शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

पुणे : मांजरेवाडी येथे चासकमानचा डावा कालवा फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 11:20 IST

पाणी शेतात आल्याने शेतीचे प्रचंड नुकसान...

शेलपिंपळगाव (पुणे)  मांजरेवाडी (ता. शिरूर) येथे चासकमान धरणाचा डाव्या कालव्याला शुक्रवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास भगदाड पडून कालव्यालगत असणाऱ्या शेतांमध्ये लाखो लिटर पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतांचे नुकसान झाले आहे. दरम्यान चासकमान धरणातुन कालव्याला सोडलेले पाण्याचे आर्वतन बंद केले असून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी खेड व शिरूर तालुक्याला वरदान ठरत आहे. डावा कालवा चास धरण ते शिरूर असा १४४ किलोमीटर अंतराचा असून येथील शेतकरी याच पाण्याच्या आर्वतनावर रब्बी व उन्हाळ्यातील पिके घेत असतात. कालव्याच्या कामाला २५ वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. कालवा मुरुम व मातीचा भराव दोन्ही बाजुने टाकून बनविण्यात आला आहे. कालव्यालगत मोठमोठी झाडे झुडपे उगवली आहेत. या झाडांच्या मुळ्या जमिनित गेल्याने कालव्याची माती ठिसूळ झाली आहे.

दरम्यान सततच्या पावसाने चासकमान धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे आजअखेर ९० टक्के धरण भरले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून डाव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. मात्र मांजरेवाडी हद्दीत कालव्याची माती ढिसुळ झाल्याने अचानक मोठे भगदाड पडले आहे. या भगदाडातून मोठ्या प्रमाणात पाणी लगतच्या शेतांमध्ये वाहिले जात आहे. स्थानिकांनी पाटबंधारे विभागाला कालवा फुटल्याची माहिती दूरध्वनीद्वारे दिली. शनिवारी (दि.१६) सकाळी पाटबंधारे विभागाने कालवा बुजविण्याच्या कामाला सुरुवात केल्याची माहिती पोलीस पाटील सोनाली वाजे यांनी दिली.

डाव्या कालव्याचे काही ठिकाणी अस्तरीकरण करण्यात आले आहे. पाणी जाण्यासाठी सिमेटंचे बांधकाम, भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. अद्यापही कालव्याचे अस्तरीकरणाचे काम झालेले नाही. त्यामुळे अनेक भागात कालव्यातील पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या गळतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक बनल्या आहेत. याकडे पाटबंधारे विभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष होत आहे. 

टॅग्स :PuneपुणेDamधरण