शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

कंगना, गोखले, गुप्ते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केवळ बाहुले; लक्ष्मण मानेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 20:10 IST

सामान्य लोकांनी अशी वक्तव्ये केली असती तर आतापर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले गेले असते

पुणे : महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. कंगना, गोखले, गुप्ते यांना बोलण्याचे, मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य कोणी दिले असेल तर ते राज्यघटनेने दिले. मात्र, ज्या राज्यघटनेने हे स्वातंत्र्य दिले, त्यालाच नाकारण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कंगना राणौत, विक्रम गोखले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केवळ बाहुले आहेत. त्यांची स्क्रिप्ट नागपूरला तयार होते, असा आरोप ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांनी केला.

''सामान्य लोकांनी अशी वक्तव्ये केली असती तर आतापर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले गेले असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा कंगना, विक्रम गोखले आणि अवधूत गुप्ते यांनी अवमान केला आहे. त्यामुळे या मंडळींविरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल करणार आहे. गोखले आणि गुप्ते यांनी आठवडाभरात देशाची माफी न मागितल्यास येत्या शुक्रवारपासून विक्रम गोखले यांच्या घरासमोर गांधीजींच्या सत्याग्रही मार्गाने आंदोलन करणार आहे. त्यांना घराबाहेर पडू देणार नाही, असा इशाराही माने यांनी दिला.''

''मी आंबेडकरवादी आहे. आम्हालादेखील गांधी, टिळक आणि सावरकरांचे विचार मान्य नाहीत. विचारांमध्ये मतभेद असतातच. पण यालाच लोकशाही म्हणतात. परंतु, याच जागरूक लोकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान नाकारता येणार नाही, असेही तेम्हणाले.''

...त्यांनी गांधींबद्दल बोलू नये

देशद्रोही वक्तव्य करणारे कंगना, गोखले, गुप्ते यांचे शिक्षण किती हे मला माहीत नाही. मात्र, २०१४मध्ये देश स्वतंत्र झाला, असे यांना वाटत असेल, तर यासारखी दुर्देवी गोष्ट नाही. केंद्र सरकारसह काही मंडळींना देशाचा इतिहास खोडून २०१४पासून इतिहास मांडायचा आहे. २०१४पासून देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही तर या स्वातंत्र्याचा संकोच झाला आहे, असे जग सांगत आहे. २०१४पासून हुकुमशाही वाढली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुन्हा चातुर्वण्य व्यवस्था आणि हुकुमशाही आणायची आहे. त्यांच्याविषयी लोकांमध्ये असंतोष आहे, याकडे लक्ष वेधत, ज्यांना गांधीमार्ग कळत नाही, त्यांनी गांधींबद्दल बोलू नये, अशा शब्दात माने यांनी कंगनाला फटकारले.

टॅग्स :Puneपुणेlaxman maneलक्ष्मण मानेVikram Gokhaleविक्रम गोखलेNarendra Modiनरेंद्र मोदीKangana Ranautकंगना राणौत