शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

'अधिक काळ सत्ता असली की माज येतो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 06:54 IST

संजय नहार यांना रामकृष्ण मोरे जीवनगौैरव पुरस्कार

पुणे : ‘भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांची देशाला गरज आहे. पक्षांमध्ये चांगले कार्यकर्ते असणे महत्त्वाचे असते. कोणत्याही एका पक्षाला जास्त वेळ सत्ता मिळाली की माज येतो. लोकशाही कायम टिकवून ठेवायची असेल तर दोन्ही पक्ष सशक्त होण्याची गरज आहे. कोणत्याही पक्षाला मंदिर, पुतळे बांधणाऱ्या नेत्यांची नव्हे, तर प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर मार्मिक टिप्पणी केली. दाखल्यावरची जात जात नाही, तोवर जाती निर्मूलनाकडे जाता येणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानच्या वतीने माजी शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या नावाने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांना प्रदान करण्यात आला. सूर्यकांत पलांडे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. गजानन एकबोटे, रामदास फुटाणे, मोहन जोशी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.फुटाणे म्हणाले, ‘प्रत्येक पक्षात तीन प्रकारचे नेते असतात. रामकाटी बाभळ म्हणजे त्यांचा संबंध थेट हाय कमांडशी असतो. सुबाभळ वर्गातील नेते कालपर्यंत कुठेच नसतात. अचानक अनुभवी नेत्यांपेक्षा त्यांना जास्त महत्त्व प्राप्त होते. तिसरा वर्ग म्हणजे येडी बाभळ अर्थात सामान्य कार्यकर्ते असतात. कोणताही राजकीय पक्ष त्यांच्यावरच उभा असतो. आता पक्षांमधील येडी बाभळ कमी झाली असून भक्तांची संख्या वाढली आहे. भक्तांमुळे पक्ष संकटात येतो. अभिनंदन थोरात यांनी प्रास्ताविक केले. संजय बालगुडे यांनी सूत्रसंचालन केले.माणसांचे महामंडळ काढण्याची गरजसमाजात धर्मांधता वाढली आहे, याचा फायदा राजकीय पक्ष घेत आहेत. काँग्रेसने प्रत्येक जातीचे महामंडळ काढून जातीयतेला थारा दिला. भाजपाही सर्व जातीतील नेत्यांना मंत्रिपदे देऊन तोच कित्ता गिरवत आहेत. त्यापेक्षा माणसांचे महामंडळ काढण्याची गरज आहे, असे फुटाणे म्हणाले. नहार म्हणाले, ‘इतिहासात सगळ्या प्रशांची उत्तरे लपलेली आहेत. आपण उत्तरे शोधण्याऐवजी प्रश्न घेऊन पुढे जात आहोत. तो समाज सोयीस्करपणे उत्तरे विसरून प्रश्नांना चिकटून राहतो, त्या समाजाचे अस्तित्व धोक्यात येते.’

टॅग्स :ramdas phutaneरामदास फुटाणेBJPभाजपाcongressकाँग्रेस