शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औद्योगिक वीजपुरवठ्यातून कुरकुंभला वगळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 14:50 IST

कुरकुंभ परिसरात प्रदूषणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात नवीन विद्युत पुरवठ्यात औद्योगिक क्षेत्राला देखील जोडण्याची मागणी

ठळक मुद्देनवीन विद्युत पुरवठ्यात औद्योगिक क्षेत्राला देखील जोडण्याची मागणी : ग्रामस्थांचा विरोध परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने असलेला वीजपुरवठा बाधित होणारग्रामस्थांमध्ये औद्योगिक क्षेत्राबद्दल असणारी नाराजी आणखी तीव्र होऊ शकते वीज व पाणीपुरवठ्याच्या सुविधांवर गदा आणण्याचे काम

कुरकुंभ : येथे नव्याने विद्युतपुरवठा करणारी वीजवाहिनी टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे कुरकुंभ व परिसराला मिळणारी औद्योगिक क्षेत्रातील विद्युतपुरवठा करणारी सुविधा बंद पडून भारनियमनाचे चक्र सुरू होणार असल्याने कुरकुंभ ग्रामपंचायतने यावर आक्षेप घेत नव्याने टाकण्यात येणाऱ्या विद्युतवाहिनीला विरोध केला आहे. कुरकुंभ परिसरात औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या वीज व पाणीपुरवठ्याच्या सुविधांवर गदा आणण्याचे काम होत असून, त्यामुळे येणाऱ्या काळात कुरकुंभवर परिणाम होणार असून, याचा पुनर्विचार करण्याचे निवेदन ग्रामस्थांनी दिले आहे. कुरकुंभ परिसरात गेल्या ३० वर्षांपासून औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून रासायनिक प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या समस्येला येथील ग्रामस्थ सुरुवातीच्या काळापासून तोंड देत आले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील ग्रामस्थांना सुविधा मिळाव्या, या हेतूने तत्कालीन आमदार सुभाष कुल यांच्या माध्यमातून कुरकुंभ व पांढरेवाडी या प्रकल्पग्रस्त गावांना वीज व पाणीपुरवठा औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून करण्याच्या हेतूने प्रयत्न झाले. त्यामुळे परिसरातील विजेचा व पाण्याचा प्रश्न सुटला होता. कुरकुंभ परिसरात औद्योगिक क्षेत्रावर आधारित अनेक उद्योग व्यवसाय उभे राहिले. मात्र, सध्या औद्योगिक क्षेत्रापासून वेगळी नवीन विद्युतपुरवठा करणारी वीजवाहिनी गावात टाकण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी या नव्या वीजवाहिनीला विरोध केला आहे. कुरकुंभ परिसरात प्रदूषणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात डोके वर काढत आहेत. अशा परिस्थितीत गावाला मिळणाऱ्या सुविधादेखील बंद होणार काय? असा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहे. परिसरातील दहा किलोमीटरपर्यंत दूषित झालेले जमिनीतील पाण्याच्या स्रोताने गावातील हजारो नागरिकांना औद्योगिक क्षेत्राच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने असलेला वीजपुरवठा बाधित होणार या भीतीने कुरकुंभ येथील सर्वसामान्य व्यावसायिक चिंतित झाले आहेत. अनेक छोटे व्यवसाय या परिसरात असून, वीजपुरवठा खंडित होत नसल्याने याला उभारी मिळत असताना होणारा निर्णय हा लागू होऊ नये यासाठी मागणी केली जात आहे. ........कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्राच्या वाढत्या प्रदूषणाच्या समस्येने हजारो नागरिक ग्रासले असताना या परिसरात निर्माण होणाऱ्या छोट्या व्यावसायिक वृद्धीने व औद्योगिक क्षेत्रापासून मिळणाऱ्या वीज व पाणीपुरवठ्याच्या सुविधेने थोडेफार आश्वस्त होत आहोत. अशातच वीजपुरवठा वेगळा करून कुरकुंभवर अन्याय होईल, अशा पद्धतीने वीजवाहिनी टाकू नये. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये औद्योगिक क्षेत्राबद्दल असणारी नाराजी आणखी तीव्र होऊ शकते.-राहुल भोसले, सरपंच, कुरकुंभ........सध्या कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या विद्युत मागणीला पर्याय म्हणून व भविष्यात कुरकुंभसाठी अतिरिक्त वीजपुरवठा करण्यासाठी नवीन वीजवाहिनी टाकली जात आहे. यामधून कुठलेही भारनियमन कुरकुंभला येणार नसून औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातूनच अविरत वीजप्रवाह सुरूच राहणार आहे.- मिलिंद डोंबाळे, उपकार्यकारी अभियंता, उपविभाग दौंड............कुरकुंभ येथील सरपंच राहुल भोसले यांनी कुरकुंभ येथील वीजपुरवठा औद्योगिक क्षेत्रापासून विभक्त करू नये यासाठी लेखी निवेदन उपकार्यकारी अभियंता मिलिंद डोंबाळे यांना दिले आहे. औद्योगिक क्षेत्रामधून वगळण्यात आल्यावर भारनियमनाचा त्रास परिसरातील व्यावसायिकांना होणार नसल्याची खात्री करूनच नवीन विद्युतपुरवठा वाहिनी सुरु करण्यात यावी याबाबत निवेदनात मागणी करण्यात आली आहे. मात्र, असा कुठलाही प्रकार होणार नसल्याचे डोंबाळे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :KurkumbhकुरकुंभMIDCएमआयडीसीmahavitaranमहावितरण