शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

मावळातील १२ कोटींच्या भात पिकाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 14:27 IST

शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेला

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : पंचनाम्याचा अहवाल प्रशासनाकडून शासनाकडे सादरभरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी 

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या ५ हजार ४३६.७९ हेक्टरचे सर्व पंचनामे झाले असून, झालेल्या नुकसानीचे ११ कोटी ९१ लाख रुपये मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळावेत, यासाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी याबाबत माहिती दिली. अवकाळी पावसामुळे  मावळ तालुक्यातील १७८ गावांतील १२ हजार ७१४ शेतकऱ्यांचे भात पिकाचे नुकसान झाले होते. २० हजार ४०० रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई  मिळावी, असा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे करून याचा अहवाल शासनाकडे पाठवावा, अशी मागणी आमदार सुनील शेळके व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह विविध पक्षांतील शिष्टमंडळाने केली होती. यानंतर कृषी व महसूल खात्याने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शासनाने पाठवले. मावळ तालुक्यात भात हेच खरिपाचे मुख्य पीक असून यावर्षी १२ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेण्यात आले. यंदाच्या हंगामात भात पिकाला आवश्यक गरजेच्या वेळी पाऊस झाल्याने पीक जोमात आले होते. यावर्षी भाताचे उत्पन्न चांगले येईल, या आशेवर शेतकरी आनंदात होता. परंतु आॅगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यात ९२० हेक्टर भात पिकाचे नुकसान झाले..........शेतकºयांच्या तोंडचा घास हिरावला १मावळ परिसरातील पिकांचे नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामेदेखील करण्यात आले होते. जे पीक शेतात राहिले, त्यावर शेतकऱ्यांनी समाधान मानले. परंतु ऐन काढणीच्या हंगामात अवकाळी पाऊस सुरू राहिल्याने या पिकाचे पुन्हा नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेला. भरपाई कधी मिळणार याबाबत प्रतिक्षा आहे.........भरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी परतीच्या पावसाचा मावळ तालुक्यात मुक्काम लांबला होता. त्यानंतर अवकाळी पावसामुळेही शेतकरी हवालदिल झाले होते. भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील नुकसान झालेल्या भात पिकांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. परंतु सदरची रक्कम कधी मिळणार या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmavalमावळRainपाऊसFarmerशेतकरी