शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

“राज ठाकरेंची हिंदुत्वाची शाल नवी की जुनी?”; फडणवीस म्हणाले, “हे काळच ठरवेल…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 20:25 IST

काही पक्षांना हिंदुत्वाची शाल पांघरावी लागत आहे, असं म्हणत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी टोला लगावला.

काही पक्षांना हिंदुत्वाची शाल पांघरावी लागत आहे, असं म्हणत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी टोला लगावला. ‘भाजपा : काल आज आणि उद्या’ या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यादरम्यान फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीसाना हा नेमका टोला कोणाला लगावला? जुन्या मित्राला की होऊ घातलेल्या नव्या मित्राला? रोख कोणाकडे आहे?, असा सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीसांनी हे वक्तव्य केलं.

“महाराष्ट्रातील फार मोठे साहित्यिक आहेत, त्यांनी १५-२० वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिलंय. हिंदुत्वाची शाल कोणी पांघरली आहे आणि खरं हिंदुत्व हे कोणाच्या रक्तात आहे हे त्यांनी सांगितलंय. त्यामुळे जरूर ते पुस्तक वाचावं. त्यामुळे मी कोणाला बोललोय ते त्यांनाही समजलेलं असावं आणि जनतेलाही,” असं फडणवीस म्हणाले. यानंतर त्यांना राज ठाकरे यांनी पांघरलेली ही जी शाल आहे ती नवी शाल आहे का जुनी असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी ते काळच ठरवणार असल्याचं म्हटलं.

“… तरी भ्रष्टाचार बाहेर काढणारच”“आमचा घाव वर्मी बसला याचं आम्हाला समाधान आहे. ज्या प्रकारे आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढतोय, त्यांना आता अस्वस्थ वाटतंय. म्हणून ते आमच्या यात्रेवर हल्ला करतायत. मी त्यांना स्पष्टपणे सांगतो कितीही हल्ला केला तरी पोलखोल थांबणार नाही, आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढतच राहू,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यासाठी सुरक्षा पुरवली जाणार की नाही, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. “हे सांगण्याचा अधिकार माझा नाही आणि ते सांगण्याची आवश्यकताही नाही. यासंदर्भातील सर्व निर्णय कायदा आणि सुव्यवस्था पाहणारे त्या त्या राज्यातील लोक पाहत असतात. यासंदर्भात संबंधित व्यक्ती उत्तर देतील,” असं  फडणवीस त्यावर म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMNSमनसे