शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

स्वतःच्या जीवाची परवा न करता केले यकृतदान; पोरीने बापाला मृत्यूच्या दारातून आणले परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 13:29 IST

अखेर १८ वर्षीय मुलीचा शस्त्रक्रियेचा निर्णय योग्य ठरला; वडील धोक्यातून बाहेर, मुलीची प्रकृतीही ठणठणीत

पुणे : मुलांच्या अंगात बापाचं रक्त असतं, पण एका बापाच्या अंगात त्याच्या पोटच्या मुलीचे यकृत असते, अशी घटना तुम्ही कधी ऐकली आहे का? पण ही घटना घडली आहे. यकृत नादुरुस्त झाल्याने (किडनी फेल) झाल्याने मृत्यूशी झुंजणाऱ्या वडिलांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यासाठी पोटच्या पोरीने वयाच्या १८व्या वर्षातच बापाला यकृत दान केले आणि बापाचा जीव वाचविला. ऋतुजा उर्फ ह्रिदिशा शेखर माने असे त्या मुलीचे नाव.

पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात राहणारी ऋतुजा ही मूळची सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या छोट्याशा गावातून आली आहे. तिचे वडील शेखर माने हे गावातील राजकीय व्यक्ती त्यामुळे त्यांचा संपर्क दांडगा होताच. २०१७ मध्ये वडिलांनी नगरपालिकेची निवडणूक लढविली. त्याचा निकालाचा दिवस होता. त्यामुळे घरी सगळेच निकालाची वाट पाहत होते. निकाल मनासारखा लागला. त्यामुळे सर्वचजण खुश होते. त्यावेळी ऋतुजा कराड येथे तर भाऊ उत्कर्ष पुण्यामध्ये शिक्षण घेत होता. वडील निवडून आल्यामुळे दोघे गावाकडे निघाले होते. त्याचवळी प्रवासात असताना ऋतुजाला मैत्रिणीचा फोन आला की तिच्या वडिलांंची प्रकृती खालावली आणि रुग्णवाहिकेतून त्यांना दवाखान्यात नेले आहे.

डॉक्टरांनी सांगितले की त्यांचे यकृत (लिव्हर) खराब झाले. केस हाताबाहेर आहे. वेळ फारच कमी आहे. यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे. निवडणूक नुकतीच झाल्याने घरात इतक्या मोठ्या पैशांची जुळवाजुळव करणे कठीणच होते तरी अनेकांकडून पै-पै करत पैशांची जुळवाजुळव सुरू झाली. आव्हान होते ते यकृत दाता भेटण्याची. सगळीकडे फोनाफोन झाली. अनेक राजकीय अधिकाऱ्यांकडून मोठ्या रुग्णालयात फोन खणखणले, मात्र परिणाम शून्य. अखेर ऋतुजाने निर्णय घेतला की आपण स्वत:च वडिलांना यकृतदान करायचे. त्यासाठी घरच्यांनी विरोध केला. यकृत दान केल्यावर तिच्या भविष्याचे काय? तिचे लग्न जुळविताना कोण मुलगा तिला स्वीकारणार किंवा त्यापुढे जाऊन तिच्या बाळंतपणात काय धोका येऊ शकतो अशा साऱ्या शक्यतांनी घरच्यांसह डॉक्टर व नर्स यांनीही तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांना जीवदान मिळण्यासाठी ऋतुजाने निर्णय पक्का केला. भविष्यातील लग्न, मूल यापेक्षा वडिलांचे जगणे सर्वात महत्त्वाचे त्यासाठी ती यकृतदानाच्या निर्णयावर ठाम राहिली.

अखेर शस्त्रक्रिया अन् ऋतुजाच्या निर्णय योग्य ठरला. वडील धोक्यातून बाहेर पडले आणि ऋतुजाची प्रकृतीही ठणठणीत राहिली. पुढे काही दिवसातच बाप-बेटी दोघेही अगदी ठणठणीत झाले.

लष्करातील कॅप्टन होणार ऋतुजाच्या जोडीदार

आज ती आणि तिचे कुटुंबीय खुश आहेत ते तिने केलेल्या धाडसामुळे. घरच्यांना तिच्या भविष्याची चिंता तर होतीच; पण समाजाला खूप प्रश्न पडले की मुलगी आहे लग्न होईल की नाही? मुलांना जन्म देऊ शकेल की नाही. मग कोण लग्न करेल हिच्याशी? पण डॉक्टरांनी शास्त्रीय कारणे सांगून तिला कोणताच धोका नसल्याचे समजावून सांगितले आणि झाले ही तसेच भारतीय सैन्य दलालीत कॅप्टनकडून या धाडसी मुलीला लग्नाची मागणी आली. तिच्या ऋतुजासह कुटुंबीयांनीही त्याला होकार दिला आणि २७ जून रोजी हे दोन्ही धाडसी वीर एकमेकांशी रेशीमगाठीत बांधले जाणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलOrgan donationअवयव दानdoctorडॉक्टर