शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

मुळशीचे दोन टीएमसी पाणी पिण्यासाठी ठेवा : सुप्रिया सुळेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 20:03 IST

 खडकवासला-निरा खोऱ्यातील प्रश्नांवर जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

ठळक मुद्देकऱ्हा, गुंजवणी नदीवरील बंधाऱ्यांची दुरुस्ती करानागरिकांचे व शेतीचे पाण्याअभावी नुकसान होण्याची शक्यता

पुणे : मुळशी तालुक्यातील नागरिकांना मुळशी धरणातील २ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी पिण्यासाठी उपलब्ध करुन द्यावे, मुठा उजवा कालव्याची गळती रोखण्यासाठी अस्तरीकरण करावे, गुंजवणी धरणग्रस्तांना घरांसाठी दिलेल्या जागा त्यांच्या नावावर करुन द्याव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी कृष्णा खोरे प्रकल्पाचे कार्यकारी संचालक खलिल अन्सारी यांच्याकडे केली. बारामती लोकसभा मतदार संघातील जनाई शिरसाई, पुरंदर उपसा, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, मुळशी व टेमघर या धरण क्षेत्रातील विविध पाणी योजनांबाबत प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सुळे यांनी कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांची सिंचनभवन येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजय चोपडे, अधिक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, कार्यकारी अभियंता विजय पाटील, शिवाजीराव डुबल, राष्ट्रवादीचे माणिकराव झेंडे, रणजीत शिवतारे, सचिन दोडके, नाना भूरूक, आप्पासाहेब पवार उपस्थित होते. टेमघर धरण दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात येत आहे. मात्र, या पाण्यावर अवलंबून असलेल्या काही गावांतील नागरिकांचे व शेतीचे पाण्याअभावी नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी धरण रिकामे करताना प्रथम त्यांच्यासाठी पाण्याची सोय होणे आवश्यक आहे. मुळशी भागातील स्थानिक शेतकऱ्यांना पिण्यासाठी मुळशी धरणाचे दोन टीएमसी पाणी कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सुळे यांनी केली. खडकवासला जुन्या कालव्याच्या लाभ क्षेत्रापर्यंत नवीन मुठा उजवा कालवा वाढवावा, पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी सणसर कालव्यातून सोडण्यात यावे. याशिवाय जनाई शिरसाई योजनेतून सध्या काही गावांना व तेथील शेतीला पाणी दिले जाते. त्यात आणखी काही गावे वाढवावीत, असे सुप्रिया सुळे यांनी सुचविले. जनाई शिरसाई कालव्याची गळती रोखण्यासाठी अस्तरीकरण करावे. अस्तरीकरण झाल्यास वाचणारे पाणी अनेक वंचित गावांना पुरवता येईल, असेही सुळे यांनी स्पष्ट केले. --कऱ्हा, गुंजवणी नदीवरील बंधाऱ्यांची दुरुस्ती करा कऱ्हा नदीवरील बंधाऱ्यांच्या बाजूचे भराव अनेक ठिकाणी वाहून गेले आहेत. तर काही ठिकाणी पडझड झाली आहे. येथे तातडीने दुरुस्ती करावी. तसेच, गुंजवणी नदीवरील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. -----------

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीSupriya Suleसुप्रिया सुळे