शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

अभिजात मराठी भाषा संवर्धन विभाग सुरू करावा : नाट्यसंमेलनाध्यक्षांचे विनोद तावडे यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 08:00 IST

 केंद्राकडून मराठीला अभिजात भाषा मिळाला नाही तर मराठी संवर्धन राज्य सरकार करणार नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारनेच मराठी भाषा संवर्धनासाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करावा अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करावी ‘मराठी’ ही राज्याची मातृभाषा, तिला अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास

पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, बारावीपर्यंत मराठी भाषेच्या सक्तीचा कायदा करावा अशा मागण़्यांसाठी माजी आणि आजी साहित्य संमेलनाध्यक्ष पुढे सरसावले असताना त्यात आता 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रेमानंद गज्वी यांच्या नावाचीही भर पडली आहे. ‘मराठी’ ही राज्याची मातृभाषा आहे. तिला अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. भाषा सल्लागार समितीने अहवालाद्वारे मराठी ही अभिजात भाषा असल्याचे सिद्ध केले आहे. याबाबत जर केंद्र सरकार मान्यता देत नसेल तर राज्य सरकारनेच मराठी भाषा संवर्धनासाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करावा आणि त्याबाबत अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करावी अशा आशयाचे पत्र डॉ. प्रेमानंद गज्वी यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना दिले आहे.  केंद्राकडून मराठीला अभिजात भाषा मिळाला नाही तर मराठी संवर्धन राज्य सरकार करणार नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ज्याप्रमाणे भाषा संचलनालय आहे. त्याच धर्तीवरच अभिजात मराठी भाषा संवर्धनासाठी स्वतंत्र विभाग सुरू करावा अशी मागणी विनोद तावडे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आणि विरोधी पक्षनेत्यांनाही पत्राद्वारे केली असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आजही न्यायालयाची भाषा इंग्रजी आहे. भारतात कुठेही गेले तरी इंग्रजीचाच वापर होतो. लोकांचीच मागणी जर इंग्रजी शाळांची असेल तर काय करणार? ही मानसिकता बदलल्याशिवाय मराठीविषयीचे चित्र बदलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.चौकट‘‘मराठी शाळा बंद पडलेल्या, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, बारावीपर्यंत मराठी सक्तीची करण्यासंदर्भातला कायदा अशा विविध विषयांवर साहित्यिकांनी आपली ठोस भूमिका जाहीर केली आहे. मात्र त्या भूमिका पुरेशा आहेत का? मराठी शिकवा असे नुसते म्हणून उपयोग आहे का? त्यातून पोटापाण्याचे प्रश्न सुटणार आहेत का? हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. आधी मराठी ही ज्ञानभाषा आणि व्यवहाराची भाषा व्हायला हवी त्यानंतरच लोकांचे प्रश्न सुटतील आणि ते पुन्हा मराठीकडे वळू शकतील. जे मराठी शिका असे सांगतात त्यांची मुलेच इंग्रजी भाषेत शिकतात. इतकी दुटप्पी भूमिका बघायला मिळते. जे मराठीविषयी गळे काढतात त्यांनी आपली मुले कुठे शिकतात? हे आधी जाहीर करावे,’’ असे डॉ. गज्वी म्हणाले.----------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेmarathiमराठीGovernmentसरकारVinod Tawdeविनोद तावडे