शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

Bhagat Singh Koshyari: जोपर्यंत भारत देश आहे, तोपर्यंत रामाचे अस्तित्व टिकून राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 13:00 IST

रामाला जितके हृद्यात ठेवाल तितके जीवनात चैतन्य व स्फूर्ती मिळेल

पुणे : “रामायण, महाभारत या पुराणकथा नाहीत. त्यात समाजजीवनाचे चित्रण आहे. प्रभू श्रीराम हे केवळ एका धर्म किंवा संप्रदायापुरते मर्यादित नाहीत. प्रभू श्रीरामांचे जीवन युगानयुगे देशाच्या प्रेरणेचा स्रोत आहे. जोपर्यंत भारत देश राहील, तोपर्यंत रामाचे अस्तित्व राहील. रामाला जितके हृद्यात ठेवाल तितके जीवनात चैतन्य व स्फूर्ती मिळेल. पुढील शंभर वर्षे गीतरामायण घरोघरी ऐकले जाईल,” असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

शिक्षण प्रसारक मंडळी व अमृतसंचय प्रतिष्ठानच्या वतीने धनंजय कुलकर्णी लिखित ‘पत्ररुप भावार्थ गीत रामायण’ या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. 

या ग्रंथाच्या ब्रेल लिपीतील रूपांतरित ग्रंथाचे देखील प्रकाशन यावेळी झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ग. दि. माडगूळकरांचे पुत्र आनंद माडगूळकर, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अँड. सदानंद फडके, शिक्षण प्रसारक मंडळीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष अँड. एस. के. जैन, अमृतसंचय प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. दत्तात्रय तापकीर, सचिव नरेंद्र उंब्रजकर आदी यावेळी उपस्थित होते.

कोश्यारी म्हणाले, “ रामायण, महाभारत, भगवद्गीता हे केवळ धर्मग्रंथ नसून, देशातील प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणावेत असे राजमार्ग आहेत. प्रभू श्रीराम हा विषय अनंत असल्याने त्यावर विविध पद्धतीने व्यक्त होत राहण्याची प्रक्रिया चिरंतन सुरूच राहील.” डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात सध्या ज्या काही गोष्टी घडत आहेत, त्या गोष्टींना चाप बसेल, असे नैतिकतेचे धडे गीत रामायणात आहेत.

आनंद माडगूळकर यांनी केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाने प्रसिद्ध केलेल्या गीत रामायणाच्या आवृत्तीमध्ये शुद्धलेखनाच्या प्रचंड चुका असल्याची खंत व्यक्त केली. त्या चुका सुधारुन ते शुद्ध रूपात प्रकाशित व्हावे. पुणे विद्यापीठात गदिमा आणि बाबुजींच्या नावाने अध्यासन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीIndiaभारतTempleमंदिरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ