शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

दबा धरून माणसांवर हल्ला करणारा बिबट्याच नरभक्षक: माजी वन अधिकारी प्रभाकर कुकडोलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 16:10 IST

गेल्या काही दिवसांपासून करमाळा धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे दोनशेहून अधिक लोकं दिवस-रात्र कार्यरत आहेत.

ठळक मुद्देवन्यजीव धोरण आखण्याची गरज

पुणे : बिबट्या करमाळ्यात (जि. सोलापूर) धुमाकूळ घालत आला आहे. आता तो माळरानात गेल्याने तिथे त्याची दहशत पसरलेली आहे. बिबट्याने अनेकांचा बळी घेतल्याने त्याला नरभक्षक म्हटले जात आहे. पण तो हल्ला दबा धरून करतो की, घाबरून करतो? माणसांवरच हल्ला करतोय का ? जर तो असेच करतो? असेल, तरच तो नरभक्षक समजावा. त्यामुळे बिबट्यांचे निरीक्षण, नोंदी आणि मग निष्कर्ष काढणे गरजेचे आहे, अशी माहिती माजी वन अधिकारी व वन्यजीव अभ्यासक प्रभाकर कुकडोलकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

गेल्या काही दिवसांपासून करमाळा बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे दोनशेहून अधिक लोकं दिवस-रात्र कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत चाळीस ट्रॅप कॅमेरे, पंधरा पिंजरे,  शार्पशूटर,  शस्त्रधारी पोलीस, श्वान पथक असे सर्व साहित्य असूनही बिबट्या हाती लागत नाही. कारण तिथे उसाचे शेत आणि केळीचे बागा आहेत. त्यात तो शोधता येत नाही.  कुकडोलकर म्हणाले, ‘‘वन विभागाने आता बिबट्यांच्या आणि एकूण वन्यजीवांबाबत धोरण ठरवावे. बिबट्या आपला अधिवास सोडून इतरत्र फिरतो आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर भाग हा बिबट्यांचे प्रजोत्पदनाचे केंद्रच बनले आहे. त्यामुळे तिथून बिबटे इतर ठिकाणी जात आहेत. सोलापूर, मराठवाड्यात बिबटे नव्हते. आता तिकडेही ते जात आहेत. कारण तिकडे ऊसाची शेती खूप आहे. त्यांचे राहण्याचे ठिकाणच ऊस झाले आहे. ऊसामध्येच ते वाढत आहेत.’’ 

वन विभागाने उसाच्या क्षेत्राची ठेवावी नोंदएखादा बिबट्या लोकांवर हल्ला करत असेल, तर तो भीतीपोटी करत असू शकतो. त्यामुळे बिबट्याबाबत सखोल निरीक्षण, नोंदी आणि त्यानंतर निष्कर्ष काढून अहवाल केला पाहिजे. त्यानंतर धेारण आखावे. उसाचे क्षेत्र नेमके कुठे आणि किती आहे ? याची नोंद वन विभागाने ठेवावी. तिथून मग बिबट्यांचे स्थलांतर पुन्हा त्यांच्या अधिवासात कसे होईल, यावर भर हवा.  

...तर बिबट्याला गोळ्या घाला ! बिबट्यांचे अधिवास शोधून ते घोषित करावेत. त्या अधिवासाच्या बाहेर जर बिबट्या दिसला, तर त्याला गोळ्या घालाव्यात. पण, यासाठी अगोदर वन्यजीव धोरण हवे. त्यांचा अधिवास संरक्षित हवा, त्यांना खाद्य मिळायला हवे. तरच हा वन्यजीव संघर्ष कमी होऊ शकतो, असे कुकडोलकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याFarmerशेतकरीDeathमृत्यूforest departmentवनविभाग