शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

अखेर वीस वर्षांनी मिटला शेतकरी बांधवांमधील वाद, बारामती पोलिसांच्या प्रयत्नांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 14:32 IST

तीन भावांमध्ये निर्माण झाला होता शेतीच्या बांधाचा वाद

ठळक मुद्देअनेक वेळा भावकी वादातून झाल्या आहेत खुनाच्या घटना

बारामती (सांगवी): शेतीच्या बांधावरून भावकी गावकीत वाद होऊन हाणामारीतून अनेक खून झालेल्या घटना समोर येत असतात, यातच पोलीस स्टेशन,कोर्टाच्या पायऱ्या चढून त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. मात्र, अशा वेळी योग्य सल्लागार व समुपदेशनाद्वारे भावकी व गावकीची भांडणे कोणाच्या मध्यस्थीमुळे समेट घडवून आणल्यास कधी एक होतील हे सांगता येत नाही. असाच एक विधायक प्रकार बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व गावातील पदाधिकारी यांच्या मध्यस्थीने पिंपळी येथील शेतकऱ्यांच्यातील विकोपाला गेलेला वाद २० वर्षानंतर अखेर मिटल्याचे पाहायला मिळाले.

पिंपळीच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी शिंदे यांनी गावचा दौरा केला होता. दरम्यान पिंपळी गावातील नागरिकांना सूचना देत संबोधित करताना पिंपळी गावाकडे प्राधान्याने लक्ष देईल. गावाच्या अडीअडचणी गाव स्तरावर सोडवण्यासाठी कटिबद्ध राहु अशी ग्वाही दिल्यानंतर बरचसे वाद विकोपाला न जाता गाव पातळीवर मिटले गेले.

त्यातीलच एक शेतजमीनीचा वीस वर्षापूर्वींचा वाद समोर आल्यानंतर पोलीस निरीक्षक शिंदे यांचे सूचनेनुसार पंच कमिटीतील सदस्यांच्या मदतीने तुलसीदास केसकर व सर्जेराव पिसाळ आणि मच्छिंद्र पिसाळ या तिन्ही शेतकरी बांधवाना एकत्र विश्वासात घेऊन,बंधुभाव जपत बांधाचा वाद मिटवण्यासाठी विनंती केली. त्यास संबंधित शेतकऱ्यांकडून दुजोरा मिळाला व वीस वर्षपूर्वीचा वाद मिटवण्यासाठी सरपंच आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश मिळाले. बांधावरील वाद आनंददायी वातावरणात मिटल्यानंतर संबंधित शेतकरी व गावातील पदाधिकारी आदींनी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व कोरोनाकाळात नागरिकांना सुरक्षा कवच देणाऱ्या शहर पोलीस स्टेशनचे सहकारी पोलीस कर्मचारी यांना सॅनिटायजर भेट देऊन आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीFarmerशेतकरीPoliceपोलिस