शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

राष्ट्रभक्तांना धर्माच्या चाैकटीत बसवून सामाजिक व राजकीय मतभेद निर्माण करण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 14:10 IST

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे आज परचुरे प्रकाशनाचे अप्पा परचुरे यांना जीवनगौरव पुरस्काराने तर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांना पहिल्या साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सबनीस बोलत होते.

पुणे : राजकीय आणि सामाजिक संस्कृती डावीकडे किंवा उजवीकडे वळते आहे, हे अन्यायकारक आहे. राष्ट्रभक्तीला जात आणि धर्माचे बंधन नसते.  पण जाती धर्माच्या चौकटीत राष्ट्रभक्तांना बसवून सतत सामाजिक आणि राजकीय मतभेद निर्माण करण्याचे काम होत असून हा अन्यायकारक प्रवाह झुगारून देण्याची गरज आहे. सामाजिक, राजकीय मतभेदांपेक्षा समाज, देश आणि राष्ट्र महत्वाचे आहे, असे मत 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

    अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे आज परचुरे प्रकाशनाचे अप्पा परचुरे यांना जीवनगौरव पुरस्काराने तर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांना पहिल्या साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सबनीस बोलत होते. यावेळी  प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ लेखक आणि संपादक भानू काळे,  प्रसिद्ध लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे,  उपाध्यक्ष शशिकला उपाध्ये, प्रमुख कार्यवाह नितीन गोगटे आदी मान्यवर उपस्थित होते. 

    अापल्या मनाेगतात सबनीस म्हणाले, परचुरे प्रकाशनाने सावरकरांची पुस्तके प्रसिद्ध करून या खर्‍या देशभक्ताला अभिवादन केले आहे. मात्र, कोणत्याही राष्ट्रीय व्यक्तीमत्वाच्या राष्ट्रभक्तीकडे संशयाने पाहणार्‍यांनी सावरकरांवर अन्याय केला हे दुर्दैवी आहे. वाचक, लेखक,  संस्कृती रक्षक यांना जोडून ठेवणारा सांस्कृतिक धागा म्हणजे प्रकाशक. दुर्दैवाने संस्कृतीच्या अजेंड्यावरून प्रकाशकाचे नाव बाजूला केले जात आहे. पण ज्ञानाची पाणपोई म्हणजे प्रकाशक होय. लेखक, वाचक आणि प्रकाशकांचा मान राखण्याचे काम समाज आणि शासन या सगळ्यांनीच केले पाहिजे.  संकटातून प्रकाशकांची सुटका होणे गरजेचे आहे.          प्रा. द.मा. मिरासदार म्हणाले की,  लेखक हा पुरस्कार मिळवण्यासाठी लिहित नाही तर व्यक्त  होण्यासाठी लिहितो. त्याला पुरस्काराची शाबासकी मिळाली तर निश्चितच प्रोत्साहन मिळते. यावेळी द. मा. मिरासदार यांनी  चित्रपट क्षेत्रातील आपल्या कार्याच्या आठवणींना खुमासदार शैलीत उजाळा दिला. 

टॅग्स :PuneपुणेShripal Sabnisश्रीपाल सबनीसVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरnewsबातम्या