर तालुक्यातील भिवरी, बोपदेव, चांबळी आणि हिवरे भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत सर्व नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले. 

 पुढे ते म्हणाले की, वेगवेगळ्या भागातले नुकसान वेगवेगळे आहे. जसे की मावळमध्ये तांदूळ पिकाचे नुकसान झाले आहे. पुरंदरमध्ये फळ बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे परतावाही वेगवेगळ्या प्रमाणात असेल.प्राथमिक अंदाज घेऊन १० हजार रुपये प्रति हेक्टर जाहीर केले आहेत. मात्र नंतर नुकसान बघून तो वाढवून मिळेल असेही त्यांनी जाहीर केले.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेव्यतिरिक्त किती नुकसान भरपाई द्यावी लागेल याची चाचपणी सुरु आहे. फळबागांच्या नुकसानाचा पंचनामा प्रशासन करत नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली.त्यावर पाटील यांनी प्रशासनाला 'माणूस गरीब आहे की श्रीमंत हे महत्वाचे नाही. तर आजारी आहे हे महत्वाचे असते. त्याचप्रमाणे शेतकरी फळ पिकवतो की भाजीपाला यापेक्षा त्याचे नुकसान झाले आहे हे अधिक महत्वाचे सांगितले, असे सांगून पंचनाम्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांसाठी जमले ते सगळे करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलFarmerशेतकरीPurandarपुरंदरBJPभाजपा