शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

शिष्यवृत्ती निकालात कोल्हापूर प्रथम क्रमांकावर; गडचिरोली सर्वांत मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 11:43 IST

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याचा इयत्ता पाचवीचा निकाल २२.३१ टक्के, तर आठवीचा निकाल ...

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याचा इयत्ता पाचवीचा निकाल २२.३१ टक्के, तर आठवीचा निकाल १५.६० टक्के एवढा लागला आहे. कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून, इयत्ता पाचवीचा निकाल ४० टक्के लागला असून, आठवीचा निकाल २९ टक्के लागला आहे.गडचिरोली जिल्हा सर्वांत शेवटी असून, पाचवीचा निकाल ७ टक्के, तर आठवीचा निकाल ५.१० टक्के लागला आहे. वर्धा जिल्ह्यात शिष्यवृत्तीसाठी मंजूर असलेल्या संचाएवढे विद्यार्थीसुद्धा शिष्यवृत्तीस पात्र झाले नाहीत. इतर जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. परिषदेच्या www.mscepune.in व www.mscepuppss.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे.राज्यात राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला. राज्यातील ९ लाख ६७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८ लाख ७० हजार १६२ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख ७० हजार २६८ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले. त्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या ३१ हजार २५१ एवढी आहे. राज्यातील इयत्ता पाचवीच्या ५ लाख ३२ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील पाच लाख १४ हजार १३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक लाख १४ हजार ७१० विद्यार्थी पात्र ठरले आहेत, तर इयत्ता आठवीसाठी नोंदणी केलेल्या ३ लाख ६७ हजार ८०२ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ५६ हजार ०३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील पाच ५५ हजार ५५८ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आहेत. इयत्ता पाचवीच्या १६ हजार ५३७ विद्यार्थ्यांना, तर इयत्ता आठवीच्या १४ हजार ७१४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

टॅग्स :Puneपुणेkolhapurकोल्हापूरScholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा