शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

ढिम्म प्रशासन आणि ठेकेदाराचा कामचलाऊपणा ; कोंढणपुर रस्ताच वाहून गेल्याने आठ गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 19:54 IST

गेल्यावर्षी २५ सप्टेंबरला झालेल्या पावसामध्येसुद्धा हा रस्ता वाहून गेला होता.

खेड शिवापूर : ढिम्म प्रशासन आणि कामचलाऊ ठेकेदार हे आपल्याकडे विकसन मार्गातील खरे मोठे अडथळे आहेत. त्यांच्या हलगर्जीपणाचा भुर्दंड हा नागरिकांना सोसावा लागतो.याचाच प्रत्यय शिवगंगा खोऱ्यातील पुणे-सातारा महामार्ग ते कोंढणपुर हा रस्ता आज दुपारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे आलेल्या पुरात आर्वी (ता. हवेली) येथील सागराची ताल याठिकाणी रस्ता वाहून गेला.यामुळे घेरा सिंहगड परिसरातील कोंढणपूर, राहटवडे, अवसरवाडी, कल्याण, शिवतारेवाडी व भिलारवाडी पेठ या आठ गावांचा संपर्क तुटला आहे.

             गेल्या वर्षी २५ सप्टेंबर यादिवशी झालेल्या पावसामध्ये याच ठिकाणी रस्ता वाहून गेला होता. त्यावेळी ठेकेदाराकडून तात्पुरती व्यवस्था केली गेली होती. तातडीने याठिकाणी पूल बांधण्याचे काम सुरु होईल व तो पुल लवकरात लवकर पूर्ण होईल अशा प्रकारची माहिती संबंधित विभागाने नागरिकांना हमी दिली होती. मात्र आजपर्यंत एक वर्षे उलटून गेल्यानंतरही याठिकाणी पुलाचे काम अर्धवटच केलेले आहे. या अर्धवट पुलापासून वरील गावांना जाण्यासाठी चार सिमेंटच्या नळ्या टाकून एक एक छोटासा तात्पुरता रस्ता या ठिकाणी करण्यात आला होता. मात्र, संबंधित रस्ते ठेकेदाराकडून या कामांमध्येही कुठलीच प्रगती नसून मागील वर्षीप्रमाणे आजही काम अपुरेच आहे. नागरिकांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही संबंधित विभागाकडून या रस्त्यात ठेकेदाराला काम पूर्ण करण्याबाबत कुठल्याही प्रकारची सूचना किंवा तंबी देण्यात आलेली नाही.

  आता हा रस्ता वाहून गेल्या कारणाने वरील आठ गावांचा संपर्क तुटलेला आहे.त्यामुळे यापुढेही याठिकाणी मोठ्या अपघात होण्याचीही शक्यता आहे. संबंधित ठेकेदारावर पांघरूण घालून अजून किती दिवस नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागेल याबाबत नागरीकांमध्ये संभ्रम  आहे.

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीRainपाऊस