शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

माधुरी मिसाळ यांना शिक्षा की मोकळीक? समर्थक अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 06:00 IST

विधानसभा निवडणुकीत दोन जागा गमावल्याची इतकी मोठी शिक्षा असणार नाही असे कार्यकर्त्यांना वाटते. मिसाळ यांच्या समर्थकांना पडलेला प्रश्न

ठळक मुद्दे विधानसभा निवडणूकीत त्या स्वत: आमदार असतानाही त्यांच्याकडेच त्या पदाची जबाबदारी महिला शहराध्यक्ष म्हणूनही मिसाळ यांची एक वेगळी ओळख या सहा महिन्यात तयार

पुणे: फक्त सहा महिन्यांपूर्वीच दिलेले पद काढून घेतल्यामुळे आमदार माधुरी मिसाळ यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यातही विधानसभेला स्वत: आमदार असूनही पदाची जबाबदारी सांभाळूनही अचानक त्या पदावरून बाजूला व्हायला का सांगितले जावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी तत्कालीन शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना पक्षाने असेच अचानक त्या पदावरून बाजूला व्हायला सांगितले. त्यावेळी मिसाळ यांच्याकडे ते पद देण्यात आले. नंतर विधानसभा निवडणूकीत त्या स्वत: आमदार असतानाही त्यांच्याकडेच त्या पदाची जबाबदारी ठेवण्यात आली. आता राज्यात पक्षाची सत्ता नाही, त्यामुळे मिसाळ यांना मंत्रीपद वगैरे मिळण्याचीही शक्यता नाही, तरीही त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत दोन जागा गमावल्याची इतकी मोठी शिक्षा असणार नाही असे कार्यकर्त्यांना वाटते. मिसाळ विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून आल्या. त्यांच्याच मतदारसंघात भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. महिला म्हणून त्यांच्याशी बोलताना अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांना सावधपणे बोलावे लागते. कार्यकर्त्यांची एक मोठी फळी त्यांच्या मागे कायम उभी असते. आपल्या विधानसभा मतदारसंघात त्यांनी संघटना म्हणून उत्तम काम केले आहे. इतक्या अधिकच्या गोष्टी असतानाही पक्षाने असा निर्णय का घेतला अशी कुजबूज मिसाळ यांच्या समर्थकांमध्ये आहे.महिला शहराध्यक्ष म्हणूनही मिसाळ यांची एक वेगळी ओळख या सहा महिन्यात तयार झाली होती. त्यांचा म्हणून एक वेगळा गट शहरात अस्तित्वात आहे. त्याला या पदामुळे बळ मिळू लागले होते. पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली होती. त्यांचे हे स्वतंत्र अस्तित्व व त्याला मिळणारी ताकद काहीजणांना शहरातील राजकीय वर्चस्वाला धक्का लावणारी वाटू लागली होती. त्यातूनच हा निर्णय झाला असल्याचेही पक्षात बोलले जात आहे...............मिसााळ म्हणतात...स्वत: माधुरी मिसाळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की मुळातच हे पद तीन महिन्यांसाठी म्हणजे तात्पुरते स्विकारले होते. निवडणूक तोंडावर असल्यामुळे पक्षश्रेष्ठींना त्यावर शहरातील कोणी पदाधिकारी व्यक्ती असावी असे वाटत होते. पक्षाने सांगितले म्हणून ते स्विकारले, त्यावर सहा महिने कामही केले, मात्र पक्षात अनेकजण काम करत असतात, त्यांनाही संधी हवी असते, त्यामुळे जाणीवपुर्वक पद सोडले असे मिसाळ यांनी सांगितले. पक्षाने पद सोडायला सांगितले यात काही तथ्य नाही असे त्या म्हणाल्या. ‘‘आमदार म्हणून मतदारसंघात बराच वेळ द्यावा लागतो. एखादे पद घेतले की त्यावर जबाबदारीने काम करावे लागते. तसे केले नाही तर अपराधी वाटते. दोन्ही पदांवर राहून काम करणे योग्य व शक्यही नव्हते. त्यामुळेच पद सोडले. पक्षाने घेतलेला निर्णय योग्यच आहे,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Puneपुणेmadhuri misalमाधुरी मिसाळBJPभाजपाElectionनिवडणूक