शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

Bhagat Singh Koshyari: जोपर्यंत भारत देश आहे, तोपर्यंत रामाचे अस्तित्व टिकून राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 13:00 IST

रामाला जितके हृद्यात ठेवाल तितके जीवनात चैतन्य व स्फूर्ती मिळेल

पुणे : “रामायण, महाभारत या पुराणकथा नाहीत. त्यात समाजजीवनाचे चित्रण आहे. प्रभू श्रीराम हे केवळ एका धर्म किंवा संप्रदायापुरते मर्यादित नाहीत. प्रभू श्रीरामांचे जीवन युगानयुगे देशाच्या प्रेरणेचा स्रोत आहे. जोपर्यंत भारत देश राहील, तोपर्यंत रामाचे अस्तित्व राहील. रामाला जितके हृद्यात ठेवाल तितके जीवनात चैतन्य व स्फूर्ती मिळेल. पुढील शंभर वर्षे गीतरामायण घरोघरी ऐकले जाईल,” असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

शिक्षण प्रसारक मंडळी व अमृतसंचय प्रतिष्ठानच्या वतीने धनंजय कुलकर्णी लिखित ‘पत्ररुप भावार्थ गीत रामायण’ या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. 

या ग्रंथाच्या ब्रेल लिपीतील रूपांतरित ग्रंथाचे देखील प्रकाशन यावेळी झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ग. दि. माडगूळकरांचे पुत्र आनंद माडगूळकर, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अँड. सदानंद फडके, शिक्षण प्रसारक मंडळीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष अँड. एस. के. जैन, अमृतसंचय प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. दत्तात्रय तापकीर, सचिव नरेंद्र उंब्रजकर आदी यावेळी उपस्थित होते.

कोश्यारी म्हणाले, “ रामायण, महाभारत, भगवद्गीता हे केवळ धर्मग्रंथ नसून, देशातील प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणावेत असे राजमार्ग आहेत. प्रभू श्रीराम हा विषय अनंत असल्याने त्यावर विविध पद्धतीने व्यक्त होत राहण्याची प्रक्रिया चिरंतन सुरूच राहील.” डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात सध्या ज्या काही गोष्टी घडत आहेत, त्या गोष्टींना चाप बसेल, असे नैतिकतेचे धडे गीत रामायणात आहेत.

आनंद माडगूळकर यांनी केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाने प्रसिद्ध केलेल्या गीत रामायणाच्या आवृत्तीमध्ये शुद्धलेखनाच्या प्रचंड चुका असल्याची खंत व्यक्त केली. त्या चुका सुधारुन ते शुद्ध रूपात प्रकाशित व्हावे. पुणे विद्यापीठात गदिमा आणि बाबुजींच्या नावाने अध्यासन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीIndiaभारतTempleमंदिरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ