शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या आरक्षण यात्रेला लाखोंचा जनसागर; पुणे-नाशिक आणि चाकण - तळेगाव महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:02 IST

संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या यात्रेत राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी हजारो वाहनांचा ताफा उभारला आहे

चाकण : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरपारची लढाई उभारली आहे. काल (दि.२७) अंतरवली सराटी येथून निघालेल्या त्यांच्या आरक्षण यात्रेने आज (दि.२८) छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरीची माती माथ्याला लावून मुंबईच्या दिशेने कूच केले. या यात्रेत सामील होण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला असून, हजारो वाहनांच्या ताफ्यामुळे पुणे-नाशिक महामार्ग आणि चाकण-तळेगाव मार्ग भगवामय झाले आहेत.

 हजारो वाहनांच्या ताफ्यामुळे वाहतुकीवर परिणाम 

संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या यात्रेत राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी हजारो वाहनांचा ताफा उभारला आहे. आज (दि.२९ ) पहाटे पासूनच पुणे-नाशिक आणि चाकण तळेगाव महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चाकण व महाळुंगे पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवत औद्योगिक क्षेत्रातील बसेस, अवजड वाहने वळवून पर्यायी मार्ग दाखवले आहेत. तसेच चाकण व परिसरातील शाळांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.

समाजाची एकजूट व स्वागत सोहळे

यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांसाठी खेड तालुक्यातील मराठा समाज व ग्रामस्थांनी ठिकठिकाणी चहा, नाष्टा, पाणी आणि जेवणाची सोय केली आहे. रस्त्यांवर स्वागत कमानी, भगवे झेंडे, घोषवाक्ये आणि फलक लावून यात्रेचे स्वागत करण्यात आले. वातावरणात "जय जिजाऊ, जय शिवराय" आणि "मराठा आरक्षण हक्क आमचा" अशा घोषणांचा निनाद घुमला. या निमित्ताने समाजातील विविध संघटना, स्वयंसेवी संस्था आणि गावोगावी युवक मोठ्या संख्येने पुढे आले.

आरक्षणासाठी आरपारची लढाई 

मनोज जरांगे पाटील यांनी शिवनेरीच्या पवित्र मातीतिलक करून “आमचा संघर्ष हा आता शेवटपर्यंतचा” असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषणास बसणार असून,राज्य सरकारला ठोस निर्णय घेण्यासाठी आंदोलनाचा महत्वाचा टप्पा मानला जात आहे. मराठा समाजाच्या आत्मसन्मानाची ही लढाई आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या यात्रेकडे लागले आहे.

आगामी घडामोडींवर राज्याचे लक्ष 

या आरक्षण यात्रेचे राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय परिणाम पुढील काही दिवसांत प्रकर्षाने दिसतील.एका बाजूला मराठा समाजात उत्साह आणि लढाऊ जिद्द आहे,तर दुसरीकडे वाहतूक, कायदा-सुव्यवस्था आणि औद्योगिक हालचालींचा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर होणारे उपोषण आणि त्याला मिळणारा प्रतिसाद यावरच पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस