शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात पोलिसांनी अडवला आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 14:16 IST

विद्यार्थ्यांंच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याऐवजी वसतिगृहांमध्ये सुविधा पुरवाव्यात, निर्वाह भत्ता व शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी, आदिवासी मुलींना योग्य प्रकारचे संरक्षण देण्यात यावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला होता.

ठळक मुद्देसरकार दडपशाही करत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास मज्जापोलीस आणि सरकारकडून सुरू असलेल्या दडपशाहीमुळे यापुढे आंदोलनात पालकही

पुणे/सिन्नर : पुणे येथून निघालेला आदिवासी विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा पोलिसांनी दडपशाहीने सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे अडविला. विद्यार्थ्यांनी १३ जुलैैपासून आंदोलन करणार असल्याचे निवेदन रितसर पोलिसांना दिले होते. तरीही कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत येथील पोलिसांनी विद्यार्थ्यांना नाशिककडे मार्गस्थ होण्यापासून रोखले. काही विद्यार्थ्यांसोबत पोलिसी पद्धतीने चर्चा करून सर्वांना माघारी पुणे येथे पाठविण्याची तयारी चालवली आहे. या घडल्या प्रकाराविरुद्ध विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला असून, एक शिष्टमंडळ वरिष्ठांना भेटणार असल्याचे समजते.  आदिवासी विकास विभागाची वसतिगृहे बंद करून विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या योजनेला (डीबीटी) राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. बोगस आदिवासींना शासकीय सेवेतून काढून टाका, विद्यार्थ्यांंच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याऐवजी वसतिगृहांमध्ये सुविधा पुरवाव्यात, निर्वाह भत्ता व शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी, आदिवासी मुलींना योग्य प्रकारचे संरक्षण देण्यात यावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला होता.  या पुण्यातून निघालेला मोर्चा ८० ते १०० किमीचा प्रवास करून नांदुरशिंगोटे येथे सोमवारी पोहोचला होता. येथील इंद्रायणी लॉन्सवर त्यांचा मुक्काम होता. ही संधी साधत मोर्चेकऱ्यांना आत ठेवून पोलिसांनी बळजबरीने लॉन्सचा ताबा घेतला. वसतिगृहातील भोजनाबाबत शासनाच्या आदिवासी विभागाचा निधी थेट हस्तांतर करण्याचा (डीबीटी) शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयावर काढलेला आक्रोश मोर्चा नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर नांदूर शिंगोटे शिवारात पोलिसांनी अडविला.सायंकाळी पाचला मोर्चा नांदूरशिंगोटे येथे पोहोचल्यावर इंद्रायणी लॉन्सवर नियोजन मुक्काम होता. मोर्चातील तरुण लॉन्समध्ये दाखल झाल्यानंतर मोठा फौजफाटा दाखल झाला. ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, उपअधिक्षक माधव पडेले, सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्यासह शीघ्र कृती दलाचे जवान, नाशिक व नगर जिल्ह्यातील पोलीस फौजफाटा हजर झाला. उपविभागीय अधिकारी महेश पाटील दाखल झाले. निवेदन येथेच देण्याचा आग्रह पोलिसांनी धरला होता. पुण्यासह नांदेड, हिंगोली, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, अकोला, वर्धा आदी जिल्ह्यातून महाविद्यालयीन आदिवासी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. बंडूनाना भाबड यांनी मोर्चेकºयांच्या जेवणासह मुक्कामाची व्यवस्था केली होती. सायंकाळी आठच्या सुमारास विद्यार्थी पुढील नियोजन करत होते. पोलिसांनी अचानक कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पुढे जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मोर्चातील विद्यार्थ्यांना पुण्याला परत पाठविण्यात येत होते. पोलिसांच्या फौैजफाट्यामुळे गावातील नागरिकांनीही येथे गर्दी केली होती. ---५० ते ६० पोलिसांचा फौजफाटा आणि मोठी वाहने या ठिकाणी आणली होती. काही खासगी गाड्यांमध्येही पोलीस विद्यार्थ्यांना भरत होते. सरकार आम्हाला भीती घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ---यापुढे आंदोलनात पालकहीपोलीस आणि सरकारकडून सुरू असलेल्या दडपशाहीमुळे यापुढे आमचे पालकही या आंदोलनात सहभागी होतील. मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. पुण्यात परीक्षेसाठी मोचार्तून आलेले विद्यार्थी परीक्षा झाल्यावर पुन्हा लाँग मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी खासगी बसमधून जात असताना त्यांनाही नांदूरजवळ अडवण्यात आले होते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.  ............... पोलिसांची पत्रकारांसोबत अरेरावीआदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा अडवून त्यांना पोलीस गाडीत घालत असताना पत्रकारांनी विचारणा केली असता, पोलिसांनी पत्रकारांवरही अरेरावी करण्यात आली. बुधवारी हा मोर्चा नाशिक येथे पोहोचणार होता. तसेच धुळे, नंदुरबार या भागातील विद्याथीर्ही यात मंगळवारी सहभागी होणार होते. त्यांनाही अशाच पद्धतीने पोलीस अडवतील का? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.---

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाGovernmentसरकारPoliceपोलिसNashikनाशिक