शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

Bhagat Singh Koshyari: जोपर्यंत भारत देश आहे, तोपर्यंत रामाचे अस्तित्व टिकून राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 13:00 IST

रामाला जितके हृद्यात ठेवाल तितके जीवनात चैतन्य व स्फूर्ती मिळेल

पुणे : “रामायण, महाभारत या पुराणकथा नाहीत. त्यात समाजजीवनाचे चित्रण आहे. प्रभू श्रीराम हे केवळ एका धर्म किंवा संप्रदायापुरते मर्यादित नाहीत. प्रभू श्रीरामांचे जीवन युगानयुगे देशाच्या प्रेरणेचा स्रोत आहे. जोपर्यंत भारत देश राहील, तोपर्यंत रामाचे अस्तित्व राहील. रामाला जितके हृद्यात ठेवाल तितके जीवनात चैतन्य व स्फूर्ती मिळेल. पुढील शंभर वर्षे गीतरामायण घरोघरी ऐकले जाईल,” असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

शिक्षण प्रसारक मंडळी व अमृतसंचय प्रतिष्ठानच्या वतीने धनंजय कुलकर्णी लिखित ‘पत्ररुप भावार्थ गीत रामायण’ या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. 

या ग्रंथाच्या ब्रेल लिपीतील रूपांतरित ग्रंथाचे देखील प्रकाशन यावेळी झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ग. दि. माडगूळकरांचे पुत्र आनंद माडगूळकर, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अँड. सदानंद फडके, शिक्षण प्रसारक मंडळीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष अँड. एस. के. जैन, अमृतसंचय प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. दत्तात्रय तापकीर, सचिव नरेंद्र उंब्रजकर आदी यावेळी उपस्थित होते.

कोश्यारी म्हणाले, “ रामायण, महाभारत, भगवद्गीता हे केवळ धर्मग्रंथ नसून, देशातील प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणावेत असे राजमार्ग आहेत. प्रभू श्रीराम हा विषय अनंत असल्याने त्यावर विविध पद्धतीने व्यक्त होत राहण्याची प्रक्रिया चिरंतन सुरूच राहील.” डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात सध्या ज्या काही गोष्टी घडत आहेत, त्या गोष्टींना चाप बसेल, असे नैतिकतेचे धडे गीत रामायणात आहेत.

आनंद माडगूळकर यांनी केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाने प्रसिद्ध केलेल्या गीत रामायणाच्या आवृत्तीमध्ये शुद्धलेखनाच्या प्रचंड चुका असल्याची खंत व्यक्त केली. त्या चुका सुधारुन ते शुद्ध रूपात प्रकाशित व्हावे. पुणे विद्यापीठात गदिमा आणि बाबुजींच्या नावाने अध्यासन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीIndiaभारतTempleमंदिरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ