शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

कीर्तनाची परंपरा पुढे न्यावी : चारुदत्त आफळे; पुण्यात गोविंदस्वामी आफळे जन्मशताब्दी सांगता समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:29 IST

वाणीच्या जोरावरच त्यांनी समाजात बदल केले. कीर्तनाची अशी अलौकिक परंपरा तरुणांनी अधिक सक्षमपणे पुढे न्यायला हवी, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देश्रीरामपूरचे रेवणनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले सामाजिक ऐक्य पुरस्कार प्रदानसमाजातील अनेकांना मदतीची गरज : उदय जगताप

पुणे : माध्यमातून समाजात स्फूर्ती जागवून प्रबोधन करण्यासाठी अनेक महापुरुषांचे वर्णन केले जाते. परंतु आजच्या समाजातील चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना समोर आणले नाही, तर चांगले कार्य हे केवळ भूतकाळापुरतेच मर्यादित राहील. संत नामदेव, संत एकनाथ यांनी कीर्तनाच्या माध्यमातूनच पापभिरु समाज निर्माण केला. वाणीच्या जोरावरच त्यांनी समाजात बदल केले. कीर्तनाची अशी अलौकिक परंपरा तरुणांनी अधिक सक्षमपणे पुढे न्यायला हवी, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले. आफळे अकादमीतर्फे राष्ट्रीय कीर्तन सम्राट गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभानिमित्त श्रीरामपूरचे रेवणनाथ महाराज यांच्या हस्ते सामाजिक ऐक्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. सदाशिव पेठ येथील नारद व्यास मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व कीर्तनकार, आनंदबुवा जोशी, वासुदेव बुरसे, शाहीर हेमंत मावळे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, राजाभाऊ कदम आणि  गोविंदस्वामी आफळे यांचे विद्यार्थी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांना गडचिरोलीमधील नक्षलग्रस्त गावांमधील सामाजिक कार्यासाठी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड आणि कारागृह प्रशासनाचे दक्षता अधिकारी राजेंद्र जोशी यांना सामाजिक ऐक्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ह. भ. प. आनंदबुवा जोशी यांना कीर्तनसेवेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी मिलिंद गायकवाड आणि राजेंद्र जोशी यांनी पुरस्काराची रक्कम येरवडा कारागृहातील प्रेरणापथ या उपक्रमासाठी दिली. तर उदय जगताप यांनी नक्षलग्रस्त भागातील मुलांकरिता पुरस्काराची रक्कम वापरणार असल्याचे सांगितले.उदय जगताप म्हणाले, समाजातील अनेकांना मदतीची गरज आहे. परंतु नक्षली भागातील लोकांना मदतीची प्रामुख्याने गरज आहे. समाजाने पुढाकार घ्यायला हवा. 

टॅग्स :Puneपुणेsadashiv pethसदाशिव पेठ