शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

कुकडीतून पिण्याच्या पाण्याचे शेवटचे आवर्तन, जूनमध्ये पाऊस न झाल्यास भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 00:54 IST

कुकडी प्रकल्पातून जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील धरणांमधून पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांतील सात तालुक्यांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याने या तालुक्यातील नागरिकांना दिसाला मिळाला आहे

नारायणगाव  - कुकडी प्रकल्पातून जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील धरणांमधूनपुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांतील सात तालुक्यांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याने या तालुक्यातील नागरिकांना दिसाला मिळाला आहे; मात्र हे शेवटचे आवर्तन असल्याने जूनमध्ये पाऊस न झाल्यास पाण्याच प्रश्न गंभीर होणार आहे. यावर्षीदेखील भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाकरिता दि.२ मार्च २०१९ रोजी मुंबई येथील सहयाद्री अतिथीगृहावर कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, आ. दिलीप वळसे-पाटील, आमदार शरद सोनवणे, आमदार बाबूराव पाचर्णे, आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे, मुख्य अधिकारी जयश्री काटकर, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता के. आर. कानडे आदी उपस्थित होते.या बैठकीत कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगाव जोगे व डिंभे धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला होता. पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी पिण्यासाठी उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. या आवर्तनाद्वारे कुकडी प्रकल्पातून पिण्यासाठी ६.५ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ५ मार्च २०१९ रोजी पासून पाणी सोडण्यात येणार होते; मात्र डिंभा डावा कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याने मीनाशाखा कालवा व घोडशाखा कालवा याद्वारे पाणी सोडणे शक्य झाले नाही. त्यामुळे कालव्याची दुरुस्ती करून ३५० क्युसेक्स वेगाने दोन्ही कालव्यांद्वारे पाणी सोडण्यात आले.पिंपळगाव जोगा धरणातील आवर्तन पूर्ण झाल्यानंतर, मृत साठ्यातील पाणी येडगाव धरणात घेऊन ते पुढे कुकडी डावा कालव्याद्वारे पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांकरिता पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार आहे. जुन्नर, आंबेगाव व पारनेर तालुक्यातील भागासाठी पिंपळगाव जोगा धरणातून डावा कालव्याद्वारे पाच मार्चला सोडण्यात आलेले पाणी पारनेर भागापर्यंत गेलेले आहे. डिंभा डावा कालव्यातून अकरा मार्चपासून घोडशाखा कालव्याला पाणी सोडण्यात आलेले आहे.या पाण्याचा लाभ जुन्नर तालुक्यातून पारनेर ते वडझिरे भागापर्यंत पिण्यासाठी होणार आहे. या पाण्याचे नियोजन कालवा समितीच्या निर्णयानुसार कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता जे. आर. कानडे व शाखा अभियंता जे. डी. गळगे यांच्यासह त्यांचे सहकारी करीत आहेत.तीन महिने आधीच आवर्तनजुन्नर तालुक्यातील येडगावपासून मंगरूळ, पारगावपर्यंतच्या नदीकाठच्या ग्रामपंचायतींनी पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी होती. त्यामुळे १५ जुलै पर्यंतचे आरक्षित असलेले पाणी १३ मार्च रोजी सोडण्यात आले. तब्बल तीन महिने अगोदरच पाणी सोडल्याने धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. त्यामुळे यापुढे या भागासाठी पाणी सोडण्यात येणार नाही. येत्या उन्हाळ्यामध्ये आहे तेच पाणी ग्रामपंचायतीना काटकसरीने वापरावे लागणार असल्याचे स्पष्टीकरण पाटबंधारे विभागाने केले आहे.गतवर्षीच्या तुलनेत निम्मेच पाणीजुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमध्ये आजमितीस ६३६३ द.ल.घ.फू. (२०.८४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी १४३६४ द.ल.घ.फू. (४७.०४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.धरणांतील उपलब्ध पाणीसाठायेडगाव ८०४ द.ल.घ.फू (४१.३७ टक्के),माणिकडोह ११२० द.ल.घ.फू (११ टक्के)वडज २१३ द.ल.घ.फु (१८.१९ टक्के)पिंपळगाव जोगा ६१५ द.ल.घ.फू ( १५.८० टक्के)डिंभा ३६११ द.ल.घ.फू (२८.९० टक्के)

टॅग्स :DamधरणPuneपुणे