शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

Maharashtra: राज्याच्या जलसाठ्यात २० टक्के घट, आता परतीच्या पावसावरच लक्ष

By नितीन चौधरी | Updated: September 26, 2023 17:09 IST

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ ३५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे येथे शेतीच्या सिंतनासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे....

पुणे : मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून राज्यात २९ सप्टेंबरनंतर चांगला पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, जून ते २६ सप्टेंबरपर्यंत राज्यात झालेल्या पावसामुळे आतापर्यंत केवळ ७१ टक्के उपयुक्त जलसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा तब्बल २० टक्क्यांनी कमी आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ ३५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे येथे शेतीच्या सिंतनासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

राज्यात १ जून ते २६ सप्टेंबर या काळामध्ये ९८० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस होत असतो. त्यानुसार राज्यात आतापर्यंत ८७५ मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या तो ८९.३० टक्के इतका आहे. या पावसामुळे राज्यातील मोठे, मध्यम व लघ अशा २ हजार ९९४ प्रकल्पांमध्ये मिळून २८ हजार ६७३ दशलक्ष घन मीटर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सरासरीच्या हा साठा ७०.८३ टक्के इतका आहे. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा ८९.३३ टक्के इतका होता. राज्यात सर्वात कमी पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर विभागात २५२५.४६ दलघमी अर्थात ३५.०६ टक्के इतका आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतीसाठी पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. परतीच्या पावसाचा या विभागाला फारसा फायदा होत नसल्याने रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दुसरीकडे कोकण विभागात ९४ टक्के जलसाठा असून त्यानंतर नागपूर विभागात ८५.५५ टक्के, अमरावती विभागात ७८, पुणे विभागात ७५, नाशिक विभागात ७३ टक्के पाणीसाठा आहे.

पाचशे टँकर सुरू-

राज्यात गेल्या वर्षी याच महिन्यात एकही पाण्याचा टँकर सुरू होत नव्हता. मात्र यंदा पाऊसच कमी झाल्याने राज्यातील ४४७ गावांमध्ये पाण्याचे ४९४ टँकर सुरू झाले आहेत. यावरूनच उन्हाळ्यात दुष्काळाची स्थिती कशी असेल याचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.

विभाग उपयुक्त जलसाठा (दलघमी) यंदाची टक्केवारी गेल्या वर्षीचा साठा (टक्क्यांत)

नागपूर ३९४०.९५--८५.५५--८८.१४

अमरावती २९४६.३७--७८.०५--९२.५३संभाजीनगर ४३०८.१८--३५.०६--८५.२०

नाशिक ५१४७.४४--७३.२०--८५.६३पुणे १४५२६.८६--७५.०५--९२.००

कोकण ३६५४.७५--९४.११--९०.६२एकूण ३६२७९.२४--७०.८३--८९.३३

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस