शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"मराठी लोकांना त्रास दिला तर..."; पुण्यात कर्नाटकच्या गाड्यांना काळं फासले, सीमावादाचे पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 15:49 IST

स्वारगेट डेपोजवळ उभ्या असलेल्या कर्नाटकच्या गाड्यांना काळं फासून त्यावर जय महाराष्ट्र लिहून निषेध....

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर हा वाद पुन्हा वर आला होता. कर्नाटकात मराठी वाहनांची तोडफोड झाल्यानंतर आता पुण्यात कानडी वाहनांना त्याचा फटका बसला आहे. पुण्यातील शिवसैनिकांनी कर्नाटक राज्याच्या परिवहन बसेसवर काळं फासत निषेध नोंदविला आहे. स्वारगेट डेपोजवळ उभ्या असलेल्या कर्नाटकच्या गाड्यांना काळं फासून त्यावर जय महाराष्ट्र लिहून निषेध नोंदविला. जर मराठी लोकांना किंवा महाराष्ट्राच्या गाड्यांना कर्नाटकात त्रास दिला तर आम्ही एकही कर्नाटकची गाडी येऊ देणार नाही असं आंदोलकांनी सांगितले. बेळगाव सीमेवर महाराष्ट्राच्या गाड्या कर्नाटकमधील नागरिकांनी फोडल्या असून आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असंही यावेळी आंदोलकांनी सांगितले.

 

अनेक आंदोलकांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं आहे. स्वारगेट परिसरात कर्नाटकच्या गाड्या लावल्या जातात. तिथं जाऊन शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध नोंदविला. महाराष्ट्र गाड्यांवर जर कर्नाटकात हल्ला झाला तर आम्ही शांत बसणार नाही, असंही यावेळी आंदोलक शिवसैनिकांनी प्रतिक्रिया दिली.

काय आहे सीमाप्रश्न?कर्नाटक-महाराष्ट्र दरम्यानचा सीमाप्रश्न गेल्या सहा दशकांपासून प्रलंबित आहे. सीमा भागातील सुमारे सात हजार किलोमीटर भूभागावर महाराष्ट्राने आपल्या दावा सांगितला आहे. यामध्ये गुलबर्गा, उत्तर कन्नड, बिदर, निपाणी, बेळगाव व कारवार या शहरांसह 814 मराठी भाषिक गावांचा समावेश आहे. या संदर्भाची याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 1966 मध्ये केंद्र सरकारने सीमाप्रश्न सोडवण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती मेहरचंद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला. या आयोगाच्या अहवालात, बेळगाव कर्नाटकमध्ये राहील, उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवारसह 264 गावे व सुपा प्रांतातील 300 गावे महाराष्ट्राला द्यावी, सोलापूरसह 247 गावे कर्नाटकात समाविष्ठ करावीत असं सागितलं. पण याला दोन्ही राज्यांनी नकार दिला. महाजन आयोगासमोर दक्षिण सोलापुरचे तत्कालिन आमदार शिवदारे यांनीही साक्ष दिली होती. त्यात त्यांनी सोलापूर जिल्हा परिसरात कन्नड भाषिक असले तरी त्यांचा ऐतिहासिक आणि भौगोलिक अनुबंध महाराष्ट्राशी कसा आहे, हे पटवून दिले होते. विशेष म्हणजे हा प्रश्न आंदोलन व हिंसेने सुटणार नाही तर तो लोकशाही मार्गाने सुटेल असं प्रतिपादन त्यांनी त्यावेळी केले होते.

पुढे 1983 मध्ये बेळगाव महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत मराठी भाषिकांनी सत्ता स्थापन केली. या महापालिकेसह सुमारे 250 गावांनी कर्नाटक सरकारला प्रस्ताव पाठवून महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण कर्नाटक सरकारने ती धुडकावून लावली होती. नंतर 2005 मध्ये बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता असताना पालिकेत महाराष्ट्रात सामिल होण्याचा ठराव केला होता. त्यानंतर कर्नाटकने बेळगाव महापालिका बरखास्त केली. यावर महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यावर अजूनही निकाल लागलेला नाही. कर्नाटकने तयारीसाठी अजून अवधी मागितल्याने सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकला सुनावले आहे. ही याचिका खूप वर्षे सुनावणीविना पडून आहे आता याला आणखी वेळ देता येणार नाही असं न्यायालय म्हणाले. 2006 मध्ये बेळगाववरील आपला दावा मजबूत करण्यासाठी कर्नाटकने बेळगावमध्ये पाच दिवसीय हिवाळी अधिवेशन बोलावले होते. पुढे 2012 मध्ये तिथे 'विधानसौंध' नावाची विधानसभेची इमारत उभी केली. येथे दरवर्षी हिवाळी अधिवेशन बोलावले जाते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाKarnatakकर्नाटक