शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra | शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने मिळणार शेतीकर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 14:25 IST

शेती कर्जासाठी अर्धा टक्के व्याजदर वाढविल्याने शेतकऱ्यांसाठीची शून्य टक्के व्याजदर योजना संकटात सापडली होती...

पुणे : केंद्र सरकारने शेती कर्जासाठी अर्धा टक्के व्याजदर वाढविल्याने शेतकऱ्यांसाठीची शून्य टक्के व्याजदर योजना संकटात सापडली होती. या अर्धा टक्का व्याजाचा बोजा घेण्याबाबत संभ्रम होता. ही योजना बारगळण्याची चिन्हे होती. आता राज्य सहकारी बँकेने याची जबाबदारी घेतली असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या व्याजापोटी बँकेला १५० कोटींचा भार सहन करावा लागणार आहे, अशी माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पीककर्जाच्या व्याजात तीन टक्के सवलत मिळत होती. याशिवाय, केंद्र सरकारकडून दोन टक्क्यांचा व्याज परतावा मिळत होता. उर्वरित एक टक्का जिल्हा बँका नफ्यातून तरतूद करत सोसत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज हे शून्य टक्के व्याजाने मिळत असे.

सहा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने व्याज परतावा तीन टक्क्यांवरून अडीच टक्के केल्याने हा अर्धा टक्क्याचा भार कुणी सोसावा यावरून संभ्रम निर्माण झाला होता. राज्य सरकारने याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने जिल्हा बँका अडचणीत आल्या होत्या. शेतकऱ्यांसाठी हा भार सोसल्यास बँकांचे आर्थिक नियोजन डळमळीत होण्याची भीती बँकांकडून व्यक्त केली जात होती. राज्य सरकारने भार उचलावा, असे केंद्राचे म्हणणे होते. मात्र, त्याबाबत कोणतीही पावले उचलली जात नसल्याने ही पीककर्ज योजना यावर्षीपासून कायमस्वरूपी बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, यावर मार्ग काढण्यासाठी राज्य सहकारी बँकेने पुढाकार घेण्याची आणि अर्धा टक्क्याचा भार सोसण्याची सूचना राज्याच्या सहकार विभागाच्या प्रधान सचिवांनी नोव्हेंबरमध्ये राज्य सहकारी बँकेला केली होती. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने खरीप व रब्बी हंगामात मिळून जिल्ह्यातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे पीककर्ज या योजनेतून दिले जाते.

नुकत्याच झालेल्या एका बैठकीत केंद्रीय सहकार खात्याचे सचिव ज्ञानेशकुमार यांनी हा बोजा राज्य सहकारी बँकेने उचलावा, अशी सूचना केली. केंद्र व राज्य सरकारने केलेल्या सूचनेनुसार हा बोजा राज्य सहकारी बँकेने उचलण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे बँकेला १५० कोटींचा बोजा सहन करावा लागणार आहे. कर्जात वाढ झाली तर ही रक्कम आणखी वाढेल.

- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, राज्य सहकारी बँक प्रशासक मंडळ

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFarmerशेतकरी