शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

पुण्यातील वाढती लोकसंख्या पाहता नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन पुण्याची गरज : नितीन गडकरी

By निलेश राऊत | Updated: May 11, 2024 17:27 IST

जे काँग्रेसला साठ वर्षांत जमले नाही त्याच्या तीन पट विकास गेल्या दहा वर्षांत झाला, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले....

पुणे : काँग्रेसला ६० वर्षे सत्ता देऊनही काही उपयोग झाला नाही. गेल्या १० वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा वाढविल्या. २५ कोटी नागरिकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणले. जे काँग्रेसला साठ वर्षांत जमले नाही त्याच्या तीन पट विकास गेल्या दहा वर्षांत झाला, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मोहोळ भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, श्रीनाथ भिमाले, हेमंत रासने, स्वरदा बापट, शैलेश टिळक यांच्यासह भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ‘रिपाइं’चे पदाधिकारी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, विकासकामे करताना पायाभूत सुविधा खूप महत्त्वाच्या असतात. गेल्या दहा वर्षांत सर्वत्र या सुविधा दिल्या गेल्या. त्यामुळे दळणवळण वाढले. वीज, पाणी, रस्ते यामुळे उद्योग वाढला आणि देशात रोजगार वाढला. आज देश विविध प्रकारच्या वस्तू आयात करण्यापेक्षा निर्यात करीत आहे. त्यामुळे भारत जगात तिसरी मोठी आर्थिक महासत्ता बनत आहे.

पुण्यातील वाढती लोकसंख्या पाहता नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन पुण्याची गरज आहे. वाहतूक कोंडी, प्रदूषण, अपुरे रस्ते यामुळे पुणेकर त्रस्त आहेत. त्यामुळेच रिंगरोडची आखणी केली असून, महामार्गावरील वाहतूक शहरात येणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. यासाठी पुण्याच्या रिंगरोडची अलाइनमेंट पूर्ण झाली आहे. नवीन विमानतळ, रेल्वे, मेट्रो, डबलडेकर रस्ते यामुळे पुण्याचे जीवन सुसह्य होणार असून, बाहेरील रस्त्यांची कामे निवडणुकीनंतर सुरू होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीpune-pcपुणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४murlidhar moholमुरलीधर मोहोळ