शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

कंगना, गोखले, गुप्ते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केवळ बाहुले; लक्ष्मण मानेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 20:10 IST

सामान्य लोकांनी अशी वक्तव्ये केली असती तर आतापर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले गेले असते

पुणे : महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. कंगना, गोखले, गुप्ते यांना बोलण्याचे, मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य कोणी दिले असेल तर ते राज्यघटनेने दिले. मात्र, ज्या राज्यघटनेने हे स्वातंत्र्य दिले, त्यालाच नाकारण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कंगना राणौत, विक्रम गोखले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केवळ बाहुले आहेत. त्यांची स्क्रिप्ट नागपूरला तयार होते, असा आरोप ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांनी केला.

''सामान्य लोकांनी अशी वक्तव्ये केली असती तर आतापर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले गेले असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा कंगना, विक्रम गोखले आणि अवधूत गुप्ते यांनी अवमान केला आहे. त्यामुळे या मंडळींविरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल करणार आहे. गोखले आणि गुप्ते यांनी आठवडाभरात देशाची माफी न मागितल्यास येत्या शुक्रवारपासून विक्रम गोखले यांच्या घरासमोर गांधीजींच्या सत्याग्रही मार्गाने आंदोलन करणार आहे. त्यांना घराबाहेर पडू देणार नाही, असा इशाराही माने यांनी दिला.''

''मी आंबेडकरवादी आहे. आम्हालादेखील गांधी, टिळक आणि सावरकरांचे विचार मान्य नाहीत. विचारांमध्ये मतभेद असतातच. पण यालाच लोकशाही म्हणतात. परंतु, याच जागरूक लोकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान नाकारता येणार नाही, असेही तेम्हणाले.''

...त्यांनी गांधींबद्दल बोलू नये

देशद्रोही वक्तव्य करणारे कंगना, गोखले, गुप्ते यांचे शिक्षण किती हे मला माहीत नाही. मात्र, २०१४मध्ये देश स्वतंत्र झाला, असे यांना वाटत असेल, तर यासारखी दुर्देवी गोष्ट नाही. केंद्र सरकारसह काही मंडळींना देशाचा इतिहास खोडून २०१४पासून इतिहास मांडायचा आहे. २०१४पासून देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही तर या स्वातंत्र्याचा संकोच झाला आहे, असे जग सांगत आहे. २०१४पासून हुकुमशाही वाढली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुन्हा चातुर्वण्य व्यवस्था आणि हुकुमशाही आणायची आहे. त्यांच्याविषयी लोकांमध्ये असंतोष आहे, याकडे लक्ष वेधत, ज्यांना गांधीमार्ग कळत नाही, त्यांनी गांधींबद्दल बोलू नये, अशा शब्दात माने यांनी कंगनाला फटकारले.

टॅग्स :Puneपुणेlaxman maneलक्ष्मण मानेVikram Gokhaleविक्रम गोखलेNarendra Modiनरेंद्र मोदीKangana Ranautकंगना राणौत