शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

Maharashtra election 2019: कलम ३७० हे महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंधित नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 2:33 PM

या सरकारने पाच वर्षात काय केलं हे सांगावे. कलम ३७० हे काही महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंधित नाही असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यात केले. 

पुणे : या सरकारने पाच वर्षात काय केलं हे सांगावे. कलम ३७० हे काही महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंधित नाही असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यात केले. 

भाजपच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी काश्मीरमधून हटवलेले कलम ३७० हा मुद्दा आहे. या मुद्द्यावर आता विरोधक उत्तर देऊ बघत आहेत. याच मुद्दयावर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित बैठकीआधी पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, 'इथे बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या असे अनेक प्रश्न आहेत.जातीयवाद उफाळतो आहे मात्र त्यावर सत्ताधारी काही बोलत नाहीत. ही देशाची निवडणूक नाही. राज्याची निवडणूक आहे. कलम ३७०चा मुद्दा राज्यात नाही असेही ते म्हणाले. 

  

मंगळवारी झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर  निशाणा साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, “अजित पवारांच्या डोळ्यात पाणी आलेलं महाराष्ट्रानं पाहिलं. ते पाणी पाहून मला मगरीचे अश्रूच आठवले. तुमच्याकडे जेव्हा माझा शेतकरी पाणी मागायला आला तेव्हा तुम्ही त्याला उदाहरण काय दिलं? आठवा. काय बोलला होतात ते विसरु नका.” आता त्यावर पवार यांनी उत्तर दिले आहे.   

पवार म्हणाले की, ' 5 वर्ष शिवसेना सरकारमध्ये होती. त्यांनी फक्त पोकळ आश्वासन  दिली. राज्यात  बेरोजगारी ,शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, त्याच उत्तर त्यांनी द्यावे.  पीक विमा का मिळाले नाहीत असा सवालही त्यांनी विचारला.  मी कसा आहे ते लोकांना माहिती आहे. माझे अश्रू मगरीचे आहेत की कशाचे हे तपासायचं काम उध्दव ठाकरे कधीपासून करायला लागले असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Article 370कलम 370Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाPoliticsराजकारण