शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कळमोडी धरण तयार; पण उपसा योजना प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 1:18 AM

आंदोलनाचा इशारा : ८४६ हेक्टर क्षेत्रासाठी पाणी देण्याची मागणी

दावडी : कळमोडी धरण बांधून तयार आहे; परंतु धरणातून प्रस्तावित असलेली उपसा जलसिंचन योजना अनेक वर्षे प्रलंबित आहे. सातगाव पठार भागातील ५,०६६ हेक्टर क्षेत्र व खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर, पूर, वरूडे, वाफगाव या गावांतील ८४३ हेक्टर क्षेत्रासाठी कळमोडीचे पाणी मिळण्यासाठी खेड व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी वज्रमूठ आवळली आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आरळा नदीवर बांधण्यात आलेल्या कळमोडी धरणाची एकूण साठवण क्षमता दीड टीएमसी इतकी आहे. या धरणातील पाणी चासकमान धरणात येते. चासकमान धरणातील काही पाणीसाठा पुन्हा पाईपलाईनद्वारे आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार या परिसरातील वेळ नदीत सोडण्यात येणार होते. वेळ नदी आंबेगाव तालुक्यातील सात गावांतून पुढे जाते,ती खेड तालुक्याच्या पूर्व भागातून जाते. मात्र, ही योजना बारगळली आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे कळमोडी धरण्याच्या पाण्याबाबत भिजत घोंगडे पडले आहे. खेड तालुुक्याच्या पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई असल्याने या भागांतील नागरिकांच्या भावना तीव्र आहे. दुष्काळाची संभाव्य तीव्रता लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी आझाद मैदानात पाच दिवस धरणे आंदोलन केले होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या भेटी घेतल्या. या भागातील सर्व गावांचे सरपंच, कळमोडी धरण प्रकल्प कृती समितीचे पदाधिकारी, कनेरसर येथील यमाई देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष मोहनराव दौंडकर व कुरवंडीचे सरपंच सुनीलराव तोत्रे यांच्या पुढाकाराने पेठ येथे बैठक झाली. या बैठकीस वरूडेचे सरपंच मारुती थिटे, अजय भागवत, संदीप गावडे, श्रीनिवास गावडे, हनुमंतराव दौंडकर तसेच सातगाव पठार गावातील सरपंच, आंबेगाव बाजार समिती संचालक जयसिंग एरंडे व डॉ. ताराचंद कराळे तसेच शेतकरी उपस्थित होते. बैठकीत या प्रश्नी लढा देण्यासाठी कळमोडी प्रकल्प कृती समिती स्थापन करून सर्व गावच्या ग्रामसभा घेऊन शासनाला गांभीर्य लक्षात यावे, यासाठी सर्व ग्रामसभांचे ठराव पाठवून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांनी एकत्रित पाठपुरावा करण्याचे ठरले, त्यानुसार सातगाव पठार, खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर, पूर, गोसासी, वरूडे, वाफगाव व शिरुर तालुक्यातील केंदुर, पाबळ या गावांच्या विशेष ग्रामसभा २५ तारखेपर्यंत घेऊन सर्व गावांची पुन्हा एकत्रित बैठक घेऊन पुढील दिशा निश्चित केली जाणार असल्याचे अशोक टाव्हरे यांनी सांगितले.आंदोलनाचा इशारा...मागील महिन्यात झालेल्या अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर होत असताना खेड, आंबेगावच्या लोकप्रतिनिधींनी कोणताही तारांकित प्रश्न वा लक्षवेधी कळमोडी संदर्भात केली नाही, असा आरोप शेतकºयांनी केला आहे. थिटेवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत पाबळ, केंदूर येथील नागरिकांची मागणी आहे. या योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी अशोक टाव्हरे यांनी कळमोडी पाणलोट विकास संस्थेची स्थापना केली असून, मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांना निवेदन देऊन तातडीने अंदाजपत्रक मंजुरी व निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. शासनाने न्याय दिला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दि. १० जानेवारी पासून बेमुदत धरणे धरण्याचा इशारा येथील शेतकºयांनी दिला आहे. 

टॅग्स :PuneपुणेDamधरण