शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

गेल्या वर्षीचाच पीक विमा रखडला, राज्य सरकारकडून १,८७७ कोटींचे देणे, हजारो शेतकरी वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 06:20 IST

विम्याच्या हप्त्यापेक्षा भरपाईचे दावे कमी आल्यामुळे सात विमा कंपन्यांकडून राज्य सरकारला १,३७२ कोटी रुपये परत मिळणार आहेत. 

- नितीन चौधरीपुणे : आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारने पंतप्रधान खरीप विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीचे अद्याप १,८७७ कोटी रुपये न दिल्याने सहा जिल्ह्यांमधील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभांपासून वंचित राहावे लागले आहे. त्यासोबतच युनायटेड इंडिया कंपनीला ३२ कोटी, तर भारतीय कृषी विमा कंपनीला २०० कोटी रुपयांचे देणे आहे. दरम्यान, विम्याच्या हप्त्यापेक्षा भरपाईचे दावे कमी आल्यामुळे सात विमा कंपन्यांकडून राज्य सरकारला १,३७२ कोटी रुपये परत मिळणार आहेत. 

गेल्या वर्षीच्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा व चंद्रपूर या सहा जिल्ह्यांसाठी ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. या सहाही जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचे दावे ११० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने नियमानुसार अतिरिक्त रक्कम राज्य सरकारने देणे गरजेचे आहे. त्यानुसार ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीला राज्य सरकारकडून १ हजार ८७७ कोटी रुपयांचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे या सहा जिल्ह्यांमधील हजारो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.

मात्र, ही नुकसानभरपाई लवकरच मिळेल, त्यासंदर्भात कृषी सचिवांनी राज्य सरकारच्या वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे, असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. तर ३१ ऑगस्टपूर्वी या सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, असे विमा कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त राज्य सरकारकडून युनायटेड इंडिया विमा कंपनीला ३२ कोटी, तर भारतीय कृषी विमा कंपनीला २०० कोटी रुपयांचे देणे आहे. याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.

कंपन्यांकडून मिळणार फरक खरीप पीक विमा योजनेतील बीड पॅटर्ननुसार १०० टक्क्यांपेक्षा कमी नुकसान भरपाई असल्यास ८०-११० या सुत्रानुसार विमा कंपनीला देण्यात आलेला हप्ता नुकसान भरपाईच्या दाव्यापेक्षा जास्त असल्यास विमा कंपनीचा २० टक्के नफा वगळून उर्वरित रक्कम राज्य सरकारला देणे बंधनकारक आहे.त्यानुसार आयसीआयसीआय, युनिव्हर्सल सोम्पो, युनायटेड इंडिया, चोलामंडलम, भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी आणि रिलायन्स या सात कंपन्यांकडून सरकारला १,३७२ कोटी रुपये परत मिळणार आहेत.

राज्य सरकारला परत मिळणारी रक्कम आयसीआयसीआय    २०३युनिव्हर्सल सोम्पो    १३५युनायटेड इंडिया    ९३चोलामंडलम    २१ भारतीय कृषी विमा    १५४ एचडीएफसी    ३८५रिलायन्स    ३८१ एकूण    १,३७२

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र