शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

तुकाराम बीजला लाखो भाविकांचे इंद्रायणीत स्नान होणार; नदी सांडपाण्याने दूषित, आजारांचा धोका

By श्रीकिशन काळे | Updated: March 14, 2024 15:17 IST

येत्या २७ मार्चला तुकाराम बीज असल्याने लाखो भाविक इंद्रायणीकाठी येतात, स्नानही करतात, परंतु सांडपाणी सोडल्याने इंद्रायणी दूषित झाली आहे

पुणे : प्रदूषित पाण्यामुळे देहू येथील इंद्रायणीनदीतील महाशीर माशांचा जीव गेला. त्यावर नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील याची दखल घेतली आहे. घटनास्थळीची पाहणी करून ‘सीईओ’ला नोटीस बजावणार असल्याचा पवित्रा मंडळाने घेतला आहे. माशांचा मृत्यू कशामुळे झाला, त्याची माहिती अधिकारी घेत आहेत. तसेच पाण्याचे नमुनेही घेतले आहेत.

इंद्रायणीनदीमध्ये भाविक येऊन अंघोळ करत असता. तसेच या नदीतील महाशीर माशांना इतिहास आहे. ते येथील स्थानिक मासे असून, त्यांचा उल्लेख संत तुकाराम महाराज यांच्या काळापासून आहे. विठ्ठलाच्या कानाशी या माशांचा संबंध आहे. त्यामुळे या माशांना एक वेगळे महत्त्व आहे. येत्या काही दिवसांमध्ये तुकाराम बीज असल्याने लाखोच्या संख्येने भावीक इंद्रायणीकाठी येत असतात. त्यामुळे नदीचे पाणी जर प्रदूषित असेल तर या भाविकांना विविध आजार होण्याचा धोका देखील आहे. त्यामुळे यावर त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

देहू आणि परिसरातील सांडपाणी थेट नदीत जात असल्याने हे मासे मरत आहेत. या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. ते स्थानिक प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे काम आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या विषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे म्हणाले, आम्ही इंद्रायणीच्या काठी कर्मचारी पाठवले आहेत. ते तेथील पाहणी करून पाण्याचे नमुने घेत आहेत. मासे कशामुळे मेले त्याची चौकशी होईल. गावातील सांडपाणी थेट नदीत जात आहे. तिकडे कारखाने नाहीत. त्यामुळे या सांडपाण्यामुळे मासे मृत झाले. जिल्हा परिषदेचे सीईओ यांना आम्ही याबाबत नोटीस बजावणार आहोत.’’

विठ्ठलाच्या कानात महाशीर !

महाशीर हा मासा सिप्रिनिडाई (Cyprinidae) कुळातील आहे. हा मासा संकटग्रस्त यादीत आहे. मध्य प्रदेश सरकारने तर या माशाला राज्य माशाचा दर्जा दिला आहे. नर्मदा नदीत देखील हा मासा आढळतो. महाशीर मासा श्रृंगारासारखा वापरला जातो. विठ्ठलाच्या कानात हेच मासे आपल्याला पहायला मिळतात. 

टॅग्स :Puneपुणेdehuदेहूindrayaniइंद्रायणीriverनदीpollutionप्रदूषणsant tukaramसंत तुकाराम