शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Maharashtra | शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने मिळणार शेतीकर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 14:25 IST

शेती कर्जासाठी अर्धा टक्के व्याजदर वाढविल्याने शेतकऱ्यांसाठीची शून्य टक्के व्याजदर योजना संकटात सापडली होती...

पुणे : केंद्र सरकारने शेती कर्जासाठी अर्धा टक्के व्याजदर वाढविल्याने शेतकऱ्यांसाठीची शून्य टक्के व्याजदर योजना संकटात सापडली होती. या अर्धा टक्का व्याजाचा बोजा घेण्याबाबत संभ्रम होता. ही योजना बारगळण्याची चिन्हे होती. आता राज्य सहकारी बँकेने याची जबाबदारी घेतली असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या व्याजापोटी बँकेला १५० कोटींचा भार सहन करावा लागणार आहे, अशी माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पीककर्जाच्या व्याजात तीन टक्के सवलत मिळत होती. याशिवाय, केंद्र सरकारकडून दोन टक्क्यांचा व्याज परतावा मिळत होता. उर्वरित एक टक्का जिल्हा बँका नफ्यातून तरतूद करत सोसत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज हे शून्य टक्के व्याजाने मिळत असे.

सहा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने व्याज परतावा तीन टक्क्यांवरून अडीच टक्के केल्याने हा अर्धा टक्क्याचा भार कुणी सोसावा यावरून संभ्रम निर्माण झाला होता. राज्य सरकारने याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने जिल्हा बँका अडचणीत आल्या होत्या. शेतकऱ्यांसाठी हा भार सोसल्यास बँकांचे आर्थिक नियोजन डळमळीत होण्याची भीती बँकांकडून व्यक्त केली जात होती. राज्य सरकारने भार उचलावा, असे केंद्राचे म्हणणे होते. मात्र, त्याबाबत कोणतीही पावले उचलली जात नसल्याने ही पीककर्ज योजना यावर्षीपासून कायमस्वरूपी बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, यावर मार्ग काढण्यासाठी राज्य सहकारी बँकेने पुढाकार घेण्याची आणि अर्धा टक्क्याचा भार सोसण्याची सूचना राज्याच्या सहकार विभागाच्या प्रधान सचिवांनी नोव्हेंबरमध्ये राज्य सहकारी बँकेला केली होती. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने खरीप व रब्बी हंगामात मिळून जिल्ह्यातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे पीककर्ज या योजनेतून दिले जाते.

नुकत्याच झालेल्या एका बैठकीत केंद्रीय सहकार खात्याचे सचिव ज्ञानेशकुमार यांनी हा बोजा राज्य सहकारी बँकेने उचलावा, अशी सूचना केली. केंद्र व राज्य सरकारने केलेल्या सूचनेनुसार हा बोजा राज्य सहकारी बँकेने उचलण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे बँकेला १५० कोटींचा बोजा सहन करावा लागणार आहे. कर्जात वाढ झाली तर ही रक्कम आणखी वाढेल.

- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, राज्य सहकारी बँक प्रशासक मंडळ

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFarmerशेतकरी