शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील वाढती लोकसंख्या पाहता नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन पुण्याची गरज : नितीन गडकरी

By निलेश राऊत | Updated: May 11, 2024 17:27 IST

जे काँग्रेसला साठ वर्षांत जमले नाही त्याच्या तीन पट विकास गेल्या दहा वर्षांत झाला, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले....

पुणे : काँग्रेसला ६० वर्षे सत्ता देऊनही काही उपयोग झाला नाही. गेल्या १० वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा वाढविल्या. २५ कोटी नागरिकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणले. जे काँग्रेसला साठ वर्षांत जमले नाही त्याच्या तीन पट विकास गेल्या दहा वर्षांत झाला, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मोहोळ भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, श्रीनाथ भिमाले, हेमंत रासने, स्वरदा बापट, शैलेश टिळक यांच्यासह भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ‘रिपाइं’चे पदाधिकारी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, विकासकामे करताना पायाभूत सुविधा खूप महत्त्वाच्या असतात. गेल्या दहा वर्षांत सर्वत्र या सुविधा दिल्या गेल्या. त्यामुळे दळणवळण वाढले. वीज, पाणी, रस्ते यामुळे उद्योग वाढला आणि देशात रोजगार वाढला. आज देश विविध प्रकारच्या वस्तू आयात करण्यापेक्षा निर्यात करीत आहे. त्यामुळे भारत जगात तिसरी मोठी आर्थिक महासत्ता बनत आहे.

पुण्यातील वाढती लोकसंख्या पाहता नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन पुण्याची गरज आहे. वाहतूक कोंडी, प्रदूषण, अपुरे रस्ते यामुळे पुणेकर त्रस्त आहेत. त्यामुळेच रिंगरोडची आखणी केली असून, महामार्गावरील वाहतूक शहरात येणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. यासाठी पुण्याच्या रिंगरोडची अलाइनमेंट पूर्ण झाली आहे. नवीन विमानतळ, रेल्वे, मेट्रो, डबलडेकर रस्ते यामुळे पुण्याचे जीवन सुसह्य होणार असून, बाहेरील रस्त्यांची कामे निवडणुकीनंतर सुरू होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीpune-pcपुणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४murlidhar moholमुरलीधर मोहोळ