शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शिष्यवृत्ती निकालात कोल्हापूर प्रथम क्रमांकावर; गडचिरोली सर्वांत मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 11:43 IST

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याचा इयत्ता पाचवीचा निकाल २२.३१ टक्के, तर आठवीचा निकाल ...

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याचा इयत्ता पाचवीचा निकाल २२.३१ टक्के, तर आठवीचा निकाल १५.६० टक्के एवढा लागला आहे. कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून, इयत्ता पाचवीचा निकाल ४० टक्के लागला असून, आठवीचा निकाल २९ टक्के लागला आहे.गडचिरोली जिल्हा सर्वांत शेवटी असून, पाचवीचा निकाल ७ टक्के, तर आठवीचा निकाल ५.१० टक्के लागला आहे. वर्धा जिल्ह्यात शिष्यवृत्तीसाठी मंजूर असलेल्या संचाएवढे विद्यार्थीसुद्धा शिष्यवृत्तीस पात्र झाले नाहीत. इतर जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. परिषदेच्या www.mscepune.in व www.mscepuppss.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे.राज्यात राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला. राज्यातील ९ लाख ६७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८ लाख ७० हजार १६२ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख ७० हजार २६८ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले. त्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या ३१ हजार २५१ एवढी आहे. राज्यातील इयत्ता पाचवीच्या ५ लाख ३२ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील पाच लाख १४ हजार १३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक लाख १४ हजार ७१० विद्यार्थी पात्र ठरले आहेत, तर इयत्ता आठवीसाठी नोंदणी केलेल्या ३ लाख ६७ हजार ८०२ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ५६ हजार ०३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील पाच ५५ हजार ५५८ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आहेत. इयत्ता पाचवीच्या १६ हजार ५३७ विद्यार्थ्यांना, तर इयत्ता आठवीच्या १४ हजार ७१४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

टॅग्स :Puneपुणेkolhapurकोल्हापूरScholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा