शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीतून पिण्याच्या पाण्याचे शेवटचे आवर्तन, जूनमध्ये पाऊस न झाल्यास भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 00:54 IST

कुकडी प्रकल्पातून जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील धरणांमधून पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांतील सात तालुक्यांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याने या तालुक्यातील नागरिकांना दिसाला मिळाला आहे

नारायणगाव  - कुकडी प्रकल्पातून जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील धरणांमधूनपुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांतील सात तालुक्यांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याने या तालुक्यातील नागरिकांना दिसाला मिळाला आहे; मात्र हे शेवटचे आवर्तन असल्याने जूनमध्ये पाऊस न झाल्यास पाण्याच प्रश्न गंभीर होणार आहे. यावर्षीदेखील भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाकरिता दि.२ मार्च २०१९ रोजी मुंबई येथील सहयाद्री अतिथीगृहावर कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, आ. दिलीप वळसे-पाटील, आमदार शरद सोनवणे, आमदार बाबूराव पाचर्णे, आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे, मुख्य अधिकारी जयश्री काटकर, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता के. आर. कानडे आदी उपस्थित होते.या बैठकीत कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगाव जोगे व डिंभे धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला होता. पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी पिण्यासाठी उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. या आवर्तनाद्वारे कुकडी प्रकल्पातून पिण्यासाठी ६.५ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ५ मार्च २०१९ रोजी पासून पाणी सोडण्यात येणार होते; मात्र डिंभा डावा कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याने मीनाशाखा कालवा व घोडशाखा कालवा याद्वारे पाणी सोडणे शक्य झाले नाही. त्यामुळे कालव्याची दुरुस्ती करून ३५० क्युसेक्स वेगाने दोन्ही कालव्यांद्वारे पाणी सोडण्यात आले.पिंपळगाव जोगा धरणातील आवर्तन पूर्ण झाल्यानंतर, मृत साठ्यातील पाणी येडगाव धरणात घेऊन ते पुढे कुकडी डावा कालव्याद्वारे पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांकरिता पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार आहे. जुन्नर, आंबेगाव व पारनेर तालुक्यातील भागासाठी पिंपळगाव जोगा धरणातून डावा कालव्याद्वारे पाच मार्चला सोडण्यात आलेले पाणी पारनेर भागापर्यंत गेलेले आहे. डिंभा डावा कालव्यातून अकरा मार्चपासून घोडशाखा कालव्याला पाणी सोडण्यात आलेले आहे.या पाण्याचा लाभ जुन्नर तालुक्यातून पारनेर ते वडझिरे भागापर्यंत पिण्यासाठी होणार आहे. या पाण्याचे नियोजन कालवा समितीच्या निर्णयानुसार कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता जे. आर. कानडे व शाखा अभियंता जे. डी. गळगे यांच्यासह त्यांचे सहकारी करीत आहेत.तीन महिने आधीच आवर्तनजुन्नर तालुक्यातील येडगावपासून मंगरूळ, पारगावपर्यंतच्या नदीकाठच्या ग्रामपंचायतींनी पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी होती. त्यामुळे १५ जुलै पर्यंतचे आरक्षित असलेले पाणी १३ मार्च रोजी सोडण्यात आले. तब्बल तीन महिने अगोदरच पाणी सोडल्याने धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. त्यामुळे यापुढे या भागासाठी पाणी सोडण्यात येणार नाही. येत्या उन्हाळ्यामध्ये आहे तेच पाणी ग्रामपंचायतीना काटकसरीने वापरावे लागणार असल्याचे स्पष्टीकरण पाटबंधारे विभागाने केले आहे.गतवर्षीच्या तुलनेत निम्मेच पाणीजुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमध्ये आजमितीस ६३६३ द.ल.घ.फू. (२०.८४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी १४३६४ द.ल.घ.फू. (४७.०४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.धरणांतील उपलब्ध पाणीसाठायेडगाव ८०४ द.ल.घ.फू (४१.३७ टक्के),माणिकडोह ११२० द.ल.घ.फू (११ टक्के)वडज २१३ द.ल.घ.फु (१८.१९ टक्के)पिंपळगाव जोगा ६१५ द.ल.घ.फू ( १५.८० टक्के)डिंभा ३६११ द.ल.घ.फू (२८.९० टक्के)

टॅग्स :DamधरणPuneपुणे