शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कीर्तनाची परंपरा पुढे न्यावी : चारुदत्त आफळे; पुण्यात गोविंदस्वामी आफळे जन्मशताब्दी सांगता समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:29 IST

वाणीच्या जोरावरच त्यांनी समाजात बदल केले. कीर्तनाची अशी अलौकिक परंपरा तरुणांनी अधिक सक्षमपणे पुढे न्यायला हवी, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देश्रीरामपूरचे रेवणनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले सामाजिक ऐक्य पुरस्कार प्रदानसमाजातील अनेकांना मदतीची गरज : उदय जगताप

पुणे : माध्यमातून समाजात स्फूर्ती जागवून प्रबोधन करण्यासाठी अनेक महापुरुषांचे वर्णन केले जाते. परंतु आजच्या समाजातील चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना समोर आणले नाही, तर चांगले कार्य हे केवळ भूतकाळापुरतेच मर्यादित राहील. संत नामदेव, संत एकनाथ यांनी कीर्तनाच्या माध्यमातूनच पापभिरु समाज निर्माण केला. वाणीच्या जोरावरच त्यांनी समाजात बदल केले. कीर्तनाची अशी अलौकिक परंपरा तरुणांनी अधिक सक्षमपणे पुढे न्यायला हवी, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले. आफळे अकादमीतर्फे राष्ट्रीय कीर्तन सम्राट गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभानिमित्त श्रीरामपूरचे रेवणनाथ महाराज यांच्या हस्ते सामाजिक ऐक्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. सदाशिव पेठ येथील नारद व्यास मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व कीर्तनकार, आनंदबुवा जोशी, वासुदेव बुरसे, शाहीर हेमंत मावळे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, राजाभाऊ कदम आणि  गोविंदस्वामी आफळे यांचे विद्यार्थी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांना गडचिरोलीमधील नक्षलग्रस्त गावांमधील सामाजिक कार्यासाठी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड आणि कारागृह प्रशासनाचे दक्षता अधिकारी राजेंद्र जोशी यांना सामाजिक ऐक्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ह. भ. प. आनंदबुवा जोशी यांना कीर्तनसेवेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी मिलिंद गायकवाड आणि राजेंद्र जोशी यांनी पुरस्काराची रक्कम येरवडा कारागृहातील प्रेरणापथ या उपक्रमासाठी दिली. तर उदय जगताप यांनी नक्षलग्रस्त भागातील मुलांकरिता पुरस्काराची रक्कम वापरणार असल्याचे सांगितले.उदय जगताप म्हणाले, समाजातील अनेकांना मदतीची गरज आहे. परंतु नक्षली भागातील लोकांना मदतीची प्रामुख्याने गरज आहे. समाजाने पुढाकार घ्यायला हवा. 

टॅग्स :Puneपुणेsadashiv pethसदाशिव पेठ