शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

संतसाहित्याने एकात्मदृष्टीचा विकास : डॉ. अशोक कामत; पुण्यात संतसाहित्यावर व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:01 IST

संतांनी जोपासलेली एकात्मतेची दृष्टी विकसित होण्यासाठी संत साहित्याचा अभ्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन  संत साहित्याचे अभ्यासक आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले. 

पुणे : अलीकडे आपले जातीय, प्रांतिक, भाषिक सांप्रदायिक अभिनिवेश वाढलेले आहेत. भाषावार प्रांतरचनेमुळे आपण अधिक संकुचित झालो आहोत. अशा वेळी संतांनी जोपासलेली एकात्मतेची दृष्टी विकसित होण्यासाठी संत साहित्याचा अभ्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन  संत साहित्याचे अभ्यासक आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीने आयोजित कै. श्रीकृष्ण ठकार स्मृती व्याख्यानमालेत ‘संत नामदेव आणि संत तुकाराम यांचे ऐतिहासिक कार्य’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी संस्थेचे वा. ल. मंजूळ, पंडित वसंतराव गाडगीळ, गणितज्ञ डॉ. रवींद्र जोशी, डॉ. श्रीनंद बापट, डॉ. अमृता नातू, आर्थिक सल्लागार गिरीश ठकार उपस्थित होते.कामत म्हणाले, आपला इतिहास विश्वकल्याणकारी आणि सांस्कृतिक आहे. तो राजकीय लढायांचा नाही. संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम या चारही संतांच्या समन्वयशील वृत्तीमुळे वारकरी परंपरा टिकली. नामदेव आणि तुकाराम यांच्याबाबत विचार करताना असं लक्षात येते की दोघांच्याही समोर काळाचे विशिष्ट आव्हान होते.  हे दोन्ही संत एकमेकांना पूरक होते. ‘नामाचा तुका’ म्हणून वारकरी पंथमान्यता लाभलेले तुकाराम महाराज यांच्या काव्यकार्याशीही नामदेवरायांचा उत्कट अनुबंध आढळतो. तो अभ्यासला तर संत तुकारामांची ऐतिहासिक कामगिरी स्पष्ट होते. तसेच स्फुट रचना हीच दोहोंची मूळ प्रवृत्ती. ती रचना कीर्तनोपयोगी असणे हे ब्रीद. नामदेवांचे अनेक अभंग परिष्कृत रूपात तुकोबांनी पुन्हा सादर केले, असे दाखविता येते.

टॅग्स :bhandarkar institute puneभांडारकर संशोधन संस्था, पुणेPuneपुणेsant tukaramसंत तुकाराम