शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात गेल्या सहा महिन्यात तीन हजार जोडप्यांचे 'शुभमंगल' नोंदणी पद्धतीने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 19:05 IST

नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडेच जोडप्यांचा कल कायम

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत यंदा सहा महिन्यातच निम्मे नोंदणी विवाह झाले आहेत.

पुणे: शासनाने कोरोनाचे निर्बंध शिथिल करून विवाह सोहळा ५० लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी दिली असली तरी भव्यदिव्य विवाह करण्यावर खर्च करण्यापेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडेच अद्यापही जोडप्यांचा कल कायम आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे मार्चचा निम्मा महिना, एप्रिल आणि मे मधील काही दिवस नोंदणी कार्यालय बंद राहिल्यामुळे तसेच अनेकांच्या नोकरी, व्यवसायावर गदा आल्याने नोंदणी विवाहावर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे २०२० मध्ये नोंदणी पद्धतीने ५ हजार २२२ विवाह झाले. मात्र, अजूनही कोरोना आणि नोकरीच्या अस्थिरतेची टांगती तलावर असल्याने नोंदणी विवाहालाच जोडप्यांनी प्राधान्यक्रम दिला आहे. यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत नोंदणी पद्धतीने ३ हजार ६१२ जोडप्यांचे  ‘शुभमंगल’ पार पडले आहे. 

 गेल्या वर्षीपासून  कोरोनामुळे विवाह समारंभावर अनेक निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे पाचशे ते हजार लोकांच्या उपस्थितीत विवाह करण्यावर देखील बंधने आणली गेली. विवाहासाठी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आल्याने एकाला बोलावले आणि दुस-याला नाही यातून नातेवाईक, मित्रमंडळी दुखावण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोडप्यांनी कोरोनाचे कारण पुढे करीत नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास पसंती दर्शविली आहे. यातच विवाहाच्या बाबतीत येणा-या परवानग्यांच्या अडचणी, नियामवली आणि खर्च यामुळे जोडपी पैशांची बचत करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सहा महिन्यातच निम्मे नोंदणी विवाह झाले आहेत.

विवाह नोंदणी अधिकारी डी.ए. सातभाई म्हणाले,  यंदा नोंदणी पद्धतीने विवाह करणा-यांची संख्या वाढली आहे. आपल्या सोयीप्रमाणे आणि आपल्याला हवी ती तारीख निवडून जोडपी विवाहबद्ध होत आहेत. कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे काही निर्बंध असल्यामुळे फक्त मे महिन्यात नोंदणी पद्धतीने विवाह करणा-यांची संख्या घटली. परंतु, जूनमध्ये पुन्हा ते प्रमाण वाढले . हे प्रमाण आणखी वाढेल असा अंदाज आहे. नोंदणी पद्धतीने विवाह करणा-साठीची प्रक्रिया खूप सुटसुटीत आहे. सध्या ५० जणांच्या उपस्थितीत विवाह करणा-याची परवानगी असली तरी नोंदणी पद्धतीने विवाह करणा-यांची संख्या घटलेली नाही

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नWomenमहिलाcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र