शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

संमेलनाध्यक्षपदाबाबतचे किर्लोस्करांचे ’ते’ भाकित खरे ठरले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:13 AM

पुणे : ‘‘खूप वर्षांपूर्वी ‘किर्लेास्कर’ मासिकात माझी एक कथा छापून आली होती. तेव्हा मुकुंदराव किर्लोस्कर म्हणाले होते की, तुम्ही ...

पुणे : ‘‘खूप वर्षांपूर्वी ‘किर्लेास्कर’ मासिकात माझी एक कथा छापून आली होती. तेव्हा मुकुंदराव किर्लोस्कर म्हणाले होते की, तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हाल, पण त्यांना मी म्हणालो की, ‘मी स्वत:ला साहित्यिक समजत नाही. कारण माझा साहित्यातील अनुभव फार कमी आहेे.’ पण आज किर्लोस्करांचे ते भाकित खरे ठरले. साहित्य संंमेलन हा खूप मोठा मेळा आहे. संमेलनाध्यक्षपद हे एकप्रकारचे आव्हान असून, ही जबाबदारी खूप मोठी असल्याची भावना नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली.

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. नारळीकर यांची रविवारी साहित्य महामंडळाच्या बैठकीत बहुमताने निवड झाली. साहित्य संंमेलनाच्या 93 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका विज्ञान लेखक आणि संशोधकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे साहित्य, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर विज्ञान आणि साहित्याची सांगड, विज्ञानवादी दृष्टीकोन, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी होणारे प्रयत्न अशा विविध विषयांवर त्यांनी पत्रकारांशी ‘झूम’ मिटिंगद्वारे संवाद साधला.

एक विज्ञानवादी लेखक साहित्य संमेलनाध्यक्षपदी विराजमान झाल्यामुळे यापुढील काळात विज्ञान साहित्याला अधिक प्रतिष्ठा मिळेल. यंदाच्या साहित्य संमेलनात विज्ञानाचा प्रसार करण्याबरोबरच समाजातील अंंधश्रद्धा दूर करण्यास देखील निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सहित्यात विज्ञान हे दोन त-हेने येऊ शकते. विज्ञानामध्ये जी नवीन संशोधन होतात त्याची माहिती साहित्यातून लोकांपर्यंत पोहोचविली जाऊ शकते आणि विज्ञान कथा देखील साहित्यामधून पोहोचविता येऊ शकतात असेही त्यांनी नमूद केले.

गेल्या 93 वर्षात साहित्य संमेलनामध्ये फारसा सहभागी झालो नाही. काही वर्षांपूर्वी डोंबिवली येथील साहित्य संंमेलनात माझी मुलाखत घेण्यात आली होती. तितकाच काय तो माझा संंमेलनाशी जवळून संबंध आला. आजवर विज्ञानविषयक संंमेलनामध्येच अधिक सहभागी झाल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली.

समाजामधील विज्ञानवादी दृष्टीकोनाबददल सांगताना ते म्हणाले, एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने जरी प्रगती केली असली तरी विज्ञानवाद अजूनही दिसत नाही. लोक मोबाईलसारख्या तंत्रज्ञानाचा वापर कुठले दिवस शुभ किंवा अशुभ आहेत हे पाहाण्यासाठी करतात. तंत्रज्ञानाचा उपयोग अंधश्रद्धधेसाठीच केला जात आहे. लोकांची धारणा अजूनही बदललेली नाही. त्यामुळे एकप्रकारची निराशा जाणवते.

-----------------------------------------------

मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यायला हवं

विज्ञान किंवा गणिताचे मुलांना मराठी भाषेतूनच शिक्षण द्यायला हवे. आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातले तरच मुलांची प्रगती होणार आहे, असा एक समज पालकांमध्ये आहे. पण पालकांना हे कोण समजावणार की, यामुळे आपण मराठीतले वाचक कमी करत आहोत, याकडे डॉ. नारळीकर यांनी लक्ष वेधले.

---------------------------------------

मराठी ‘ज्ञानभाषा’नव्हे ‘विज्ञानभाषा’ व्हायला हवी

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी ती ज्ञानभाषा होईल का? याविषयी विचारले असता मराठीला ज्ञानभाषा मिळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण ती केवळ ज्ञानभाषा न होता विज्ञानभाषा व्हायला हवी अशी अपेक्षा डॉ. नारळीकर यांनी व्यक्त केली.

----------------------------------------------