शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत पाहणी : लोकशाही दिनी प्रमुख अधिकारीच गायब, कामास विलंब, नागरिकांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 14:12 IST

लोकशाही दिन असताना तहसीलदार निवडणूक कामांसाठी बाहेर गेल्याने तहसीलदार कार्यालयात शुकशुकाट होता.

कळस : इंदापूर तालुक्यातील प्रशासकीय भवनातील तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी व सहायक निबंधक कार्यालयात लोकशाही दिन असताना प्रमुख अधिकारीच गैरहजर राहिल्याने वेळेवर काम होण्यास विलंब होत आहे. त्याचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑफिसची वेळ ही सकाळी ९ ते सायंकाळी ५:४५ अशी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी किमान ९:१५ पर्यंत ऑफिसमध्ये येणे अपेक्षित असते. पण, अनेक कर्मचारी अपेक्षित वेळेत ऑफिसमध्ये येत नसल्याचे आढळून आले आहे. सोमवारी (दि. २१) लोकशाही दिन असताना तहसीलदार निवडणूक कामांसाठी बाहेर गेल्याने तहसीलदार कार्यालयात शुकशुकाट होता.

तालुका कृषी अधिकारी कार्यशाळा आहे म्हणून पुणे येथे गेल्याचे सांगितले तर सहायक निबंधक अधिकारी यांनी मी रजेवर असल्याचे सांगितले. त्यामुळे लोकशाही दिन असताना प्रमुख अधिकारीच गैरहजर राहिल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय नसून स्वच्छतागृहाची मोठी दुरवस्था झाली आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याकडे डोळेझाक केली जात आहे.शासकीय कार्यालयात कामांमध्ये अनियमितता आणि वेळेवर काम न होणे ही एक सामान्य समस्या निर्माण झाली आहे. कार्यालयांनी कामाच्या वेळांचे योग्य पालन करणे. कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवणे आणि कामाच्या प्रगतीचे नियमितपणे निरीक्षण करणे आवश्यक बनले आहे.शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या जेवणाची अर्ध्या तासाची वेळ निश्चित केली आहे. मात्र, बहुतांश शासकीय कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांना एक ते दीड तास प्रतीक्षेतच राहावे लागत असल्याचे चित्र आहे. नागरिकांची शिधापत्रिकांची कामे लवकर होत नसल्याची तक्रार आहे. शासनाने शिधापत्रिकांबाबतची विविध कामे पब्लिक लॉगिन वरून करण्यासाठी लॉगिन अद्ययावत केले. मात्र यावरून कामेच होत नसल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत. तर शासकीय कार्यालयाला दिलेले लॉगिन देखील सर्व्हरच्या तांत्रिक कारणांमुळे अडचणी येऊन कामे रखडली जात आहेत.

अधिकारी, कर्मचारी हजेरी लावून होतात गायब काही कर्मचारी जेवणाचा डब्बा आणतात, तर काही कर्मचारी दुपारी जेवण्यासाठी घरी जातात. दुपारी बाहेर जाण्यासाठी बायोमेट्रिकची अडचण नसल्याने यथावकाश कार्यालयात येतात. काही कर्मचारी आपली बाहेरची कामे करत राहतात. याकडे तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

गेल्या दोन महिन्यांपासून सर्व्हर समस्येमुळे व कार्यालयात अधिकारी भेटत नसल्याने शिधापत्रिकांसंबंधी कोणत्याही प्रकारची कामे होत नाहीत. यासाठी वारंवार हेलपाटे घालावे लागत आहेत. त्यामुळे पुरवठा विभागात कामे खोळंबली आहेत. तीन वेळा येऊनही माझे अजून रेशनकार्डचे काम प्रलंबित आहे.- पोपट वणवे, लाकडी 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडIndapurइंदापूर