शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

राज्यात १२९ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी, भात लावणी अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 05:29 IST

भात लावणी अंतिम टप्प्यात : कापूस, सोयाबीन, तूर पेरणीच्या कामांना वेग

पुणे : राज्यातील खरिपाच्या १२९.४० लाख हेक्टरवरील (९१ टक्के) पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत. भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात असून, कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, बाजरीच्या पेरणीला वेग आला आहे.१५ जूनपर्यंत सर्वदूर मान्सून व्यापला होता. त्यानंतर पावसाचा खंड पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रासह विविध ठिकाणी मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

राज्यात ऊस वगळून १४१.९९ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १२९.४० लाख हेक्टरवरील पेरणी आणि लागवडीची कामे झाली आहेत. गेल्या वर्षी याच काळात ११५.७९ लाख हेक्टरवरील (८१.५४ टक्के) पेरणीची कामे पूर्ण झाली होती. यंदा ऊस पिकासह १३०.४४ लाख हेक्टरवरील पेरणी-लागवडीची कामे (८६ टक्के) उरकली आहेत. भात आणि नाचणीच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व मका पिके फुलोरा अवस्थेत असून, भात व बाजरी फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहेत. तर, बागायती कापूस पाते धरण्याच्या अवस्थेत असून, पिकांमध्ये आंतर मशागतीची कामे सुरू आहेत.अतिवृष्टीमुळे दहा हजार हेक्टर क्षेत्र बाधितअतिवृष्टीमुळे जुलैअखेरपर्यंत बुलडाणा आणि हिंगोली जिल्ह्यातील १० हजार ७३ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे. ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, हळद, सोयाबीन, कापूस आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी