शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

‘भारत जोडो’ प्रमाणेच आता महाराष्ट्रातही निघणार यात्रा, सर्व तालुक्यांमधून जिल्हा मुख्यालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 14:02 IST

महाराष्ट्राने दिलेल्या प्रस्तावाला दिल्लीने मान्यता दिली असून २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान राज्यात ही यात्रा चालेल

पुणे: ‘भारत जोडो’ प्रमाणेच आता राज्यातही काँग्रेसकडून यात्रा काढण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातून जिल्हा मुख्यालयात ही यात्रा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राने दिलेल्या प्रस्तावाला दिल्लीने मान्यता दिली असून २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान राज्यात ही यात्रा चालेल. प्रदेश काँग्रेसने त्याची तयारी सुरू केली आहे.

लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस समितीने देशातील लोकसभा मतदारसंघांचा राज्यनिहाय आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी दिल्लीत प्रत्येक राज्याची बैठक होत आहे. महाराष्ट्राची बैठक मागील आठवड्यात झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील २२ नेते बैठकीला उपस्थित होते.

एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या राज्यात ४८ पैकी एकाही जागेवर काँग्रेसचे वर्चस्व नाही. ऐन निवडणुकीच्या वेळेस चंद्रपूरमधून शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले बाळू धानोरकर विजयी झाले. मात्र, त्यांचे निधन झाले. या स्थितीबद्दल दिल्लीतील नेत्यांनी खंत व्यक्त केली व ही स्थिती कशी बदलता येईल याची विचारणा केली.

कार्यकर्त्यांना कृती कार्यक्रम देत त्यात नेत्यांनाही सहभागी व्हायला लावले पाहिजे, असे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी बैठकीत सांगितले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारत जोडासारखी राज्यातही यात्रा सुरू करण्याची कल्पना मांडली. बैठकीला उपस्थित असलेले राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांनी याला लगेचच मान्यता दिली. त्याप्रमाणे नियोजन करण्यास सांगितले.

त्याप्रमाणे प्रदेश काँग्रेसने आता या यात्रेची आखणी केली आहे. विधानसभेच्या २८८ मतदारसंघांतून ही यात्रा जाईल, अशी रचना करण्यात आली आहे. २० सप्टेंबरपर्यंत शेतीची कामे पूर्ण होऊन शेतकरी मोकळे होतील. त्यामुळे २० सप्टेंबरनंतर यात्रा सुरू करण्याचा निर्णय झाला, अशी माहिती प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आली. यात प्रत्येक तालुक्यातून ही यात्रा स्थानिक नेते, कार्यकर्ते यांच्यासह सुरू होईल. तालुक्यातील गावांमधून फिरून ती जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी येईल. राज्यातील नेत्यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या ठिकाणी यात्रेचा समारोप होईल. यात्रेदरम्यान काँग्रेसची ध्येयधोरणे, देशाची सद्य:स्थिती, महागाई, बेरोजगारी, त्यावर उपाययोजना करण्यात केंद्र सरकारला आलेले अपयश यावर भर देणे अपेक्षित आहे.

टॅग्स :PuneपुणेBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसPoliticsराजकारणSocialसामाजिक