शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

संतसाहित्याने एकात्मदृष्टीचा विकास : डॉ. अशोक कामत; पुण्यात संतसाहित्यावर व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:01 IST

संतांनी जोपासलेली एकात्मतेची दृष्टी विकसित होण्यासाठी संत साहित्याचा अभ्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन  संत साहित्याचे अभ्यासक आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले. 

पुणे : अलीकडे आपले जातीय, प्रांतिक, भाषिक सांप्रदायिक अभिनिवेश वाढलेले आहेत. भाषावार प्रांतरचनेमुळे आपण अधिक संकुचित झालो आहोत. अशा वेळी संतांनी जोपासलेली एकात्मतेची दृष्टी विकसित होण्यासाठी संत साहित्याचा अभ्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन  संत साहित्याचे अभ्यासक आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीने आयोजित कै. श्रीकृष्ण ठकार स्मृती व्याख्यानमालेत ‘संत नामदेव आणि संत तुकाराम यांचे ऐतिहासिक कार्य’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी संस्थेचे वा. ल. मंजूळ, पंडित वसंतराव गाडगीळ, गणितज्ञ डॉ. रवींद्र जोशी, डॉ. श्रीनंद बापट, डॉ. अमृता नातू, आर्थिक सल्लागार गिरीश ठकार उपस्थित होते.कामत म्हणाले, आपला इतिहास विश्वकल्याणकारी आणि सांस्कृतिक आहे. तो राजकीय लढायांचा नाही. संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम या चारही संतांच्या समन्वयशील वृत्तीमुळे वारकरी परंपरा टिकली. नामदेव आणि तुकाराम यांच्याबाबत विचार करताना असं लक्षात येते की दोघांच्याही समोर काळाचे विशिष्ट आव्हान होते.  हे दोन्ही संत एकमेकांना पूरक होते. ‘नामाचा तुका’ म्हणून वारकरी पंथमान्यता लाभलेले तुकाराम महाराज यांच्या काव्यकार्याशीही नामदेवरायांचा उत्कट अनुबंध आढळतो. तो अभ्यासला तर संत तुकारामांची ऐतिहासिक कामगिरी स्पष्ट होते. तसेच स्फुट रचना हीच दोहोंची मूळ प्रवृत्ती. ती रचना कीर्तनोपयोगी असणे हे ब्रीद. नामदेवांचे अनेक अभंग परिष्कृत रूपात तुकोबांनी पुन्हा सादर केले, असे दाखविता येते.

टॅग्स :bhandarkar institute puneभांडारकर संशोधन संस्था, पुणेPuneपुणेsant tukaramसंत तुकाराम