शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

काश्मीरी विद्यार्थ्यांना गैरसमजाचे बळी होऊ देणार नाही : हिंदुत्वादी संघटनांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 16:24 IST

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत देशात अनेक ठिकाणी काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ले झाले.

ठळक मुद्देपुण्यात सरहद संस्थेमध्ये काश्मीरी विद्यार्थी आणि हिंदुत्ववादी संघटना पदाधिकारी संवाद बैठकअटलबिहारी वाजपेयी यांच्या जम्मूरियत, काश्मिरीयत आणि इंसानियत या त्रिसुत्रीचा प्रचार आणि प्रसार

पुणे : आमची लढाई पाकिस्तानशी आहे, काश्मीरी जनतेशी नाही. त्यामुळेच देशद्रोह्यांना विरोध करतानाच काश्मिरी विद्यार्थ्यांना त्रास दिलेला नाही आणि यापुढेही देणार नाही. त्यांना गैरसमजाचे बळी होऊ दिले जाणार नाही, अशी ग्वाही हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी दिली. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत देशात अनेक ठिकाणी काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ले झाले. या हल्लयांमध्ये मुख्यत: हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा आरोप होत होता. या पार्श्वभूमीवर वंदे मातरम संघटनेच्या पुढाकाराने पुण्यात सरहद संस्थेमध्ये काश्मीरी विद्यार्थी आणि हिंदुत्ववादी संघटनेने पदाधिकारी यांच्यामध्ये संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भारतीय जनता पक्षाचे गोपाळ चिंतल, शिवसेनेचे आनंद दवे, विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाचे श्रीपाद रामदासी, समस्त हिंदू आघाडीचे सौरभ करडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मयुर गिते, पतितपावन संघटनेचे स्वप्निल नाईक आदी उपस्थित होते.वंदे मातरम संघटनेचे सचिन जामगे, संतोष देवकर, महेश बटाले, प्रशांत नरवडे, किरण राऊत तसेच जम्मू काश्मीर विद्यार्थी संघटनेचे आकीब भट यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांनी काश्मीरमध्ये मराठी पर्यटकांसाठी केलेल्या मदतकायार्ची आणि अनेकांचे कुटुंब हिंसाचाराची शिकार झाल्याची माहिती दिली. काश्मीरी विदयार्थ्यांवर होणा-या हल्ल्यांना आपला कोणताही पाठिंबा नसून, याउलट असे कृत्य करणा-यांवर कारवाई करु, असे आश्वासन उपस्थित पदाधिका-यांनी दिले. आमच्या नावावर कोणी असे प्रकार केल्यास त्यावर त्वरित कारवाई केली जाईल, असे श्रीपाद रामदासी यांनी सांगितले. अभाविपचे मयूर गिते यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांचा स्थानिक विद्यार्थ्यांशी संवाद वाढवण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरवले. आनंद दवे, धनंजय जाधव यांनी तात्पुरत्या प्रसिध्दीसाठी अशा घटना घडवून आणणा-यांवर कारवाईची मागणी केली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जम्मूरियत, काश्मिरीयत आणि इंसानियत या त्रिसुत्रीचा भाजपच्या वतीने प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे, असे गोपाळ चिंतल म्हणाले. ह्यहा देश आमचाही आहे, ही भावना काश्मीरी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. काही मोजक्या घटनांमुळे किंवा लोकांमुळे एखादे राज्य किंवा देश काश्मीरींच्या विरोधात आहे, ही भावना मुळापासून उखडून टाकण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. त्याचवेळी कोणत्याही दहशतवादी घटनांना पाठिंबा देणार नाही, अशा भावना काश्मीरी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. या बैठकीस शहरातील विविध संस्थांमधील काश्मिरी विद्यार्थी उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणेpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरSarhadसरहद संस्थाHindutvaहिंदुत्व