शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

शांतता राखा! कोरेगाव भीमा, २ हजार विद्यार्थ्यांची रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 02:50 IST

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीमुळे नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर, येथील संभाजी हायस्कूल व फ्रेंड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावातून शांतता रॅली काढून गावातील तरुणांना सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिला.

कोरेगाव भीमा - शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीमुळे नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर, येथील संभाजी हायस्कूल व फ्रेंड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावातून शांतता रॅली काढून गावातील तरुणांना सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिला.पोलिसांच्या वतीने या गावामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुल आहे. आज पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, पोलीस उपअधीक्षक बरकत मुजावर व पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे यांनी गावातील श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी हातामध्ये सामाजिक एकतेचे संदेश देणारे फलक घेऊन ‘सामाजिक एकता-प्रगतीचा रस्ता, हम सब एक है!, भारतमाता की जय’ अशा घोषणा देत महापुरुषांचे विचार लोकांना सांगत गावातून शांतता रॅली काढली.या वेळी दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांसह, सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच कल्पना गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस, माजी सरपंच विजय गव्हाणे, अशोक काशीद, सर्व ग्रामपंचायत सदस्य, छत्रपती संभाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही. टी. पाटील, पर्यवेक्षक एच. आर. जाधव, फ्रेंड्सचे स्कूल अध्यक्ष राजाराम ढेरंगे, दिलीप भोसले, दोन्ही शाळांचे शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.ही रॅली वढू रस्त्यावरून डिंग्रजवाडी फाटा, ग्रामपंचायत कार्यालय येथून मारुती मंदिर, भैरवनाथ मंदिर व पुणे-नगर महामार्गावरून कोरेगाव भीमा येथील चौकीजवळ या रॅलीची सांगता झाली.‘कोरेगाव भीमा येथील झालेली दुर्घटना दुर्दैवी असून गावातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही समाजाच्या नागरिकांनी सलोख्याचे वातावरण जपण्याची आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.सामाजिक तेढ निर्माण झाल्याने सर्वांचेच नुकसान झाले आहे. भरकटलेल्या तरुणांनी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक सलोखा शिकण्याची गरज आहे.जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी नागरिकांनी आपापले व्यवहार सुरळीत करण्यावर भर देण्याचे आवाहनही करण्यात आले.- बरकत मुजावर , पोलीस उपअधीक्षकबाहेरच्या शक्तींना थारा देऊ नका - गिरीश बापटकोरेगाव भीमा : दिवंगत राहुल फटांगडे कुटुंबास शासनस्तरावर शक्य ती मदत करणार असल्याचे सांगून स्थानिकांची बाजू ऐकून घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही, याची ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. नुकसानग्रस्तांचे वस्तुस्थितीला धरून पंचनामेही करण्याचा आदेश प्रशासनाला दिला असल्याचे सांगून बाहेरच्या शक्तींना थारा देऊ नका, असे आवाहन करून गावात शांतता ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.कोरेगाव भीमाच्या दंगलीनंतर शुक्रवारी पालकमंत्री गिरीश बापट यांनी कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील नुकसानग्रस्तांची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार बाबूराव पाचर्णे, घोडगंगाचे माजी संचालक कैलासराव सोनवणे, धर्मेंद्रजी खांडरे, राहुल गवारे, केशव फडतरे व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.या वेळी बापट यांनी कोरेगाव भीमा दंगलीमध्ये डिंग्रजवाडी फाट्यावरील उद्योजक जयेश शिंदे यांच्या छत्रपती अ‍ॅटो या चारचाकी वाहनाच्या शोरूमचे दंगलग्रस्तांनी केलेल्या जाळपोळीत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी दंगलीमध्ये झालेल्या नुकसानीची नुकसानग्रस्तांनी पोलिसांमध्ये तक्रार करण्याचे आवाहन केले. शासनामार्फत या पारदर्शकपणे तपास करून दोषींवर कारवाई होणार असल्याचे सांगितले.यानंतर त्यांंनी दंगलीमध्ये मृत झालेल्या राहुल फटांगडे या युवकाच्या नातेवाइकांची भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार बाबूराव पाचर्णे, उपसभापती मोनिका हरगुडे, सरपंच रमेश सातपुते, उपसरपंच राहुल दरेकर, दत्तात्रय हरगुडे, पंडित दरेकर, शिवाजी दरेकर व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. बापट यांनी शासनामार्फत शक्य तेवढी मदत करणार असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी या वेळी फटांगडे याच्या नातेवाईकांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करीत स्थानिकांनी गावचे रक्षण केल्यामुळे महिला व लहान मुलांचे रक्षण होण्यास मदत झाली असल्याचे सांगितले. प्रशासनाकडून स्थानिकांवर खोटे गुन्हे नोंदवू नये, अशी मागणीही या वेळी केली.

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonभीमा-कोरेगाव