शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

खंडाळ्याचा शुटिंग पाॅईंट दोन वर्षापासून बंदच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 11:10 IST

आपल्या निर्सगरम्य सौंदर्यानं लाखो पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा खंडाळ्यातील शुटिंग पाॅईंट मागील दोन वर्षांपासून बंद करण्यात आल्याने पर्यटकांना मोठा हिरमोड होत आहे.

लोणावळा - आपल्या निर्सगरम्य सौंदर्यानं लाखो पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा खंडाळ्यातील शुटिंग पाॅईंट मागील दोन वर्षांपासून बंद करण्यात आल्याने पर्यटकांना मोठा हिरमोड होत आहे. लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने तातडीने हा पाॅईंट पुन्हा पर्यटकांकरिता खुला करण्याकरिता पाऊले उचलावीत, अशी मागणी शिवसेनेचे माजी पुणे जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे व स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष शौकत शेख यांनी केली आहे.

पर्यटनाचे व थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यातील वलवण धरण व गार्डननंतर खंडाळ्याचे वैभव असलेला शुटिंग पाॅईंट दोन वर्षापूर्वी जागा मालकांने अचानक बंद केला. मुंबई व रायगड जिल्हातील जीवघेण्या गरमीचा सामना करत घाट चढून आल्यानंतर खंडाळ्यातील निर्सगरम्य वातावरण व डोंगर दर्‍या व व्हॅली पर्यटकांना साद घालतात. शुटिंग पाॅईंट या ठिकाणावर अनेक सिनेमांचे चित्रिकरण झाले असून या ठिकाणाहून राजमाची किल्ल्याचे विहंगम दृष्य पहायला मिळते, पावसाळ्यात समोरील काचळदरीतून वाहणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.

या ठिकाणाचा पर्यटनात्मक विकास साधण्याकरिता सदर जागेवर नेचर झोनचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. मात्र सदरची जागा अद्याप नगरपरिषदेने ताब्यात घेतलेली नाही. मागील अनेक वर्ष पर्यटकांनी सदैव गजबजलेला हे ठिकाण दोन वर्षापासून उंच उंच पत्रे लावत अचानक पर्यटकांकरिता बंद करण्यात आले आहे. तत्कालिन मुख्याधिकार्‍यांनी सदरचे पर्यटनस्थळ नागरिकांकरिता खुले करावे असे जागा मालकांना सांगितले होते. मात्र यावर अद्यापही कार्यवाही न झाल्याने हा पाॅईंट आज अखेर बंदच आहे. खंडाळा शहराला निर्सगाचा मोठा वरदहस्त लाभला आहे. येथील मनमोहक सौंदर्य पाहण्याकरिता लोणावळ्यापेक्षा जास्त गर्दी होते. राजमाची पाॅईंट, शुटिंग पाॅईंट, सनसेट पाॅईंट व खंडाळा तलाव परिसरात अनेक स्थानिक नागरिकांचे लहान-सहान व्यवसाय आहेत.

या सर्व ठिकाणांचा विकास केल्यास खंडाळ्याच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. शुटिंग पाॅईंट लगत नगरपरिषदेचा डीपी रस्ता आहे. सदरचा रस्ता विकसित झाल्यासदेखील शुटिंग पाॅईंटवर जाता येणार असल्याने नगरपरिषदेने तातडीने हा डीपी रस्ता विकसित करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डाॅ. किरण गायकवाड यांनी केली आहे. शुटिंग पाॅईंटप्रमाणे लोणावळ्यातील वलवण धरण व उद्यानदेखील टाटा कंपनीने सुरक्षेच्या कारणावरुन गत सात ते आठ वर्षापासून बंद केले आहे.

ते धरण उद्यान तातडीने सुरु करावे अशी मागणी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी टाटा कंपनीकडे केली आहे. लोणावळा खंडाळा परिसरातील एक एक पर्यटनस्थळे अशा प्रकारे बंद होऊ लागल्यास येथील पर्यटन व्यावसायावर त्याचा विपरित परिणाम होणार असल्याने तातडीने ही बंद केलेली पर्यटनस्थळे सुरू करावीत तसेच इतर पर्यटनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :cinemaसिनेमाentertainmentकरमणूक