शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 05:29 IST

भाजपला संविधान मिटवायचे आहे, पण आमची लढाई संविधान वाचविण्यासाठी

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर देशात आरक्षणाची असलेली ५० टक्के मर्यादा हटविण्यात येईल. दलित १५ टक्के, अदिवासी ८ टक्के आणि मराठा, धनगर यांच्यासह मागास वर्गास ५० टक्के, असे एकूण ७३ टक्के आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली.

पुणे लाेकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. नरेंद्र मोदी आणि भाजपला संविधान मिटवायचे आहे, असा गंभीर आरोपही गांधी यांनी केला. आमची लढाई ही संविधान वाचविण्याची आहे. संविधान संपविले जाईल, त्यादिवशी तुम्ही भारत देशाला ओळखू शकणार नाही. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आम्ही कधी संपवू देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी म्हणाले, संविधान नसेल तर केवळ २५ लोकांच्या हातात देश जाईल. मोदींनी २२ लोकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार केला जात नाही. नरेंद्र मोदी ज्येष्ठ नेत्यांचा (शरद पवार) अपमान करण्यात व्यस्त आहेत. असे वागणे देशाच्या पंतप्रधान पदाला शोभत नाही.

जातीवर आधारित जनगणना करणार; संख्येनुसार सर्वांना संधी

nआमचे सरकार आल्यावर जातीवर आधारित

जनगणना केली जाईल. त्या-त्या जातीच्या संख्येनुसार सर्वांना संधी दिली जाणार आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर देशात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली जाईल.

nत्याचबरोबर अग्निवीर योजनेसह जीएसटी बंद केला जाईल. सध्या पेपरफुटीचे प्रमाण वाढले आहे. पेपर लीक करणाऱ्यांनाही कडक शिक्षा दिली जाईल. सर्व पेपर सरकारी आयोगामार्फत घेतले जातील.

उन्हाच्या तडाख्याने ऐनवेळी बदलली सभेची वेळ

पूर्वनियोजनाप्रमाणे सभेची वेळ साडेपाच ठेवण्यात आली होती. मात्र, उन्हाचा तडाखा असल्याने ऐनवेळी सभेची वेळ बदलण्यात आली. सभा साडेसहा वाजता सुरू झाली.

अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे

उत्तर प्रदेशातील अमेठी हे फार पूर्वीपासून गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे; परंतु २५ वर्षांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील सदस्य लोकसभेच्या या जागेवरून निवडणूक लढवणार नाही. यंदा काँग्रेसने निष्ठावंत किशोरी लाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४