शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

काश्मिरी तरुणांना हवेत वैधानिक अधिकार- शाह फैजल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 03:35 IST

सरहद आणि अर्हम फाउंडेशनच्यावतीने सांस्कृतिक महोत्सव

पुणे : गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये काश्मीरमधील परिस्थिती खूप बिघडली आहे. तरुण द्वेषापोटी हातात बंदूक घेत आहेत. १०० हल्लेखोर मारले गेले, तर २०० नव्याने तयार होतात. गोळीचे उत्तर गोळीने देऊन चालणार नाही. अजून किती सैनिक आणि तरुण मारले जाणार आहेत? आपले वैधानिक अधिकार हिसकावून घेतले जात आहेत, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. तरुणांचा राजकारण्यांवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. वैधानिक अधिकारच नाहीत, तर मतदान का करावे, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जातो. तरुणांना अधिकार मिळायला हवेत. शासन, प्रशासन आणि सामान्यांमध्ये संवादाचे पूल बांधले जावेत, असा आशावाद शाह फैजल या काश्मिरी तरुणाने व्यक्त केला.सरहद आणि अर्हम फाउंडेशनच्या वतीने आयोजित सांस्कृतिक महोत्सवात फैजल यांनी जम्मू काश्मीरच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. आएएसमध्ये प्रथम येऊनही ज्याने प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन सामाजिक-राजकीय क्षेत्रात येण्याचा निश्चय केला, ज्याच्या वडिलांना अतिरेक्यांनी ठार मारले, अशा डॉ. शाह फैजल या तरुणाशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. सरहदच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अनिल आनंद, विवेक देशपांडे, मिलिंद देशपांडे, मुश्ताक अली यांचा सन्मान करण्यात आला. प्राणकिशोर कौल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.ते म्हणाले, ‘जेव्हा जेव्हा पाकिस्तान आणि भारताने संवादाची भूमिका घेतली आहे, तेव्हा तेव्हा काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे. त्यामुळे हिंसक वातावरण, अशांतता, अराजक या प्रत्येक समस्येला संवाद हेच उत्तर आहे. हीच संवादाची भूमिका पुढे न्यायला हवी.’‘भारत ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते. येथे समानतेचा सन्मान केला जातो. पूर्वी अल्पसंख्याक समाजालाही बोलण्याचा, मत व्यक्त करण्याचा अधिकार होता. बंधुभाव, एकतेचे वातावरण टिकवण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे. बंधुभाव कायम राहिला तरच विकास होऊ शकेल. त्यासाठी संविधानातील मूल्ये जपली गेली पाहिजेत’, याकडेही शाह फैजल यांनी लक्ष वेधले.काश्मीरच्या मुलांना संस्कृतीबद्दल काहीच माहिती नाहीकाश्मिरी पंडितांशिवाय जम्मू-काश्मीरची संस्कृती अपूर्ण आहे. तेथील मुलांना मूळ संस्कृतीबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळेच काश्मीरची मूळ ओळख कायम ठेवायची असेल तर शांतता प्रस्थापित करून काश्मिरी पंडितांना परत बोलावले पाहिजे. तसे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यातूनच भावी पिढी विविधतेतून एकता शिकू शकेल.शाह फैजल तरुणांना चुकीच्या दिशेने घेऊन जात आहे, असे तेथील स्टेक होल्डर्सना वाटत आहे. कारण, लोकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच तेथे अनेक गैरसमज आहेत. आजवर राजकीय क्षेत्राबाबत मी काहीच विचार केला नव्हता. मात्र, व्यवस्था बदलायची असेल तर व्यवस्थेचा भाग होऊन काम करावे लागेल. गरज पडल्यास नवा राजकीय पक्ष स्थापन करावा लागेल.प्रशासकीय सेवेत काम करत असताना रस्ता, वीज, दवाखाने, शाळा अशा सुविधा निर्माण करून काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करता येईल, असे वाटायचे. मात्र, अशांततेला सामोरे जात असताना, काश्मीरला पैशांची गरज नाही, हे लक्षात आले. सैनिक पाठवले की प्रश्न सुटतील, असे सरकारला वाटते. सैन्य आणि तरुण यांच्यातील हा लढा नाही. याला राजकीय धोरणांमधील अपयश कारणीभूत आहे. धर्म, प्रदेश, प्रांत यापलीकडे जाऊन काश्मीर प्रश्न सोडवला पाहिजे. पैसा, राजकारणाने नव्हे तर माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास हा प्रश्न सुटू शकेल.- शाह फैजलमहात्मा गांधी सर्वमान्यमहात्मा गांधींना केवळ भारतातच नाही, जगात मानले जाते. अनेक ठिकाणी त्यांच्यावर संशोधन सुरू आहे. अनेक परदेशी तरुण त्यांची तत्वे अंगिकारण्याचा प्रयत्न करत आहेत. काश्मीर सध्या जळत आहे. काश्मीरमधील अशांततेतून शांततेकडे घेऊन जाणारा मार्ग गांधींच्या अहिंसक विचारांमध्येच मिळू शकतो.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर