शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

कॉल ड्रॉप पाठ सोडेना, रेंज काही मिळेना; मोबाईल कंपन्या हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 06:48 IST

शहरातील विविध भागांत ‘आउट आॅफ कव्हरेज’

पुणे : आकर्षक सवलती, बहुरंगी, बहुपयोगी अशा सुविधा असलेले मोबाईल विविध कंपन्यांच्या माध्यमातून बाजारपेठेत दाखल होतात. ग्राहक मोठ्या प्रमाणावर सणवाराच्या निमित्ताने त्याची खरेदी करतात. मात्र एकीकडे मोबाईलधारक ग्राहकांची संख्या आणि तुलनेने मोबाईल टॉवरची घटणारी संख्या अशा व्यस्त प्रमाणाच्या कात्रीत ग्राहक सापडलेला आहे. यामुळे त्याला कॉल ड्रॉप, रेंज इश्यूसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अवघ्या काही सेकंदाचा अवकाश की, कॉल कट होणे, तर नेमक्या महत्त्वाचे काही नेटवर सर्फिंग करताना रेंज कमी होणे यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.सध्या शहरातील मध्यवस्तीत मोठ्या संख्येने प्रमुख मोबाईल कंपन्यांचे टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र, ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता ते टॉवर पुरेसे नसल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी सातत्याने होणारे कॉल ड्रॉप आणि रेंज इश्यू यामुळे ग्राहक त्रस्त झाले होते. आतादेखील शहराच्या विविध भागांमध्ये रेंजचा प्रश्न अनुत्तरित आहे. शहरी भागात ही परिस्थिती असताना ग्रामीण व दुर्गम परिसरात तर ग्राहकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे नेट पॅक आणि व्हॉईस कॉलिंगकरिता आकर्षक सवलती जाहीर करुन ग्राहकांच्या गळी आपली सेवा उतरविताना मोबाईल कंपन्या ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.विशेष म्हणजे आपली तक्रार संबंधित कंपनीकडे नोंदवल्यानंतर त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादाने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. अनेकदा तक्रार केल्यानंतर देखील कुठलीच दखल न घेता बिनदिक्कतपणे तीच सेवा पुढे सुरु ठेवण्यापर्यंत त्यांची मजल जाते. यामुळे त्रस्त ग्राहकांकडून आम्ही नेमकी कुणाकडे दाद मागायची आणि आमच्या शंकाचे समाधान कुणाकडून होईल? असे प्रश्न त्यांच्याकडून विचारले जात आहेत.विमाननगर परिसरात वायुदलाने सुरक्षेच्या कारणास्तव काही प्रमाणात मोबाईल रेंजची क्षमता सीमित केले असल्याचे सांगण्यात येते. तर कॅन्टोन्मेंट भागात कार्यरत असणाºया लष्करी खात्याकडून देखील फॉर ‘सिक्युरिटी पर्पझ’करिता रेंजच्या कमाल आणि किमान क्षमतेत फरक पडल्याचे पाहावयास मिळते.नेटवर्क वाढविण्याकरिता त्याच्या विविध उपाययोजनांवर भर द्यावा लागेल. अशा वेळी व्यवस्थापनामध्ये जीआयएसचा त्या नेटवर्क प्लॅनिंगकरिता उपयोग करता येणे शक्य आहे. त्याचबरोबर मोबाईल कंपन्यांनी थ्रीडी मॅप डेटाचा उपयोग करुन मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करुन शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या नेटवर्क समस्यांची माहिती करून घेणे गरजेचे आहे.

सध्या शहरात वाय फाय सुविधा जागोजागी बसविली आहे. ते प्रमाण व्यापक पद्धतीने वाढल्यास ग्राहकाला त्याचा फायदा होईल. यामुळे काही अंशी का होईना नेटवर्कचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे.शहरातील या प्रमुख भागांत ‘रेंज’ इश्यूयेरवड्यातील महाराष्ट्र हौसिंग बोर्डशासकीय मध्यवर्ती इमारतकॅन्टोन्मेंटबोर्डविमाननगरआंबेगाव, नºहेवारजेतील काही भागकळस, धानोरीकॉल ड्रॉप होण्याची कारणे...टॉवरची मर्यादित संख्यासदोष नेटवर्क यंत्रणा, सातत्याने नेटवर्कमध्ये तयार होणारे अडथळेमर्यादित टॉवरवर ग्राहकांच्या वाढत्या संख्येचा येणारा ताण, दिवसेंदिवस वाढत जाणारे ग्राहक त्या तुलनेत टॉवरची संख्या कमी.एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना ’टॉवर शिफ्टिंग’मध्ये होणारा बदल यामुळे देखील अनेकदा कॉल ड्रॉप आणि रेंजच्या समस्येला सामोरे जावे लागते.मागील दोन ते तीन वर्षांपासून टॉवर रेडिएशनचा मानवाच्या शरीराला धोका. यामुळे आता टॉवरकरिता इमारती उपलब्ध होत नसल्याने मोबाईल कंपन्याचीदेखील गैरसोय होत आहे.मोबाईल टॉवरवरच्या रेडिएशनमुळे माणसांच्या व पक्ष्यांच्या जीवाला धोका असा चुकीचा समज लोकांमध्ये पसरविण्यात आल्याने मोठे नुकसान झाले. वास्तविक त्या रेडिएशनमुळे कॅन्सर होतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. कुठल्या शास्त्रज्ञानेदेखील ते सिद्ध करुन दाखविले नाही. मात्र, आपल्याकडे ज्या चुकीच्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार झाला, त्याचा फटका मोबाईल कंपन्यांना झाला. त्यांना पुरेशा प्रमाणात टॉवर उभारण्याची संधीच दिली जात नसल्याने ग्राहकांना रेंज आणि कॉल ड्रॉपच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे.- डॉ. दीपक शिकारपूर (सायबरतज्ज्ञ)

टॅग्स :MobileमोबाइलInternetइंटरनेट