शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

कंगना, गोखले, गुप्ते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केवळ बाहुले; लक्ष्मण मानेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 20:10 IST

सामान्य लोकांनी अशी वक्तव्ये केली असती तर आतापर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले गेले असते

पुणे : महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. कंगना, गोखले, गुप्ते यांना बोलण्याचे, मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य कोणी दिले असेल तर ते राज्यघटनेने दिले. मात्र, ज्या राज्यघटनेने हे स्वातंत्र्य दिले, त्यालाच नाकारण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कंगना राणौत, विक्रम गोखले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केवळ बाहुले आहेत. त्यांची स्क्रिप्ट नागपूरला तयार होते, असा आरोप ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांनी केला.

''सामान्य लोकांनी अशी वक्तव्ये केली असती तर आतापर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले गेले असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा कंगना, विक्रम गोखले आणि अवधूत गुप्ते यांनी अवमान केला आहे. त्यामुळे या मंडळींविरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल करणार आहे. गोखले आणि गुप्ते यांनी आठवडाभरात देशाची माफी न मागितल्यास येत्या शुक्रवारपासून विक्रम गोखले यांच्या घरासमोर गांधीजींच्या सत्याग्रही मार्गाने आंदोलन करणार आहे. त्यांना घराबाहेर पडू देणार नाही, असा इशाराही माने यांनी दिला.''

''मी आंबेडकरवादी आहे. आम्हालादेखील गांधी, टिळक आणि सावरकरांचे विचार मान्य नाहीत. विचारांमध्ये मतभेद असतातच. पण यालाच लोकशाही म्हणतात. परंतु, याच जागरूक लोकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान नाकारता येणार नाही, असेही तेम्हणाले.''

...त्यांनी गांधींबद्दल बोलू नये

देशद्रोही वक्तव्य करणारे कंगना, गोखले, गुप्ते यांचे शिक्षण किती हे मला माहीत नाही. मात्र, २०१४मध्ये देश स्वतंत्र झाला, असे यांना वाटत असेल, तर यासारखी दुर्देवी गोष्ट नाही. केंद्र सरकारसह काही मंडळींना देशाचा इतिहास खोडून २०१४पासून इतिहास मांडायचा आहे. २०१४पासून देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही तर या स्वातंत्र्याचा संकोच झाला आहे, असे जग सांगत आहे. २०१४पासून हुकुमशाही वाढली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुन्हा चातुर्वण्य व्यवस्था आणि हुकुमशाही आणायची आहे. त्यांच्याविषयी लोकांमध्ये असंतोष आहे, याकडे लक्ष वेधत, ज्यांना गांधीमार्ग कळत नाही, त्यांनी गांधींबद्दल बोलू नये, अशा शब्दात माने यांनी कंगनाला फटकारले.

टॅग्स :Puneपुणेlaxman maneलक्ष्मण मानेVikram Gokhaleविक्रम गोखलेNarendra Modiनरेंद्र मोदीKangana Ranautकंगना राणौत