शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

पुणे : मांजरेवाडी येथे चासकमानचा डावा कालवा फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 11:20 IST

पाणी शेतात आल्याने शेतीचे प्रचंड नुकसान...

शेलपिंपळगाव (पुणे)  मांजरेवाडी (ता. शिरूर) येथे चासकमान धरणाचा डाव्या कालव्याला शुक्रवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास भगदाड पडून कालव्यालगत असणाऱ्या शेतांमध्ये लाखो लिटर पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतांचे नुकसान झाले आहे. दरम्यान चासकमान धरणातुन कालव्याला सोडलेले पाण्याचे आर्वतन बंद केले असून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी खेड व शिरूर तालुक्याला वरदान ठरत आहे. डावा कालवा चास धरण ते शिरूर असा १४४ किलोमीटर अंतराचा असून येथील शेतकरी याच पाण्याच्या आर्वतनावर रब्बी व उन्हाळ्यातील पिके घेत असतात. कालव्याच्या कामाला २५ वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. कालवा मुरुम व मातीचा भराव दोन्ही बाजुने टाकून बनविण्यात आला आहे. कालव्यालगत मोठमोठी झाडे झुडपे उगवली आहेत. या झाडांच्या मुळ्या जमिनित गेल्याने कालव्याची माती ठिसूळ झाली आहे.

दरम्यान सततच्या पावसाने चासकमान धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे आजअखेर ९० टक्के धरण भरले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून डाव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. मात्र मांजरेवाडी हद्दीत कालव्याची माती ढिसुळ झाल्याने अचानक मोठे भगदाड पडले आहे. या भगदाडातून मोठ्या प्रमाणात पाणी लगतच्या शेतांमध्ये वाहिले जात आहे. स्थानिकांनी पाटबंधारे विभागाला कालवा फुटल्याची माहिती दूरध्वनीद्वारे दिली. शनिवारी (दि.१६) सकाळी पाटबंधारे विभागाने कालवा बुजविण्याच्या कामाला सुरुवात केल्याची माहिती पोलीस पाटील सोनाली वाजे यांनी दिली.

डाव्या कालव्याचे काही ठिकाणी अस्तरीकरण करण्यात आले आहे. पाणी जाण्यासाठी सिमेटंचे बांधकाम, भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. अद्यापही कालव्याचे अस्तरीकरणाचे काम झालेले नाही. त्यामुळे अनेक भागात कालव्यातील पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या गळतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक बनल्या आहेत. याकडे पाटबंधारे विभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष होत आहे. 

टॅग्स :PuneपुणेDamधरण