शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

५० हजारांच्या सवलतीसाठी जीवघेणा धोका ; पिक कर्ज भरण्यासाठी जिल्हा बॅकेत रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 14:05 IST

महाआघाडी सरकारच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाखांपर्यतच्या पिककर्ज थकबाकीदारांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहिर करुन शेतक-यांच्या बँकखात्यावर थकीत रक्कम जमा करण्यात येत आहे. तर नियमितपणे कर्ज भरणा-यांसाठी ५० हजारांपर्यत रक्कम बोनस देण्याचे जाहिर करण्यात आले आहे.

पुणे (चाकण) :  सरकारने नियमित पिक कर्ज भरणा-या शेतक-यासाठी ५० हजारांची सवलत मिळणार असल्याचे जाहीर केले. हे पिककर्ज भरण्याची मुदत मार्च अखेर असल्याने कर्ज भरणा करण्यासाठी खेड तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या शाखांमध्ये शेतक-यांची गर्दी उसळली आहे. यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होत आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे राज्य सरकारने याबाबत त्वरीत निर्णय घेण्याची मागणी बँक कर्मचारी आणि शेतक-यांनी केली आहे.

 महाआघाडी सरकारच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाखांपर्यतच्या पिककर्ज थकबाकीदारांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहिर करुन शेतक-यांच्या बँकखात्यावर थकीत रक्कम जमा करण्यात येत आहे. तर नियमितपणे कर्ज भरणा-यांसाठी ५० हजारांपर्यत रक्कम बोनस देण्याचे जाहिर करण्यात आले आहे. परंतु कोरोनाचा वाढत्या प्रार्दुभावाला कमी करण्यासाठी सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा पुरेपुर अडकुन पडली आहे.

       खेड तालुक्यात १८९ गावांमिळुन १०४ विकास सहकारी सोसायंट्यांमार्फत जवळपास २६ हजार १४३ बँक खातेदार सोसायटी सभासद शेतक-यांना १४९ कोटी ३० लाख ९० हजार रुपये गेल्या खरीप हंगामातील पिक कर्ज रुपाने जिल्हा बँकेने वाटप केले आहे. त्यात महाआघाडी सरकारने थकीत कर्जमाफी केल्यामुळे अनेक शेतक-यांना याचा फायदा मिळाला. नियमाप्रमाणे सोसायट्यामार्फत घेण्यात आलेले पिककर्ज जर  मार्च अखेर भरले तर शेतक-यांना शुन्य टक्के व्याज बसते. त्यामुळे घेतलेले कर्जाचा मार्च अखेर पर्यंत  भरणा करावा लागत असतो. त्यामुळे खेड तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या शाखांमध्ये शेतकरी पिक कजार्चा भरणा करण्यासाठी बँकेत गर्दी करु लागले आहे.

कोरोना टाळण्यासाठी दूरपर्यंत उन्हात उभे शेतकरी 

सध्या कोराना या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी बँकेत ग्राहकांला गर्दी करु न देता बँकेबाहेर उन्हात रांगा लावुन ताटकळत उभे ठेवत आहेत. यामुळे संचारबंदीचे उल्लघंन होत आहे.  बँक कर्मचारीही  कोरोनाच्या भितीने धास्तावले आहे. पुर्वी सोसायटी सचिवाकडे पिककर्जाची रक्कम जमा केली जात असे. मात्र, यात  गैरप्रकार झाल्यामुळे  ही पध्दत बंद करण्यात आली आहे.  असे असले  तरी यावर बँकेने पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते.  सरकारनेही याबाबत त्वरीत निर्णय घेणे आवश्यक आहे. एका बँक शाखेतंर्गत जवळपास परीसरातील वीस ते पंचवीस गावे आणि वाड्यावस्त्यांमधील शेतकरी सभासद बँक ग्राहक आहेत.

शासनाने निर्णय घेऊन गावांतील गर्दी रोखण्याची मागणी

सध्या कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात लाँकडाऊन करुन संचारबंदी लागु केली आहे. शहराकडील अनेकजण कुंटुबासह गावाकडे नागरीक आले आहे. त्यामुळे सध्या गावक-यांमध्ये भितीचे वातावरण आहे. पंधरादिवस घरातच राहा असे असताना पिककर्ज भरणा करण्यासाठी विविध गावांचे शेतकरी बँकेतुन गर्दी करु लागला आहे. हे चित्र संपुर्ण राज्यातील सहकारी बँकामध्ये होणार असेल यावर तातडीने शासनाने निर्णय घेऊन गावांतील गर्दी रोखण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसChakanचाकणFarmerशेतकरीbankबँक