शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

किस्सा कुर्सी का: पाचशे रुपयांची निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 13:02 IST

काँग्रेसने द्वैभाषिकाचे (गुजरातसह महाराष्ट्र) समर्थन केले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मागणी केली होती....

- राजू इनामदार

पक्षात राहून पक्षविरोधी भूमिका घेणे बेशिस्तीचे समजले जाते. यांनी ते केले; पण काहीच कारवाई झाली नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी जाहीरपणे सांगितले की, ‘मला तुम्ही उमेदवारी दिली याचा अर्थ तुमच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे, असे नाही. मला जे वाटेल ते बोलण्यास मी मोकळा आहे!’ तरीही त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात एक मोठी आघाडी उभी राहिली. तीन-तीन उमेदवार उभे केले गेले. तरीही तेच निवडून आले. तो त्यांचा स्वत:चा हक्काचा मतदारसंघ नव्हता तरीही! त्यांचे नाव आहे केशवराव जेधे.

नुकतीच त्यांची १२८वी जयंती साजरी झाली. त्यानिमित्त त्यांचे हे स्मरण. सन १९२२ पासून ते राज्यात सामाजिक व त्यानंतर राजकीय चळवळीत होते. लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांना ‘देशभक्त’ अशी पदवी दिली होती. ते पुण्यातले; पण काँग्रेसने त्यांना सन १९५७ मध्ये बारामतीमधून निवडणूक लढवण्याचा आदेश दिला. त्यांनीही तो मान्य केला; पण ‘मला जे वाटेल ते बोलण्याचा माझा हक्क मी राखून ठेवत आहे!’ असे जाहीरपणे सांगूनच.

संयुक्त महाराष्ट्र समिती :

काँग्रेसने द्वैभाषिकाचे (गुजरातसह महाराष्ट्र) समर्थन केले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मागणी केली होती. ही समिती जेधे यांच्याच अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या सभेत स्थापन झाली होती. समितीने काँग्रेसविरोधात सगळीकडे उमेदवार उभे केले होते. केशवरावांच्या भूमिकेमुळे समितीने त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवार दिला नव्हता; पण त्यावेळच्या काही नेत्यांच्या हट्टामुळे एकदोन नव्हे तर तीन जणांनी केशवरावांच्या विरोधात स्वतंत्र उमेदवारी दाखल केली.

ना राहण्याचा खर्च, ना खाण्याचा :

केशवराव मतदारसंघातील वाड्या वस्त्यांवर फिरायचे. रात्री जिथे असतील तिथेच मुक्काम करायचे. सकाळी उठून पुढे निघायचे. चळवळींमधील सहभागामुळे त्यांचा ठिकठिकाणी संपर्क होता. खाण्याचा, राहण्याचा काहीच खर्च यायचा नाही. संपूर्ण मतदारसंघ त्यांनी याच पद्धतीने पालथा घातला. बरोबर काही कार्यकर्ते असत. तेच गावांमध्ये बैठका आयोजित करत. त्यात केशवराव बोलत. अवघ्या दोन-पाचशे रुपयांमध्ये त्यांनी ही निवडणूक लढवली. मतदारसंघातील १ लाख ४७ हजार ७२६ मते वैध ठरली. त्यातील ६३ हजार ३६४ मते केशवरावांना मिळाली. केशवराव सहजपणे निवडून आले.

साधी राहणी :

केशवराव खरे तर धनाढ्य घरातले होते. त्यांचे मोठे दोन बंधू सखारामशेठ व बाबूराव कुटुंबाचा व्यवसाय पाहात. त्यामुळेच केशवराव सामाजिक, राजकीय चळवळींना भरपूर वेळ देऊ शकत. श्रीमंती असूनही केशवराव अत्यंत साधे राहत. बहुजनांविषयी त्यांना कळवळा होता. तरुणपणापासूनच ते बहुजनांना सामाजिक, राजकीय, आर्थिक हक्क मिळवून देण्याच्या चळवळीत कार्यरत होते. त्यातही त्यांनी तत्त्वाला बाधा येईल, असे काही केले नाही. त्यातूनच त्यांची प्रतिमा तयार झाली होती.

(संदर्भ- केशवराव जेधे चरित्र, लेखक, य. दि. फडके)

-गप्पाजीराव

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस