शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

कार्तिकी वारी आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याबाबत पोलीस मांडणार राज्य सरकारकडे भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 11:17 IST

कार्तिकी यात्रेसाठी आळंदी येथे महाराष्ट्रातून पायी दिंड्या येतात. नऊ ते १० लाख भाविक व वारकरी आळंदीत दाखल होतात.

ठळक मुद्देआळंदी येथे कार्तिकी वद्य अष्टमी ते कार्तिकी अमावस्या दरम्यान कार्तिकी यात्रेचे दरवर्षी आयोजन

पिंपरी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर धार्मिकस्थळे बंद आहेत. आळंदी येथे कार्तिकी वारी तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा डिसेंबरमध्ये होणार आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. राज्य सरकारकडे प्रशासनाकडून भूमिका मांडण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी यावेळी दिले.

चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयात सोमवारी बैठक झाली. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ एकचे उपायुक्त मंचक इप्पर, चाकण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राम जाधव, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डाॅ. अभय टिळक, विश्वस्त अ‍ॅड. विकास ढगे पाटील, आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चाैधर, दिघीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे आदी या वेळी उपस्थित होते.   आळंदी येथे कार्तिकी वद्य अष्टमी ते कार्तिकी अमावस्या दरम्यान कार्तिकी यात्रेचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदा ८ ते १४ डिसेंबर दरम्यान हा सोहळा होणार आहे. यात हैबतराव बाबा यांच्या पायरीचे पूजन अष्टमीला झाल्यानंतर यात्रेला सुरवात होते. त्यानंतर ११ डिसेंबरला एकादशी तर १३ डिसेंबरला संजीवन समाधी दिन आहे. तर १४ डिसेंबरला यात्रेची समाप्ती होणार आहे. समाप्तीनिमित्त छबीना काढण्यात येतो.

कार्तिकी यात्रेसाठी आळंदी येथे महाराष्ट्रातून पायी दिंड्या येतात. नऊ ते १० लाख भाविक व वारकरी आळंदीत दाखल होतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळा होणार नसल्यास भाविक व वारकरी यांना सूचना देणे आवश्यक आहे. त्यामुळे या सोहळ्याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे देवस्थानच्या पदाधिका-यांकडून सांगण्यात आले.

राज्य सरकारकडे सोहळ्याबाबत भूमिका मांडण्यात येईल. त्यांच्याकडून नियमावली तसेच सूचना प्राप्त होतील त्यानुसार लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांनी या वेळी सांंगितले.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरAlandiआळंदीcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकार