शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

माहितीपटातून जपला कर्तृत्वाचा ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:35 IST

भारतामध्ये अजूनही कर्तृत्ववान व्यक्तींचे जीवन माहितीपटाच्या रूपाने बंदिस्त करण्याची परंपरा निर्माण झालेली नाही. समाजात बहुअंगी काम करून खूप काही देऊन जाणाऱ्या व्यक्तींचा चालताबोलता इतिहास दृश्य स्वरूपात जतन करून ठेवण्यासाठी माहितीपट हे खूपच प्रभावी माध्यम आहे.

भारतामध्ये अजूनही कर्तृत्ववान व्यक्तींचे जीवन माहितीपटाच्या रूपाने बंदिस्त करण्याची परंपरा निर्माण झालेली नाही. समाजात बहुअंगी काम करून खूप काही देऊन जाणाऱ्या व्यक्तींचा चालताबोलता इतिहास दृश्य स्वरूपात जतन करून ठेवण्यासाठी माहितीपट हे खूपच प्रभावी माध्यम आहे. माहितीपट हे संशोधनावर आधारित असल्याने ते अत्यंत खात्रीशीर व महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा बनतात, असे गरवारे महाविद्यालयाचे प्रा. प्रदीपकुमार माने यांनी सांगितले. त्यांनी बनविलेला ‘अनिल अवचट-एक मुक्तछंद’ या माहितीपटावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.प्रदीपकुमार माने म्हणाले, ‘‘मला यू-ट्यूबवर पाश्चात्त्य देशांमध्ये बनवलेले विविध विषयांवरील माहितीपट पाहण्याची आवड होती. लेखक अनिल अवचट यांचे ‘माणसं’ हे पुस्तक वाचताना मला त्यांच्यावर माहितीपट बनविला पाहिजे, असे खूप आतून वाटले. त्यांच्या ‘माणसं’ या पुस्तकानं चांगलाच भारावून गेलो. वाचक जेव्हा वाचक न राहता लेखकाचा अनुभव बनून जातो तेव्हाच खरं साहित्यदर्शन होत असतं असं म्हणतात. ‘माणसं’ पुस्तक वाचल्यानंतर माझंही असंच झालं. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या शिक्षकाच्या मुलाचे डोळे त्यामुळे खाडकन् उघडले. समाजाकडे पाहण्याची एक दिव्य दृष्टी मिळाली. त्या पुस्तकांची परंपरा पुढे ‘धागे उभे आडवे,’ ‘धार्मिक,’ ‘प्रश्न आणि प्रश्न,’ ‘कोंडमारा’ यांसारख्या पुस्तकांनी सुरू ठेवली. अनिल अवचट यांनी रिपोर्टताजसाठी केलेला विविध प्रश्नांचा अभ्यासही स्तिमित करून गेला.अवचटांचे वैशिष्ट्य असं आहे, की ते फक्त सामाजिक प्रश्न दाखवूनच थांबत नाहीत, तर त्या प्रश्नांसाठी झटणाºया ‘कार्यरत’ आणि ‘कार्यमग्न’ व्यक्तींचाही परिचय आपल्याला करून देतात. त्यांनी सामाजिक लेखन तर केलंच, पण कविता, ललितलेखनही केलं. बालसाहित्यात त्यांनी आगळे-वेगळे प्रयोगही केले. एकेकाळी धारदार सामाजिक प्रश्नांवर लिहिणारे अवचट आता आपणासमोर लहान मुलांसाठी ‘सरल-तरल’ लिहिणारे आजोबा म्हणून दिसतात. अवचटांच्या लेखनात जी विविधता दिसते आहे, त्यापेक्षा जास्त ते ज्या कलांमध्ये रमतात त्यात आहे. ओरिगामी, काष्ठशिल्प, बासरीवादन, गायन, चित्रकला, फोटोग्राफी, स्वयंपाक असे कितीतरी छंद त्यांना आहेत. लेखन, कला या क्षेत्रांबरोबरच मुक्तांगणसारख्या संस्थेद्वारे व्यसनमुक्ती क्षेत्रात दिलेले त्यांचे योगदान संपूर्ण महाराष्टÑाला विसरता येणार नाही. अशा या मुक्तछंद पण तरीही संवेदनशील माणसाचा जीवनप्रवास ४५ मिनिटांच्या माहितीपटात मांडणं ही आमच्यासाठी आव्हानात्मक गोष्ट होती.माहितीपटाच्या पहिल्या टप्प्यात आम्ही अवचटांच्या जवळ-जवळ दहा तासांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर त्यांच्या जीवनावर भाष्य करणाºया विविध व्यक्तींच्या साधारणत: एकेक तासाच्या मुलाखती घेतल्या आणि मग हमाल, वेश्या, भंगी, मासेमार, जुना बाजार, मंडई, हेल्पर्स आॅफ द हॅन्डीकॅप्ड संस्था अशा कितीतरी ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष चित्रण केले. हेही चित्रण दहा-बारा तासांचे झाले. म्हणजे तीसपेक्षा जास्त तासांच्या फुटेजच्या आधारे हा माहितीपट बनविला आहे. इतक्या फुटेजमधून अवचटांचे जीवन ४५ मिनिटांत मांडणं हे आमच्यापुढं आव्हान होतं, पण त्यातच तर खरी सृजनशीलता असते. हे सगळं करत असताना आम्हाला खूप वेगवेगळे अनुभव आले, खूप काही शिकायला मिळाले. त्यांच्या सहवासातला अनुभव हा अनुभव खूपच समृद्ध करणारा आहे.‘माणसाचं शिकणं संपलं, की त्याने स्वत:चा फोटो घरात लावून त्याला दररोज हार घालावा. शिकणं संपलं म्हणजे माणूस जिवंत असून मेल्यासारखाच ना’ अनिल अवचटांवरील माहितीपटाचे शूटिंग करताना ते एकदा असंच नकळतपणे बोलून गेले.समोर येणाºया प्रत्येक क्षणाला भरभरून प्रतिसाद देत जगणं म्हणजे काय असतं, याचं अनिल अवचट उत्तम उदाहरण आहेत. स्वत: मुक्तपणे जगण्याचा आनंद घेत असतानाही त्या आनंदातून स्वत:बरोबर आसपासच्या जगातही बदल करीत राहणं इतकी सोपी गोष्ट नाही. त्यांची समाज, निसर्गाविषयी संवेदनशीलता सतत जाणवत राहते. यापुढील काळातही सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आदी वेगवेगळ््या क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविणाºया व्यक्तींच्या कार्यावर माहितीपट बनविण्याचा विचार आहे.