शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Maharashtra Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट - कॅँटोन्मेंटकरांची साथ कुणाला लाभदायी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:12 PM

जनतेची मर्जी राखून त्यानुसार काम करणाऱ्यास पसंती मिळणार आहे.

ठळक मुद्दे शेट्टींच्या बंडखोरीचा फायदा कुणाला?

- युगंधर ताजणे - प्रत्यक्षात मतदानाकरिता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. उमेदवारांनी आता प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिला असून, घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन ते करताना दिसत आहे. कँटोन्मेंट मतदारसंघात कुणाचा वरचष्मा राहणार याबाबत विविध मते वर्तविली जात असली तरी या भागात विकासकामांना न्याय देणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. अर्थात पूर्वीपासून कॉँग्रेसचा बाल्लेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या मुद्यावर मतदारांकडून मतदानाचे दान पदरात पाडून घेणाऱ्या राजकीय नेत्यांना जनतेने धडा शिकवला आहे. यंदाच्या विधानसभेत काँग्रेसचे रमेश बागवे व भाजपचे सुनील कांबळे या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. यांच्यासह मनसेच्या मनीषा सरोदे, आपकडून खेमदेव सोनवणे, वंचितकडून लक्ष्मण आरडे, एमआयएम पक्षाकडून हीना मोमीन आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र खरी लढत कॉग्रेस व भाजप यांच्यातच होणार असल्याचे बोलले जात आहे. कॉँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाने भाजपमध्ये केलेला प्रवेश भाजपकरिता कितपत लाभदायी ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. सुरुवातीला शिवसेना, भाजप, कॉँग्रेस या पक्षांमधील काहींनी बंडखोरी करून निवडणूक लढविण्यचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांनी माघार घेऊन तडजोड करण्यात समाधान मानले. आतापर्यंत एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दिन ओवेसी, भाजपकडून चंद्रकांत पाटील, अभिनेता सनी देओल, याशिवाय कॉग्रेस राष्ट्रवादीकडून खासदार अमोल कोल्हे आदी मान्यवर नेत्यांच्या प्रचारासभा पार पडल्या आहेत. दोन दिवसांनी प्रचाराचा हा धुरळा खाली बसणार आहे. या मतदारसंघातील जलवाहिनीचा, वाहतूककोंडीचा, झोपडपट्टी पुनर्वसन, रोजगार, महिला सक्षमीकरण, वीजपुरवठ्याचे प्रश्न, असे वेगवेगळे प्रश्न अद्याप सुटलेले नसल्याने मतदार नेमका कुठला विचार करुन कुणाच्या बाजूने आपला कौल देतात हे सांगणे अवघड आहे. मागील अनेक वर्षांपासून नेतृत्व करणाऱ्यापक्षाने देखील मूलभूत सोयीसुविधांना बगल दिली असल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. निवडणुकीपुरते फिरकायचे त्यानंतर पुन्हा पाच वर्षे आमदार आणि मतदार यांचा संवादच होत नसल्याचे पाहवयास मिळाले आहे. जनतेची मर्जी राखून त्यानुसार काम करणाऱ्यास पसंती मिळणार आहे........ शेट्टींच्या बंडखोरीचा फायदा कुणाला?कॉग्रेसचे माजी नगरसेवक व शहर उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे चर्चेला उधाण आले. निवडणुकीच्या सुरुवातीला काँग्रेसकडून बंडखोरी करून निवडणूक लढविण्याची भाषा करणाऱ्या शेट्टींचा फायदा नेमका कुणाला होणार, हे पाहणे औत्सुक्यपूर्ण असेल. त्यांनी कांबळे यांना दिलेला पाठिंबा कितपत यशस्वी ठरणार? हे चित्र काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकVotingमतदानPoliticsराजकारण