शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत जोडो’ प्रमाणेच आता महाराष्ट्रातही निघणार यात्रा, सर्व तालुक्यांमधून जिल्हा मुख्यालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 14:02 IST

महाराष्ट्राने दिलेल्या प्रस्तावाला दिल्लीने मान्यता दिली असून २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान राज्यात ही यात्रा चालेल

पुणे: ‘भारत जोडो’ प्रमाणेच आता राज्यातही काँग्रेसकडून यात्रा काढण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातून जिल्हा मुख्यालयात ही यात्रा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राने दिलेल्या प्रस्तावाला दिल्लीने मान्यता दिली असून २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान राज्यात ही यात्रा चालेल. प्रदेश काँग्रेसने त्याची तयारी सुरू केली आहे.

लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस समितीने देशातील लोकसभा मतदारसंघांचा राज्यनिहाय आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी दिल्लीत प्रत्येक राज्याची बैठक होत आहे. महाराष्ट्राची बैठक मागील आठवड्यात झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील २२ नेते बैठकीला उपस्थित होते.

एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या राज्यात ४८ पैकी एकाही जागेवर काँग्रेसचे वर्चस्व नाही. ऐन निवडणुकीच्या वेळेस चंद्रपूरमधून शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले बाळू धानोरकर विजयी झाले. मात्र, त्यांचे निधन झाले. या स्थितीबद्दल दिल्लीतील नेत्यांनी खंत व्यक्त केली व ही स्थिती कशी बदलता येईल याची विचारणा केली.

कार्यकर्त्यांना कृती कार्यक्रम देत त्यात नेत्यांनाही सहभागी व्हायला लावले पाहिजे, असे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी बैठकीत सांगितले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारत जोडासारखी राज्यातही यात्रा सुरू करण्याची कल्पना मांडली. बैठकीला उपस्थित असलेले राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांनी याला लगेचच मान्यता दिली. त्याप्रमाणे नियोजन करण्यास सांगितले.

त्याप्रमाणे प्रदेश काँग्रेसने आता या यात्रेची आखणी केली आहे. विधानसभेच्या २८८ मतदारसंघांतून ही यात्रा जाईल, अशी रचना करण्यात आली आहे. २० सप्टेंबरपर्यंत शेतीची कामे पूर्ण होऊन शेतकरी मोकळे होतील. त्यामुळे २० सप्टेंबरनंतर यात्रा सुरू करण्याचा निर्णय झाला, अशी माहिती प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आली. यात प्रत्येक तालुक्यातून ही यात्रा स्थानिक नेते, कार्यकर्ते यांच्यासह सुरू होईल. तालुक्यातील गावांमधून फिरून ती जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी येईल. राज्यातील नेत्यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या ठिकाणी यात्रेचा समारोप होईल. यात्रेदरम्यान काँग्रेसची ध्येयधोरणे, देशाची सद्य:स्थिती, महागाई, बेरोजगारी, त्यावर उपाययोजना करण्यात केंद्र सरकारला आलेले अपयश यावर भर देणे अपेक्षित आहे.

टॅग्स :PuneपुणेBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसPoliticsराजकारणSocialसामाजिक