शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

किल्ले नारायणगडावरील अवशेष घेताहेत अखेरचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 1:31 AM

आपल्या शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार आणि वैभवशाली काळातील आपले साथीदार म्हणून आपले गडकोट, किल्ले ओळखले जात आहेत.

- अशोक खरात खोडद : आपल्या शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार आणि वैभवशाली काळातील आपले साथीदार म्हणून आपले गडकोट, किल्ले ओळखले जात आहेत. खोडदजवळील किल्ले नारायणगडावर असलेल्या प्राचीन वास्तूंचे अवशेष अखेरचा श्वास घेत आहेत. शासनाकडून या किल्ले नारायणगडावर असणाऱ्या प्राचीन वास्तूंच्या अवशेषांचे जतन आणि संवर्धन व्हावे, अशी मागणी दुर्गप्रेमी आणि पर्यटकांकडून होत आहे, वेळीच जर या किल्ल्यांचे जतन केले नाही, तर या किल्ल्यांकडे भविष्यात केवळ एक डोंगर म्हणूनच पाहिले जाईल.नारायणगडावरील राजवाड्याच्या प्रवेशद्वाराचे दगडी खांब, शरभशिल्प, अंघोळीचे प्राचीन भांडे भग्न होत चालले आहेत. गणेशपट्टी आणि इतर अन्य प्राचीन दगडी वास्तू अखेरचा श्वास घेत आहेत. वेळीच या प्राचीन दगडी वस्तूंची डागडुजी केली नाही तर किल्ल्याची खरी ओळख असणाऱ्या या सर्व वास्तू काळाच्या ओघात लोप पावतील, अशी भीती निर्माण झाली आहे.किल्ले नारायणगडावर दुर्गप्रेमी-निसर्गमित्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून संवर्धनाचे कार्य सुरू आहे. या गडावर गेल्यानंतर समोरच डाव्या बाजूला गाडलेल्या अवस्थेत पाण्याचे एक टाके होते. या ग्रुपच्या माध्यमातून या टाक्यातील माती बाहेर काढून टाके मोकळे केले आहे. सध्या या टाक्यात वर्षभर पुरेलएवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. गडाचीवाडी, खोडद, हिवरे परिसरातील स्थानिक ग्रामस्थ व युवक या संवर्धन मोहिमेत सक्रिय आहेत.किल्ले नारायणगडाला आजवर अनेक अभ्यासकांनी भेटी दिल्या आहेत. पेशवेकालीन म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला पेशवेकालीन नसून पेशवेकाळाच्या आधीपासूनच हा किल्ला अस्तित्वात असल्याचे अनेक अभ्यासकांनी मत व्यक्त केले आहे. या किल्ल्यावरील असणाºया पाण्याच्या टाक्या हा किल्ला प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याच्या पुरावा आहे, असे अनेक अभ्यासकांनी सांगितले आहे.किल्ल्यावरील उत्तरेच्या बाजूला असलेला आणि अत्यंत महत्त्वाचा असलेला चोरदिंडी दरवाजादेखील अखेरच्या घटका मोजत आहे,हा चोरदिंडी दरवाजा कोणत्याहीक्षणी कोसळला जाऊ शकतो. किल्ल्यावरील अनेक बुरुजव तट ठिकठिकाणी कोसळलेगेले आहेत.>प्रवेशद्वार कोसळले; शरभशिल्पही तुटलेकिल्ल्यावरील राजवाड्याचे दगडी प्रवेशद्वार काही वर्षांपूर्वी सुस्थितीत होते. अलीकडच्या काळात हे प्रवेशद्वार खाली कोसळले आहे. या प्रवेशद्वाराचा दगडी खांब तुटला आहे. प्रवेशद्वाराचे एका बाजूकडचे शरभशिल्प तुटले आहे.प्राचीन काळातील अंघोळीचे दगडी भांडेदेखील तुटले आहे. प्रवेशद्वारावर असलेली गणेशपट्टीदेखील खाली कोसळली असून ती नामशेष होण्याची भीती आहे.