शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

किस्सा कुर्सी का: पाचशे रुपयांची निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 13:02 IST

काँग्रेसने द्वैभाषिकाचे (गुजरातसह महाराष्ट्र) समर्थन केले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मागणी केली होती....

- राजू इनामदार

पक्षात राहून पक्षविरोधी भूमिका घेणे बेशिस्तीचे समजले जाते. यांनी ते केले; पण काहीच कारवाई झाली नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी जाहीरपणे सांगितले की, ‘मला तुम्ही उमेदवारी दिली याचा अर्थ तुमच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे, असे नाही. मला जे वाटेल ते बोलण्यास मी मोकळा आहे!’ तरीही त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात एक मोठी आघाडी उभी राहिली. तीन-तीन उमेदवार उभे केले गेले. तरीही तेच निवडून आले. तो त्यांचा स्वत:चा हक्काचा मतदारसंघ नव्हता तरीही! त्यांचे नाव आहे केशवराव जेधे.

नुकतीच त्यांची १२८वी जयंती साजरी झाली. त्यानिमित्त त्यांचे हे स्मरण. सन १९२२ पासून ते राज्यात सामाजिक व त्यानंतर राजकीय चळवळीत होते. लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांना ‘देशभक्त’ अशी पदवी दिली होती. ते पुण्यातले; पण काँग्रेसने त्यांना सन १९५७ मध्ये बारामतीमधून निवडणूक लढवण्याचा आदेश दिला. त्यांनीही तो मान्य केला; पण ‘मला जे वाटेल ते बोलण्याचा माझा हक्क मी राखून ठेवत आहे!’ असे जाहीरपणे सांगूनच.

संयुक्त महाराष्ट्र समिती :

काँग्रेसने द्वैभाषिकाचे (गुजरातसह महाराष्ट्र) समर्थन केले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मागणी केली होती. ही समिती जेधे यांच्याच अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या सभेत स्थापन झाली होती. समितीने काँग्रेसविरोधात सगळीकडे उमेदवार उभे केले होते. केशवरावांच्या भूमिकेमुळे समितीने त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवार दिला नव्हता; पण त्यावेळच्या काही नेत्यांच्या हट्टामुळे एकदोन नव्हे तर तीन जणांनी केशवरावांच्या विरोधात स्वतंत्र उमेदवारी दाखल केली.

ना राहण्याचा खर्च, ना खाण्याचा :

केशवराव मतदारसंघातील वाड्या वस्त्यांवर फिरायचे. रात्री जिथे असतील तिथेच मुक्काम करायचे. सकाळी उठून पुढे निघायचे. चळवळींमधील सहभागामुळे त्यांचा ठिकठिकाणी संपर्क होता. खाण्याचा, राहण्याचा काहीच खर्च यायचा नाही. संपूर्ण मतदारसंघ त्यांनी याच पद्धतीने पालथा घातला. बरोबर काही कार्यकर्ते असत. तेच गावांमध्ये बैठका आयोजित करत. त्यात केशवराव बोलत. अवघ्या दोन-पाचशे रुपयांमध्ये त्यांनी ही निवडणूक लढवली. मतदारसंघातील १ लाख ४७ हजार ७२६ मते वैध ठरली. त्यातील ६३ हजार ३६४ मते केशवरावांना मिळाली. केशवराव सहजपणे निवडून आले.

साधी राहणी :

केशवराव खरे तर धनाढ्य घरातले होते. त्यांचे मोठे दोन बंधू सखारामशेठ व बाबूराव कुटुंबाचा व्यवसाय पाहात. त्यामुळेच केशवराव सामाजिक, राजकीय चळवळींना भरपूर वेळ देऊ शकत. श्रीमंती असूनही केशवराव अत्यंत साधे राहत. बहुजनांविषयी त्यांना कळवळा होता. तरुणपणापासूनच ते बहुजनांना सामाजिक, राजकीय, आर्थिक हक्क मिळवून देण्याच्या चळवळीत कार्यरत होते. त्यातही त्यांनी तत्त्वाला बाधा येईल, असे काही केले नाही. त्यातूनच त्यांची प्रतिमा तयार झाली होती.

(संदर्भ- केशवराव जेधे चरित्र, लेखक, य. दि. फडके)

-गप्पाजीराव

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस