शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Maharashtra | शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने मिळणार शेतीकर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 14:25 IST

शेती कर्जासाठी अर्धा टक्के व्याजदर वाढविल्याने शेतकऱ्यांसाठीची शून्य टक्के व्याजदर योजना संकटात सापडली होती...

पुणे : केंद्र सरकारने शेती कर्जासाठी अर्धा टक्के व्याजदर वाढविल्याने शेतकऱ्यांसाठीची शून्य टक्के व्याजदर योजना संकटात सापडली होती. या अर्धा टक्का व्याजाचा बोजा घेण्याबाबत संभ्रम होता. ही योजना बारगळण्याची चिन्हे होती. आता राज्य सहकारी बँकेने याची जबाबदारी घेतली असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या व्याजापोटी बँकेला १५० कोटींचा भार सहन करावा लागणार आहे, अशी माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पीककर्जाच्या व्याजात तीन टक्के सवलत मिळत होती. याशिवाय, केंद्र सरकारकडून दोन टक्क्यांचा व्याज परतावा मिळत होता. उर्वरित एक टक्का जिल्हा बँका नफ्यातून तरतूद करत सोसत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज हे शून्य टक्के व्याजाने मिळत असे.

सहा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने व्याज परतावा तीन टक्क्यांवरून अडीच टक्के केल्याने हा अर्धा टक्क्याचा भार कुणी सोसावा यावरून संभ्रम निर्माण झाला होता. राज्य सरकारने याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने जिल्हा बँका अडचणीत आल्या होत्या. शेतकऱ्यांसाठी हा भार सोसल्यास बँकांचे आर्थिक नियोजन डळमळीत होण्याची भीती बँकांकडून व्यक्त केली जात होती. राज्य सरकारने भार उचलावा, असे केंद्राचे म्हणणे होते. मात्र, त्याबाबत कोणतीही पावले उचलली जात नसल्याने ही पीककर्ज योजना यावर्षीपासून कायमस्वरूपी बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, यावर मार्ग काढण्यासाठी राज्य सहकारी बँकेने पुढाकार घेण्याची आणि अर्धा टक्क्याचा भार सोसण्याची सूचना राज्याच्या सहकार विभागाच्या प्रधान सचिवांनी नोव्हेंबरमध्ये राज्य सहकारी बँकेला केली होती. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने खरीप व रब्बी हंगामात मिळून जिल्ह्यातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे पीककर्ज या योजनेतून दिले जाते.

नुकत्याच झालेल्या एका बैठकीत केंद्रीय सहकार खात्याचे सचिव ज्ञानेशकुमार यांनी हा बोजा राज्य सहकारी बँकेने उचलावा, अशी सूचना केली. केंद्र व राज्य सरकारने केलेल्या सूचनेनुसार हा बोजा राज्य सहकारी बँकेने उचलण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे बँकेला १५० कोटींचा बोजा सहन करावा लागणार आहे. कर्जात वाढ झाली तर ही रक्कम आणखी वाढेल.

- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, राज्य सहकारी बँक प्रशासक मंडळ

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFarmerशेतकरी