शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

kartiki ekadashi: 'ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या' जयघोषात अलंकापुरी गजबजली; हजारो भाविकांनी घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 16:37 IST

माऊलींच्या संजीवन समाधीला ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात दूध, दही, तूप, मध, साखर, सुगंधी तेल, उटणे, अत्तर लावण्यात आले. त्यानंतर समाधीवर माऊलींचा मुखवटा ठेऊन विधिवत महापूजेनंतर आकर्षक रूप साकारण्यात आले

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत कार्तिकी एकादशी निमित्त सुमारे दहा हजारांहून अधिक भाविकांनी नियमांचे पालन करत दर्शनरांगेतून माऊलींच्या संजीवन समाधीचे मुख दर्शन घेतले. तर टाळ - मृदुंगाच्या निनादात तसेच 'ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या' जयघोषात माऊलींची पालखीतून नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली. याप्रसंगी हजारो भाविकांनी माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले.

तत्पूर्वी, पहाटे माऊलींच्या संजीवन समाधीला ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात दूध, दही, तूप, मध, साखर, सुगंधी तेल, उटणे, अत्तर लावण्यात आले. त्यानंतर समाधीवर माऊलींचा मुखवटा ठेऊन विधिवत महापूजेनंतर आकर्षक रूप साकारण्यात आले. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आला. कोरोना पार्श्वभूमीनंतर कार्तिकीच्या मुहूर्तावर अलंकापुरीत भाविकांची मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक दिवसांनंतर तीर्थक्षेत्र आळंदी भाविक भक्तांनी गजबजून निघाली असून कोरोनापूर्वी सारखी वाटू लागली आहे.

दरम्यान आजोळघरातील दर्शनबारीतून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. प्रवेशावेळी प्रत्येक वारकऱ्याचे तापमान तपासणी व मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले होते. दर्शनानंतर भाविकांना पानदरवाज्यातून बाहेर सोडले जात होते. दिवसभरात सुमारे दहा हजारांहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचे देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरTempleमंदिरSocialसामाजिक