शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

चेंगराचेंगरीची वाट पाहताय का? लोहगडावर चार तास अडकले पर्यटक, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 10:33 AM

पर्यटन विभाग आता चेंगराचेंगरीची वाट पाहात आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे....

पुणे : पावसाळा आला की, पर्यटनाला अक्षरश: ऊत येताे. किल्ल्यांवर भटकंती करण्याला प्राधान्य दिले जाते; परंतु, किल्ल्यांवर किती लाेकांचा वावर सयुक्तिक आहे, याचा विचारच केला जात नाही. शहरात होणारी गर्दी आता सुटीच्या दिवशी किल्ल्यांवर होत आहे. लोहगडावर रविवारी हजारो पर्यटक चार तास अडकून पडले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे पर्यटन विभाग आता चेंगराचेंगरीची वाट पाहात आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

फाेटाे, रिल्सच्या माेहापायी जीव धाेक्यात

फोटो किंवा रिल्सच्या मोहापायी जोखीम घेतली जाते. गाइड घेऊन न जाणे, कठीण कड्यांवर फोटोसाठी प्रयत्न करणे आणि अतिआत्मविश्वास ही अपघातांची मूळ कारणे आहेत, असे रेस्क्यू समन्वयक ओंकार ओक यांनी सांगितले.

‘हाॅटस्पाॅट’चे नियाेजन गरजेचे!

अनेक ठिकाणी ‘बॉटलनेक्स’ तयार होत असून, एखाद्या प्रसंगी चेंगराचेंगरी होऊन अतिशय दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता आहे. शासनाने यावर निर्बंध घातले नाहीत, तर सह्याद्रीत मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढून पर्यटन अतिशय वेगळ्या वळणाला जाऊ शकते. या ‘हॉट स्पॉट्स’चे अतिशय काटेकोर नियोजन करणे हा एकमेव मार्ग आहे.

प्रवेश मर्यादेबाबत विचार करणे आवश्यक

लोहगडावर २५ रुपये प्रवेश शुल्क घेतले जाते. किती पर्यटकांना प्रवेश द्यायचा यावर मर्यादा आवश्यक आहे, असे काही पर्यटकांचे म्हणणे आहे.

रविवारी २ जुलै रोजी चेंबूर येथील पाच-सहा पर्यटकांनी माहुली किल्ल्यावर जाताना पायथ्याच्या डॅमपासून चुकीची वाट धरली. त्यांनी रेस्क्यूला कॉल केला. लाइव्ह लोकेशन मागवून माहुली येथील गुरुनाथ आगीवले, रघुनाथ आगीवले व सुनील आगीवले ह्यांच्याशी संपर्क साधला. हे तिघे भर पावसात गडावर निघाले. तिघांनी तासाभरात त्यांची सुटका केली.

- ओंकार ओक, रेस्क्यू समन्वयक, पुणे

टॅग्स :lohgadलोहगडPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड